मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज (मंगळवार) सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस भरतीसह चार मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल १५ हजार पोलीसपदांच्या नवीन भरतीला राज्य सरकारने (State Government) मंजुरी दिली आहे. याशिवाय अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि समान्य प्रशासन विभागासाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, आजच्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि रोजगार व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दांडी मारली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य रंगल्याची चर्चा आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे
गृह विभाग – महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी
अन्न, नागरी पुरवठा विभाग – राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
विमानचालन विभाग – सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय सामाजिक
न्याय व विशेष सहाय्य विभाग – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.





