Wednesday, June 10, 2026
HomeनगरAhilyanagar : बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री

Ahilyanagar : बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री

शेतकर्‍यांचे नुकसान || कंपनी संचालकासह विक्रेत्यावर गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ करून शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द फसवणूक व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडाली असून निकृष्ट व परवानाविना विक्री होणार्‍या बियाण्यांच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

- Advertisement -

याबाबत बीज निरीक्षक तथा कृषी अधिकारी बाळासाहेब रामचंद्र कांबळे (रा. नंदनवन कॉलनी, पाईपलाईन रस्ता, सावेडी) यांनी बुधवारी (20 मे) रात्री फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाडळी शिंदे (ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) येथील मे. यमुनाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचा संचालक सुरज शिवानंद शिंदे व शिंगवे नाईक (ता. अहिल्यानगर) येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचा मालक निखील गोविंद पाटील यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (19 मे) सकाळी 11 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास शिंगवे नाईक येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र येथे तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित विक्रेत्याकडे आवश्यक परवाना नसताना बियाण्यांची विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. तपासादरम्यान रब्बी कांदा बियाण्यांमध्ये खरीप कांदा बियाण्यांची भेसळ आढळून आली. या भेसळीमुळे कांदा उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली असून अनेक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

संबंधित संशयित आरोपींनी बियाणे शेतकर्‍यांना विक्री केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणूक, बीज अधिनियम कलम, बियाणे नियम, बियाणे (नियंत्रण) आदेश कलम तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे करीत आहेत.

दोषींवर थेट फौजदारी कारवाई
बियाणे विक्रीमध्ये कोणत्याही प्रकारची अनधिकृत आणि बेकायदेशीर बाब खपवून घेतली जाणार नाही. ज्या कृषी सेवा केंद्र चालकांकडे वैध परवाना नाही किंवा जे चालक परवान्यात नसलेल्या कृषी निविष्ठाची विक्री करतील, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. शेतकर्यांना देण्यात येणार्या प्रत्येक बिलावर बियाण्याचा प्रकार, जात आणि लॉट नंबर अचूक असणे बंधनकारक आहे. बिलांमध्ये फेरफार करून किंवा चुकीची जात लिहून शेतकर्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास परवाना रद्द करण्यासोबतच प्रशासकीय व कायदेशीर कारवाईला करणार असल्याचा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

शाळा

Maharashtra Schools: राज्यातील शाळा १५ की २२ जूनला सुरु होणार? शिक्षण...

0
मुंबई | Mumbaiतब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय...