Tuesday, June 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : "सध्या काही लोकांना उद्योग नाहीत म्हणून..."; अजित पवारांचा राज...

Maharashtra Politics : “सध्या काही लोकांना उद्योग नाहीत म्हणून…”; अजित पवारांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

मुंबई | Mumbai

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पडसाद उमटत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या (Hindi Language) या धोरणाला कडाडून विरोध केला आहे. आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत, असे म्हणत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला ठणकावून सांगितले होते. त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. ते पिंपरी चिंचवड येथे पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

यावेळी बोलतांना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, “सध्या कोणाला उद्योग नाही आहेत. विरोधकांना काही काम राहिलेले नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच, त्याबद्दल काहीही दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली जी काही मातृभाषा असते त्याबद्दल आपुलकी, प्रेम, जिव्हाळा असतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. बरीच वर्ष दिल्लीत पडून असलेला हा मुद्दा एनडीए सरकारने मार्गी लावला. महाराष्ट्रात राहायचे तर मराठी आलीच पाहिजे. ज्यांना काहीही काम उरलेले नाही ते लोक असा वाद घालत बसतात”,असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना टोला लगावला.

पुढे ते म्हणाले की, “मराठी भाषा (Marathi language) भवन मरीन ड्राइव्हला उभारण्यात येणार आहे. त्याचा प्लान तयार आहे. निधीची कुठलीही कमतरता जाणवणार नाही. जगात सर्वाधिक इंग्रजी भाषा बोलली जाते. इंग्रजी ही जगातील बहुतेक देशात चालते. त्यामुळे ती पण भाषा आली पाहिजे. तिन्ही भाषांना महत्त्व आहे. पण मातृभाषेला नंबर एकच स्थान आहे. काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात शिरायचे नाही”, असेही अजित पवारांनी म्हटले.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झाले? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

ताज्या बातम्या

Nashik News : ‘आरोग्यवर्धिनी’वर सहा लाख नाशिककरांचा विश्वास; ओपीडीत तपासणी, शहरात...

0
नाशिक | फारूक पठाण | Nashik सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि घराजवळच दर्जेदार प्राथमिक आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने नाशिक महानगरपालिकेने (Nashik NMC) सुरू केलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्रांवर (Arogyavardhini...