Wednesday, February 19, 2025
Homeनगरसर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; आ. हेमंत ओगले यांच्या अधिकार्‍यांना सूचना

सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्या; आ. हेमंत ओगले यांच्या अधिकार्‍यांना सूचना

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासंदर्भात सर्व अधिकार्‍यांची आढावा बैठक काल शुक्रवारी तहसील कार्यालयात पार पडली. पाच तास चाललेल्या या बैठकीत अनेक विभागांबाबत तक्रारी करण्यात आल्या. बांधकाम विभाग, जलजीवन मिशनसह काही अधिकार्‍यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. दरम्यान, तळागाळातील सर्वसामान्य नागरिक हा केंद्रस्थानी ठेवून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याच्या सूचना आमदार हेमंत ओगले यांनी प्रशासनातील अधिकार्‍यांना दिल्या आहेत. यावेळी युवा नेते करण ससाने, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, सभापती सुधीर नवले, माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, शिवसेना नेते संजय छल्लारे, अशोक थोरे उपस्थित होते प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्यासह प्रशासनातील सर्वच विभागप्रमुख हजर होते.

- Advertisement -

आमदार ओगले म्हणाले की, आजच्या बैठकीत पदाधिकारी व नागरिकांनी जे प्रश्न उपस्थित केले तो प्रत्येक प्रश्न मार्गी लावा तसेच अधिकार्‍यांनी आपली जबाबदारी ओळखून जनहिताचे कामे करावे. शासनाच्या माध्यमातून ज्या काही लोकहिताच्या योजना असतील या शेवटच्या घटकापर्यंत कशा पोहोचतील याची दक्षता अधिकार्‍यांनी घ्यावी येणार्‍या काळात आमदार आपल्या दारी ही संकल्पना राबविणार असल्याचे आमदार ओगले यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतकर्‍याने आपल्या पाणी मागणी अर्ज हे केले पाहिजे जेणेकरून आपल्या हक्काच्या पाण्याचा अधिकार अबाधित राहील तसेच ससाणे यांनी श्रीरामपूर शहरातील रस्ते, आरोग्य व पाणीपुरवठा याकडे लक्ष वेधले
जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर यांनी शेतकर्‍यांना होणार्‍या विजेच्या त्रासाबद्दल मुद्दे उपस्थित केले आपल्याही मतदारसंघात सोलर फिडर, सोलर सबस्टेशन ही योजना राबवण्यात येऊन तसेच सद्भावना भवनासाठी आलेला निधी नगरपालिने जागा नसल्याचे कारण दिल्याने निधी परत जाण्याच्या मार्गावर असल्याचे समजते तरी याबाबत अधिकार्‍यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची मागणी केली. तसेच आ.ओगले यांनी उच्चदाब वीज केंद्राचे काम मार्गी लावल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.

पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी देखील शेतकरी व जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विज, कृषी, महिला व जल जीवन मिशनचे प्रश्न मांडत आपली भूमिका स्पष्ट केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी जलजीवांच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करून मुरमाच्या गैरव्यवहाराबद्दल तर जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांनी मतदारसंघात झालेल्या निष्कृष्ट दर्जाच्या रस्त्यांचे कामे चव्हाट्यावर आणली आहे.
शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळ्याबाबत आमदार व अधिकार्‍यांचे लक्ष वेधले. तसेच अंजुम शेख यांनी शहरातील टी.पी स्कीम, आरोग्य व विकास कामांचे प्रश्न उपस्थित केले.

यावेळी बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, खंडेराव सदाफळ, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष लकी सेठी, शिवसेना तालुकाध्यक्ष लखन भगत, रितेश रोटे, पंडित मामा बोंबले,भारत भवार यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, सरपंच विविध पदाधिकारी सोसायट्यांचे चेअरमन व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी विजेचे, पाटपाणी घरकुल तसेच पोलीस प्रशासन संदर्भात अनेक मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या