Saturday, May 2, 2026
HomeनाशिकNashik News : २१७ हेक्टर द्राक्षबागा अवकाळीग्रस्त

Nashik News : २१७ हेक्टर द्राक्षबागा अवकाळीग्रस्त

दिंडोरी, नाशिक, निफाडला सर्वाधिक नुकसान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दोन दिवस अवकाळी पाऊस (Unseasonal Rains) धुव्वाधार बरसल्याने पिकांची मोठी हानी झाली आहे. दिंडोरी, नाशिक आणि निफाड या तीन तालुक्यांमधील ३१८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला असून, त्यात २१७.३० हेक्टरवरील द्राक्षबागांचे (Vineyards) नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Crime : महाठगाचे बिंग फुटले; राज्यपाल बनवण्यासाठी शास्त्रज्ञाकडून उकळले सहा कोटी

या अवकाळी पावसाचा फटका ४ तालुक्यांमधील ६३ गावांना बसला आहे. नुकसानग्रस्त सर्वाधिक ३६ गावे नाशिक तालुक्यातील (Nashik Taluka) असून, तेथील ४६० शेतकऱ्यांचे या पावसाने नुकसान केले आहे. दिंडोरी तालुक्यातील १९ आणि निफाड तालुक्यातील ४ गावांमधील तसेच सिन्नर तालुक्यातील ४ गावांमधील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. दिंडोरी तालुक्यातील १८२ आणि निफाड तालुक्यातील १९ तर सिन्नर तालुक्यांतील १४ शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांचे पावसाने नुकसान केले आहे.

हे देखील वाचा : Nashik News : तुकाराम मुंढे मनपा आयुक्त होणार?

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) ११८.२० हेक्टरवरील द्राक्षबागांना अवकाळीचा फटका बसला आहे, तर नाशिक तालुक्यातील ८३ हेक्टर द्राक्षबागाही त्यामुळे झोपल्या आहेत. दिंडोरीत एकूण १२०.८० हेक्टरवरील पिकांचे, तर नाशिकमध्ये एकूण १८८ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. निफाड व सिन्नरमध्ये प्रत्येकी ९.५० हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा : Nashik Crime : एमडीला दोन हजारांचा भाव; चौघांकडे सखोल तपास

दृष्टीक्षेपातून

नुकसानग्रस्त गावे ६३
नुकसानग्रस्त शेतकरी६७५
नुकसानग्रस्त बागायती क्षेत्र१०७ हेक्टर
नुकसानग्रस्त बहु वार्षिक पिके२२० हेक्टर
नुकसानग्रस्त एकूण क्षेत्र३२७.८० हेक्टर
नुकसानग्रस्त तालुकेदिंडोरी, नाशिक आणि निफाड

या पिकांचे नुकसान

द्राक्ष२१७.३० हेक्टर
डाळिंब३ हेक्टर
भाजीपाला व इतर७६.८० हेक्टर
टोमॅटो२७ हेक्टर
कांदा२ हेक्टर
कांदा रोपवाटिका१.२० हेक्टर

ताज्या बातम्या

Womens T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला...

0
मुंबई | Mumbai एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर मात करून ऐतिहासिक कामगिरी बजावल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघाचे लक्ष टी-२० विश्वचषकावर (Womens T20 World Cup...