Thursday, April 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूज“महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललं की…”, राज ठाकरेंनी विठुरायाकडे व्यक्त...

“महाराष्ट्रात जातीपातीचं विष इतकं खोलवर रुजत चाललं की…”, राज ठाकरेंनी विठुरायाकडे व्यक्त केली खंत

मुंबई । Mumbai

आज आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi) सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने विठ्ठलाची पूजा केली जात आहे. राज्यातील नागरिकांसह राजकीय नेते मंडळी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत.

- Advertisement -

याच दरम्यान आषाढी एकादशी निमित्ताने आज मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकीय परिस्थिती आणि वारी यावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात एकीकडे जातीपातीचं राजकारण सुरू आहे. आषाढी वारीत जातीय भेदभाव न करता सगळे विठुरायाचरणी एकत्र येतात. मात्र इतर वेळी जातीपातीच्या नावाखाली राजकारण केलं जातं हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : ‘लाडकी बहिण’नंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना, दरमहा मिळणार ‘इतकी’ रक्कम

राज ठाकरेंची पोस्ट

आज आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र मोठ्या भक्तीभावाने विठ्ठलाची पूजा केली जात आहे. राज्यातील नागरिकांसह राजकीय नेते मंडळी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत आहेत.

याच दरम्यान आषाढी एकादशी निमित्ताने आज राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील राजकीय परिस्थिती आणि वारी यावर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात एकीकडे जातीपातीचं राजकारण सुरू आहे. आषाढी वारीत जातीय भेदभाव न करता सगळे विठुरायाचरणी एकत्र येतात. मात्र इतर वेळी जातीपातीच्या नावाखाली राजकारण केलं जातं हे दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली ८ शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. ‘यात्रा’ ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसापाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं.

देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो.

पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी ७, ८ वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर ‘महा’राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही.

म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे.

पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !

हे ही वाचा : नाशिक जिल्ह्यातील दाम्पत्याला मिळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत विठ्ठलाच्या महापूजेचा मान!

ताज्या बातम्या

Assembly Elections 2026 : पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यासाठी दुपारपर्यंत ६२.१८ टक्के...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi देशातील आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले...