Friday, July 31, 2026
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने 'ही' याचिका फेटाळली

राज्य सरकारला मोठा दिलासा; उच्च न्यायालयाने ‘ही’ याचिका फेटाळली

मुंबई | Mumbai

केंद्र आणि राज्य सरकारने (Central and State Government) घेतलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या (Change of Name) निर्णयाला काही स्थानिकांनी विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने स्थानिकांची ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) असे नामांतर करण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाली होती. पंरतु, या नामांतराला काही स्थानिकांनी विरोध दर्शवत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये या निर्णयावर सुनावणी (Hearing) होऊन न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. यानंतर आज न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय जाहीर करत स्थानिकांच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.

दरम्यान, यावेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारने शहरांच्या नामांतराबाबत घेतलेला निर्णय महसूल विभागाकरीता (Revenue Department) असल्याने यामुळे कोणाचे कुठलेही नुकसान होणार नाही, असे म्हटले. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

छगन

Chhagan Bhujbal: नाशिकमध्ये हे काय सुरु आहे? शहरातील खड्ड्यांवरुन छगन भुजबळांचा...

0
नाशिक | Nashikनाशिक शहरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभुमीवर रस्त्यांची कामे सुरु असून त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे ज्यामुळे रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे...