अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील १४ व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
यात राहाता तालुक्यातील ०५, अकोले तालुक्यातील ०२, संगमनेर तालुक्यातील ०३ तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक अशा रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १०९ करोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहे.