Thursday, May 8, 2025
Home Blog Page 12312

धुळ्यात कांद्याला विक्रमी ११ हजारांचा भाव

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे ।

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आज लाल कांद्याची  2 हजार 200 गोणी तर पांढर्‍या कांद्याची 400 गोणी आवक झाली. लाल कांद्याला जास्ती जास्त 11 हजार रूपये क्विंटल तर सरासरी 7 हजार रूपये भाव मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यापासून कांद्याचे भाव तेजीत आहेत. कांद्याच्या वाढत्या भावाने  मध्यवर्गीयांचा वांदा केला आहे.तर सध्या चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी वर्गात  समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान आज येथील बाजार समितीत लाल कांद्याची 2 हजार 200 गोणी आवक झाली. त्याला कमी कमी 500 व जास्तीत जास्त 11 हजार रूपये व सरासरी 7 हजार रूपये  क्विंटल भाव मिळाला.

तर 400 गोणी पांढर्‍या कांद्याची आवक झाली. त्याला कमीत कमी 700 रूपये व जास्तीत जास्त 8 हजार 800 रूपये व सरासरी 6 हजार रूपये भाव मिळाला.

पोलिसाच्या घरावरच चोरट्यांचा डल्ला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लालबहादूर शास्त्रीनगरातील घटना : रोख रकमेसह सव्वातीन लाख लंपास

धुळे –

शहरासह परिसरात चोरट्यांचा धुमाकुळ सुरूच आहे. चोरट्यांनी पुन्हा पोलिस कर्मचार्‍याकडे घरफोडी  पोलिसांना आव्हान दिले आहे. लालबहाद्दुर शास्त्री नगरातील पोलिसा कर्मचार्‍याच्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कमेसह 3 लाख 25 हजारांचा मुद्येमाल लंपास केला आहे.

याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शहरातील नवजीवन ब्लड बँकेच्या मागे लालबहाद्दुर शास्त्री नगरातील प्लॉट क्र. 26/27 मध्ये संजय दादाभाई ठाकुर (वय 43) हे राहतात. ते शिरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात लिपीक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचे देवपूरात राहणारे मेहुणे किरणकुमार अहिरे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यामुळे संजय ठाकुर हे गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह त्याकडे राहत असल्यामुळे त्यांचे घर बंद होते.

ही संधी साधत काल दि. 4 ते 5 दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले उसनवारीचे 1 लाख 20 हजार व आईच्या पेन्शनचे 40 हजार असे एकुण 1 लाख 60 हजार रूपये व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण 3 लाख 25 हजारांचा ऐजव चोरून नेला.

आज सायंकाळी चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी संजय ठाकुर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

शिवानंद कॉलनीत घरफोडी

शहरानजीक असलेल्या मोहाडी उपनगरातील शिवानंद कॉलनीतील शेतकर्‍यांचे बंद घर  फोडून चोरट्यांनी 74 हजारांचा मुद्येमाल लांबविला.

याबाबत मोहाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिवानंद कॉलनीत प्लॉट नं. 8 मध्ये सुरेश नथ्थु हिरे हे राहतात. ते काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असतांना चोरट्यांनी त्यांचे घर फोडून 60 हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने, 10 हजार रूपये किंमतीचा टीव्ही, 4 हजार रूपये किंमतीची देवाची मुर्ती, पितळी भांडे असा 74 हजार रूपयांचा मुद्येमाल चोरून नेला.

सुरेश हिरे घर परतल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यानंतर त्यांच्या घरात चोरी झाल्याचे उघड झाले. याबाबत मोहाडी पोलिसात माहिती देण्यात आली.  फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. श्वान पथकाला बोलविण्यात आले. परंतू श्वानला माग गवसला नाही.

‘जिल्हा नियोजन’ साठी धनराज गाडे यांचा एकमेव अर्ज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

‘मोठ्या निर्वाचन’च्या 3 जागांसाठी 18, लहान निर्वाचन क्षेत्रातील एका जागेसाठी 6 उमेदवारी अर्ज

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा नियोजन समितीच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून (जिल्हा परिषद) रिक्त झालेल्या एका जागेवर राष्ट्रवादीचे धनराज गाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आलेला आहे. यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार आहे. तर मोठ्या निर्वाचन क्षेत्रातून (महापालिका) मुदत संपलेल्या तीन जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल झाले असून लहान निर्वाचन क्षेत्रातील एका जागेसाठी 6 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. जिल्हा नियोजनच्या पोटनिवडणूक आणि रिक्त होणार्‍या जागांसाठी उमेदेवारी दाखल करण्याची मुदत गुरूवारी संपली.

