
नाशिक | Nashik
शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढत्या खड्ड्यांमुळे (Potholes) नागरिकांचा (Citizen) जीव धोक्यात येत असल्याने अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत नागरिकांचा मृत्यू होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet Meeting) मांडणार असल्याचे सांगितले.
प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मृत (Death) झालेल्यांच्या कुटुंबाला १० लाखांची मदत मिळावी, अशी मागणी करत त्यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्तांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी करावी, असा इशारा दिला. भुजबळांच्या या टीकेवर उत्तर देताना कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त केला.
महाजन म्हणाले, पालकमंत्री (Minister) असो वा नसो, मी नाशिकमध्ये नेहमी हजर असतो. येत्या सहा महिन्यांत नाशिकचा चेहरामोहरा बदलेल आणि सर्व कामे पूर्ण होतील. खड्डे बुजवण्यासाठी पैसे आणि परवानगीची चिंता करू नका, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. ३०-३५ टक्के बिलो टेंडर घेणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाईचा इशारा देत त्यांनी अधिकाऱ्यांना थेट स्पॉटवर राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत.




