Wednesday, June 10, 2026
Homeमहाराष्ट्रIMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी

IMD Weather Alert : राज्यावर गारपिटीचे संकट, हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रातील हवामानात सध्या कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत असून नागरिक दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्याला उष्णतेच्या लाटेने अक्षरशः होरपळून काढले आहे.

- Advertisement -

अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला असून, सरासरी तापमान ४० अंशांच्या वर नोंदवले गेले आहे. कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असतानाच, आता भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा दिला आहे. उन्हाच्या चटक्यानंतर अचानक येणाऱ्या या नैसर्गिक संकटामुळे बळीराजाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो. विशेषतः सांगली, सातारा आणि कोल्हापूर या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये गारपिटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आधीच उष्ण व दमट हवामानाचा इशारा देण्यात आला होता, परंतु आता तिथेही पावसाचे सावट आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला पावसाचा हा सिलसिला थांबण्याचे नाव घेत नसल्याने शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. सततच्या या लहरी हवामानामुळे शेतीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे.

अवकाळी पावसाचा तडाखा आधीच सुरू झाला असून पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. इंदापूरमधील कांदलगाव, सरडेवाडी, शहा हिंगणगाव आणि उजनी धरण पट्ट्यात रात्रीच्या वेळी पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केवळ पुणेच नव्हे, तर सोलापूरच्या अक्कलकोट परिसरातही पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव, हन्नूर आणि दर्शनाळ यांसारख्या गावांना गारपिटीने झोडपून काढले आहे. या अवकाळी संकटामुळे शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला माल भिजल्याने आर्थिक नुकसान अटळ असल्याचे दिसत आहे.

मागच्या महिन्यात झालेल्या गारपिटीने आधीच शेतीचे कंबरडे मोडले होते. हाताशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आता पुन्हा एकदा निसर्गाचा कोप सुरू झाला आहे. सततच्या गारपिटीमुळे फळबागा आणि रब्बी हंगामातील पिकांचे अपरिमित नुकसान होत आहे. वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा असताना पावसाने दिलेली ही धडक आता जीवघेणी ठरू लागली आहे. हवामान विभागाने नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, मेघगर्जना होत असताना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या काळात प्रशासनाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...