जिल्हा परिषद सदस्य शिवाजी गाडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जिल्हा नियोजनच्या ग्रामीण निर्वाचन क्षेत्रातून त्यांच्या चिरंजीव धनराज गाडे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. यामुळे धनराज गाडे यांची निवड बिनविरोध होणार आहे. बारागावनांदूरच्या जिल्हा परिषद गटातून धनराज गाडे यांची निवड बिनविरोध झाली होती. दरम्यान मनपाच्या क्षेत्रातून 3 जागांसाठी मोठ्या संख्येने 18 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.

यात सर्वसाधारण प्रवर्गातून सुभाष लोंढे, ज्ञानेश्‍वर उर्फ अमोल येवले, सागर बोरूडे, सुनील त्रिंबके, अनिल शिंदे आणि मनोज कोतकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. तर महिला सर्वसाधारण प्रवर्गातून मीना चोपडा, ज्योती गाडे (कर्डिले), संध्या पवार, रुपाली वारे, रिजवान शेख, सुनीता कोतकर, आशा कराळे, सोनाली चितळे यांचा समावेश आहे. याच क्षेत्रातील ओबीसी प्रवर्गातून अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, सुवर्णा जाधव आणि मनोज दुलम यांचा समावेश आहे. दाखल अर्जामुळे नियोजन समितीच्या मोठ्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण होणार आहे.

लहान निर्वाचन क्षेत्रातून (नगरपालिका) सर्वसाधारण प्रवर्गासाठी सूर्यकांत भुजाडी (राहुरी), गणेश भोस (श्रीगोंदा), मंदार पहाडे (कोपरगाव), शहराजी खेतमाळीस (श्रीगोंदा), आसाराम खेंडके (श्रीगोंदा) आणि रमेश लाढणे (श्रीगोंदा) यांचे उमदेवारी अर्ज दाखल आहेत. एका जागेसाठी सहा अर्ज आल्याने याठिकाणी चुरसपूर्ण निवडणूक होणार आहे. यात विशेष करून एकट्या श्रीगोंदा तालुक्यातून चौघा उमेदवारांचा समावेश आहे. दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी होऊन शनिवारी 7 तारखेला अंतिम उमेदवारी यादी तयार करण्यात येणार आहे. या यादीवर हकरती घेण्यासाठी मुदत असल्याने 13 तारखेला उमेदवारांची अंतिम उमेदवारी यादी जाहीर करण्यात येणार असून त्यानंतर 24 तारखेला जिल्हा नियोजनच्या रिक्त झालेल्या आणि मुदत संपलेल्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.

राज्यातील महाविकासआघाडीचा प्रयोग जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत राबविणार असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात महापालिका क्षेत्रातून दाखल अर्ज पाहिल्यास यात सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी एकमेकांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केल्याने नियोजन समितीत महाविकासआघाडीचा प्रयोग होणार नसल्याचे सध्या दिसत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची ऑनलाईन सेवा बंद

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहुरी (प्रतिनिधी) – गेल्या एक महिन्यापासून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे ऑनलाईन पोर्टल बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मराठा समाजातील लाभार्थी तरुणांना बँक प्रकरणासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.
महामंडळाच्या पोर्टलवर संबंधित लाभधारकास आपली वैयक्तिक माहिती देऊन महामंडळाचे पात्रता प्रमाणपत्र काढावे लागते. त्या पत्रासोबत बँकेला देण्यासाठीचे शासनाचे हमीपत्र देखील मिळत होते. परंतु महामंडळाची ऑनलाईन सेवा बंद झाल्यामुळे या योजनेचा लाभ तरुणांना मिळण्यास अडचणी येत आहेत.

दरम्यान, सरकार बदलल्यामुळे ही योजना बंद झाली की काय? अशी शंका मराठा समाजातील तरुणांच्या मनात निर्माण होत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची योजना लवकर चालू करावी, अशी मागणी मराठा समाजातील व्यवसायिक तरुणांकडून करण्यात येत आहे.
मराठा समाजातील होतकरू तरूणांना व्यवसाय वाढीसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून बिगरव्याजी कर्जपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत लाभधारकाला बँकेकडून विनातारण व विना जामीनदार अशी तरतूद करण्यात आली आहे. कर्जाची संपूर्ण हमी शासनाने घेतलेली आहे.

