दिल्ली – सध्या सोशल मीडियावर चीनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचे कॅम्पेन चालवलं जातं आहे. पण चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने या संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
त्यांनी म्हंटले आहे, भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी व्यक्ती आमच्या वस्तुबाबत अफवा पसरवत आहे. पण आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्या आहे. चीनची भारतात ७ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असून चीनी गोष्टीवर बहिष्कार करने अशक्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.