Friday, July 10, 2026
Homeक्राईमCrime News : व्यापार्‍याला मारहाण, रोज 500 रूपयांच्या हप्त्याची मागणी

Crime News : व्यापार्‍याला मारहाण, रोज 500 रूपयांच्या हप्त्याची मागणी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील पाईपलाईन रोड परिसरातील एका कपड्यांच्या दुकानात घुसून ग्राहकाच्या वेशात आलेल्या दोघांनी व्यापार्‍याला मारहाण करत 400 रुपयांची पॅन्ट जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना रविवारी (5 जुलै) रात्री घडली. यानंतर संबंधितांनी दुकान चालवायचे असेल तर दररोज 500 रूपयांचा हप्ता द्यावा, अन्यथा अशीच मुले दुकानात पाठवून रोज कपडे घेऊन जाऊ, अशी धमकी दिल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी आकाश प्रकाश शिंदे (वय 33, रा. तपोवन रोड) यांनी सोमवारी (6 जुलै) फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

त्यानुसार नितीन मच्छिंद्र शिंदे (रा. वैदुवाडी, अहिल्यानगर) आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश शिंदे यांचे हनुमान नगर कमानीसमोर, पाईपलाईन रोड येथे कपड्यांचे दुकान आहे. रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शिंदे दुकानात असताना नितीन शिंदे आणि त्याच्यासोबत एक अनोळखी इसम दुकानात आले. अनोळखी इसमाने शिंदे यांना मारहाण केली, त्यांच्या अंगावर थुंकला आणि पॅन्ट घेऊन पळ काढला.

या प्रकारानंतर शिंदे यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, दुकानाबाहेर आलेल्या शिंदे यांना नितीन शिंदे याने तो माझाच लहान भाऊ आहे, त्याला जाऊ दे. मला ओळखत नाही का? जर येथे व्यवसाय करायचा असेल तर मला रोज 500 रुपयांचा हप्ता द्यावा लागेल, नाहीतर अशीच मुले तुझ्या दुकानात पाठवून रोज कपडे घेऊन जाईन, अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पोलिसांना शिवीगाळ
फिर्यादी शिंदे यांनी तोफखाना पोलिसांना माहिती दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीस येताच नितीन शिंदे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. फिर्यादीने पोलिसांना त्याची ओळख करून दिल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने पोलिसांशीही वाद घालत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुलै २०२६ – सक्तीचा अतिरेक अन् कर्तव्याचा संकोच!

0
महाराष्ट्रातील शासकीय विभागांचा कारभार विरोधाभासी कोंडीतून जात आहे. एकीकडे प्रादेशिक परिवहन विभाग भ्रष्टाचाराच्या दलदलीत रुतलेला असताना त्यावर ठोस उपाय शोधण्याऐवजी सामान्य जनतेला वेठीस धरण्याचे...