योजना सुरू झाल्यानंतर महामंडळाच्या योजना राबविण्यास बँका टाळाटाळ करत होत्या. बँका महामंडळ योजनेअंतर्गत कर्जप्रकरणे देण्यास टाळाटाळ करतात म्हणून मराठा संघटनांच्या वतीने मध्यंतरी आंदोलने देखील करण्यात आली होती. सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्याची दखल घेत महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व बँक अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यानंतर बँक कर्ज देण्यास अनुकूल झाल्या होत्या. मात्र, आता ऑनलाईन सेवा बंद झाल्याने मराठा समाजातील तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे. तेव्हा महामंडळाची ऑनलाईन सेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी मराठा तरुणांकडून करण्यात आली आहे.

तांत्रिक अडचणीमुळे पोर्टल बंद
अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना ही बंद करण्यात आलेली नाही. महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. ऑनलाईन पोर्टलवर काही तांत्रिक दुरूस्तीचे काम चालू आहे. त्यामुळे पोर्टल बंद ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच ऑनलाईन नावनोंदणी सुरू होणार आहे. ज्या लाभधारकांना योजने अंतर्गत कर्ज मिळाले आहे, त्यांची महामंडळाच्या ऑनलाईन पोर्टेलवर पुढील दस्तावेज नोंदणी चालू आहे.
देवेंद्र लांबे,
समन्वयक-मराठा एकीकरण समिती

दहावी-बारावीच्या मार्कशीटवरुन ‘नापास’ हद्दपार!

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (वार्ताहर) – राज्याच्या माध्यमिक, उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता दहावी व बारावीचे विद्यार्थी तीनपेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रगती पुस्तकावर यापुढे अनुत्तीर्ण असा शेरा दिला जाणार नाही. त्याऐवजी कौशल्य विकास पात्र असा शेरा नोंदविण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

यावर्षीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना दहावी-बारावीच्या परीक्षेत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा शासनाचा विचार होता. त्यानुसार इयत्ता दहावी, बारावीत नापास होणार्‍या विद्यार्थ्यांना यापुढे कौशल्यविकास पात्र असा शेरा मिळाल्याने त्या विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण मिळण्याचा लाभ होणार आहे.

राज्यात कौशल्य विकास संबंधित सर्व योजना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी ही संस्था म्हणून काम पाहणार आहेत. यासाठीचा कार्यक्रम राज्य कौशल्य विकास सोसायटी व महाराष्ट्र राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहेत. यासाठी दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्तर-1 व स्तर-2 पूर्ण करणे आवश्यक आहे. इयत्ता बारावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्तर-3 व स्तर-4 चार पूर्ण करणे आवश्यक असणार आहेत.

कौशल्य विकास योजनेसाठी लाभार्थी
कौशल्य विकास कार्यक्रमासाठी लाभार्थी ठरविताना इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत 3 पेक्षापेक्षा अधिक विषयांत अनुत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. तो विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे. या योजनेचा लाभ घेऊ पाहणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा अधिक असता कामा नये.

विद्यार्थ्यांना प्रशिक्षण खर्चापोटी 70 टक्के अनुदान
किमान कौशल्य कार्यक्रमांतर्गत प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांची प्रशिक्षण वर्गात 75 टक्के उपस्थिती दर्शवली असेल तर त्याच्या खर्चाची टप्पानिहाय प्रतिपूर्ती करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 टक्के उपस्थिती असल्यास 30 टक्के शुल्क विद्यार्थ्यांनी भरणे आवश्यक असणार आहे. दुसर्‍या टप्प्यात 60 टक्के उपस्थितीची अट लावण्यात आली असून, उमेदवाराचे कौशल्याचे मूल्यांकन प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर 60 टक्के रक्कम प्रशिक्षण संस्थेला अदा करण्यात येणार आहे. तर तिसर्‍या टप्प्यात 10 टक्के उपस्थिती निकष निश्‍चित केला असून उमेदवाराने पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला असल्यास व तशी कागदपत्रे सादर केल्यास उर्वरित निधीचा टप्पा संस्थेचा दिला जाणार आहे. या प्रशिक्षणासाठीचा सत्र खर्च शासनाच्यावतीने उचलण्यात येणार आहेत.

या संस्थांवर असेल जबाबदारी
कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने राज्यातील संस्थांची जबाबदारी निश्‍चित करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांची निवड निश्‍चित करण्याबरोबर मूल्यमापन करण्याची प्रक्रिया देखील निश्‍चित करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, महाराष्ट्र व्यवसाय प्रशिक्षण परिषद, जिल्हा कौशल्य कार्यकारी समिती यांचा समावेश असणार आहे.

प्लॅस्टिक वापराविरुद्ध मोहीम, लाखाचा दंड वसूल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – आयुक्त खमक्या असल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी कसे काम करतात, याचे उदाहरण गुरुवारी नगरकरांना दिसले. दुपारी आदेश देताच प्लॅस्टिविरोधात मोहीम हाती घेत जवळपास एक लाख रुपयांचा दंड कर्मचार्‍यांनी वसूल केला. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी आता महापालिका कर्मचार्‍यांना आपल्या घरी घरगुती खत प्रकल्प करण्यासाठी सक्ती केली असून, त्याचे छायाचित्र आस्थापना विभागाकडे सादर करण्याचे आदेश दिल्याने सर्वच कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार प्लॅस्टिक वापरावर बंदी असतानाही अहमदनगर शहरात खुलेआम प्लॅस्टिक विक्री व प्लॅस्टिकचा वापर सुरू आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी महापालिकेची धुरा हाती घेतल्यानंतर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले. गुरुवारी दुपारी सर्व स्वच्छता निरीक्षकांना पाचारण करून प्लॅस्टिक बंदीची मोहीम तीव्र करतानाच दंडात्मक कारवाईचे आदेश दिले होते. कर्मचार्‍यांनीही लगेच कठोर अंमलबजावणीला सुरुवात करून गुरुवारी (दि.5) दिवसभरात तब्बल 91 हजार 250 रुपयांचा दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या या आक्रमक कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

स्वच्छता सर्वेक्षणाच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी बुधवारी (दि. 5) बैठक घेतली. यात प्लॅस्टिक बंदीच्या अंमलबजावणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करुन स्वच्छता निरीक्षकांना कारवाई सुरू करण्याची तंबी दिली होती. प्रत्येक स्वच्छता निरीक्षकाला उद्दिष्टही देण्यात आले आहे. त्यानुसार पथक स्थापन करून शहरात तपासणीसाठी छापेमारी करण्यात आली. दिवसभरात प्लॅस्टिक वापरणार्‍यांवर धडक कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकही जप्त करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या आदेशानुसार व उपायुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. अनिल बोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सामल, के. के. देशमुख, आर. एल. सारसर, पी. एस. बीडकर, ए. व्ही. हंस, एस. ई. वाघ, बाळासाहेब विधाते, टी. एन. भांगरे आदींनी ही कारवाई केली.

दुसरीकडे स्वच्छ सर्वेक्षणात थ्री स्टार मिळविण्याच्या दिशेनेही आयुक्त द्विवेदी आक्रमक झाले आहेत. शहरातील ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी घरगुती खत प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात जोर लावण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या कर्मचार्‍यांना घरगुती खत प्रकल्प सक्तीचे करण्यात आले आहेत.

आपल्या विभागप्रमुखांकडून याबाबत मार्गदर्शन घेऊन तातडीने हे प्रकल्प सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच या प्रकल्पाचे छायाचित्र आस्थापना विभागाकडे सादर करण्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच स्वच्छता अ‍ॅपचा प्रभावी वापर करण्याचेही सांगण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचार्‍याने किमान दोन तक्रारी या अ‍ॅपवर टाकून विभागप्रमुखांनी आपला अहवाल आस्थापना विभागाकडे सादर करावयाचा आहे.

तर वेतन नाही…
स्वच्छ सर्वेक्षणाबाबत द्विवेदी प्रचंड आग्रही आहेत. ते कर्मचार्‍यांना केवळ सूचना देऊन थांबले नाहीत, तर झालेल्या कामांढचे वस्तुनिष्ठ पुरावे व अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. तसेच या कामांची अंमलबजावणी न झाल्यास डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार नसल्याची तंबीही दिली आहे. यामुळे महापालिका कर्मचार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

तत्कालीन कुलगुरु, कुलसचिवांची चाैकशी करण्याचे आदेश

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

जळगाव – 

कवियत्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील हिंदी विभाग प्रमुख डाॅ.बापूराव देसाई यांच्याविरुद्ध प्रा.मुक्ता महाजन लैगिंक अत्याचार प्रकरणाची तक्रार  दाखल झाली हाेती. 

या प्रकरणात प्रा.देसाई यांना बडतर्फे करण्यात अाले हाेते. त्याविरुद्ध प्रा.देसाई यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली हाेती. त्यांची चाैकशी हाेऊन प्रा.देसाई यांनी निर्दाेष मुक्तता झाली हाेती. 

दरम्यान, या प्रकरणात २६ जणांविरुद्ध गुन्हा  दाखल करण्याची मागणी प्रा.देसाई यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल करुन केली हाेती. न्यायालयाने या प्रकरणाच्या चाैकशीचे आदेश दिले आहे .

तत्कालीन प्रभारी कुलगुरु शिवाजीराव पाटील, तत्कालीन कुलसचिव राजकिशाेर गुप्ता, तक्रारदार मुक्ता महाजन, विद्यामान व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांच्यासह २६ जणांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रा.देसाई यांनी केली हाेती. 

परंतु कनिष्ठ न्यालयालयाने हा खटला फेटाळून लावला. त्याविराेधात प्रा.देसाई यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला. त्यांची न्या.एस.जी. ठुबे यांच्यासमाेर  सुनावणी झाली. 

न्यायालयाने प्रा.देसाई यांचा अर्ज मंजूर करुन फाैजदारी दंडसंहिता कलम २०२ प्रमाणे पाेलिस चाैकशीचे अादेश दिले. डाॅ.देसाई यांच्यातर्फे अॅड.संदीप कापसे यांनी काम पाहिले.

उद्या ना. बाळासाहेब थोरात यांचा नाशिक दौरा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे नवनियुक्त कॅबिनेट मंञी नामदार बाळासाहेब थोरात  यांचे उद्या शुक्रवार दि.६ डिंसेबर रोजी सकाळी ९.४५ वाजता पोलिस परेड ग्राउंड,नाशिक येथे हेलिकॅाप्टर व्दारे आगमन होत आहे.त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे-

स.९.४५ वाजता – पोलिस परेड ग्राउंड,नाशिक येथे आगमन

स.९.५० वाजता – गोल्फ क्लब शासकीय विश्रामगृह,नाशिक येथे आगमन

स.१०.३० वाजता – कै.तुकारामजी दिघोळे यांच्या निवासस्थानी भेट

सकाळी ११.०० वाजता- पोलिस परेड ग्राउंड येथुन हेलिकॅप्टरने धुळे जिल्ह्याकडे प्रयान

नाशिक जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या सर्व आजी/माजी पदाधिकारी,लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते  उपस्थित राहणार  असल्याची माहिती  प्रा.ज्ञानेश्वर गायकवाड यांनी दिली.

दहावी, बारावीत ‘नापास’ शेरा नाही; अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’चा उल्लेख

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

दहावी, बारावीच्या परीक्षा आयुष्याला वळण देणारा मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्यांच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा नापास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी शासनाने ‘कौशल्य सेतू’ कार्यक्रम योजना राबवण्यास मान्यता दिली आहे.

त्यानुसार दहावी, बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये उत्तीर्ण (पास) न होऊ शकणार्‍या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण (नापास) शेरा न मारता ‘कौशल्य विकासास पात्र’ असे नमूद करण्यात येणार आहे. राज्य सरकारने क्रीडा व शालेय शिक्षण विभागाला याबाबत सूचना दिल्या असून नापास होणार्‍या विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेची राज्यस्तरीय अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेमार्फत करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

त्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत कौशल्य विकास व उद्योजकता, शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवस्तरावरील अधिकार्‍यांचा समावेश राहणार आहे. कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर शैक्षणिक वर्ष 2018-19 पासून घेण्यात आलेल्या दहावी, बारावीच्या परीक्षेत तीन किंवा त्याहून अधिक विषयात अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी संबंधित विद्यार्थ्याने स्वतःहून नोंदणी करणे आवश्यक आहे.

या नोंदणीसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत देण्यात आलेले परीक्षा प्रवेशपत्र किंवा विद्यार्थी अनुत्तीर्ण असलेली गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी कौशल्य विकास सोसायटी, राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदअंतर्गत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षण संस्था निवडता येतील. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची प्रशिक्षण वर्गातील किमान 75 टक्के उपस्थिती असल्यास तो / ती मूल्यमापनास पात्र राहिला. मूल्यमापनानंतर यशस्वी उमेदवारांना त्यांनी निवड केलेल्या अभ्यासक्रमानुसार शिक्षण मंडळ किंवा व्यवसाय प्रशिक्षण परिषद यांचेमार्फत प्रमाणपत्र वितरीत करण्यात येईल.

’कौशल्य सेतू’ अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या प्रमाणपत्र परीक्षेसाठी ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस्चा लाभ देण्याबाबत शिक्षण मंडळाचे नियम लागू असतील. भाषा विषय वगळता अन्य कोणत्याही विषयांऐवजी स्किल कोर्स केल्यावर या विद्यार्थ्यांना ट्रान्सफर ऑफ क्रेडिटस्चा लाभ घेता येणार आहे.

Video: नगर जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी