Sunday, May 4, 2025
Home Blog Page 12323

नांदगाव : बांधून आभाळगाठी.. धान्याच्या शोधासाठी ‘तांडा’ चालला…

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नांदगांव। संजय मोरे
नांदगाव तालुक्यातील ऊसतोड कामगार आपल्या परिवारासह बैलगाड्या ,टँक्टर ,ट्रकमध्ये आपल्याला लागेल संसारबांधून कारखान्याच्या दिशेने निघालेल्या चित्र सध्या खेड्यात दिसत आहे.ऊसतोड कामगारांना जगण्यासाठी ऊसतोडीच्या आधाराने मजुरांना कारखान्याकडे धावाधाव सुरु केली आहे. त्यामुळे अनेक खेडी ओसाड पडू लागल्याने विदारक चित्र पाहायला मिळत आहे.

यंदा पावसाने तालुक्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. पावसाने भिजल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. नांदगाव तालुक्यात मका, कांदा, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे तालुक्यात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. तालुक्यातील खेड्यामध्ये दमणगंगा व नारपार प्रकल्पाचे पाणी आले तर तालुक्यात सिंचनाचा प्रश्न सुटल्यावर ऊसतोडी कामगारांना कारखान्याचा आधार घेण्याची गरज भसणार नाही.

ऊसतोडीचा हंगाम सुरु झाल्याची संधी साधुन आपल्या कुटुंबासह जनावरांचाही व रोजीरोटीसाठीचा प्रश्न सुटणार आहे. म्हणून ऊसतोड कामगार कारखान्याकडे सर्वांची धावधाव सुरु झाली आहे. आपल्या परिवारासह बैलगाड्या, टँक्टर व ट्रकमध्ये संसारबांधून कारखान्याच्या दिशेने निघालेल्या तांड्याचे चित्र सध्या खेड्यात दिसत आहे. घरातील वयोवृद्ध व शाळेत जाणारी मुले घर सांभाळण्यासाठी गावात दिसत आहेत.

नगर, पुणे, सोलापूर, बारामती, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यासह थेट गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यात टँक्टर, ट्रकने गावागावातील आपल्या परिवारासह व बैलगाड्यासह जथ्येच्या जथ्ये निघाले आहेत. बैलगांड्याच्या रांगाच रांगा रस्त्याने जातांना दिसत आहे. जवळपास ४० ते ५० टक्के लोक तालुक्यातील ग्रामीण भागातुन निघाल्याचा अंदाज नागरिकांच्या चर्चातुन समजते.

कांंदा व कापूस उत्पादकांची होणार कोंंडी
तालुक्यातील बहुतांश शेतमजूर ऊसतोडणीसाठी बाहेर जिल्ह्यात जात आहे. रोजगारासाठी स्थलांतर असल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठी कोंंडी होत असते. सध्या कांदा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तसेच कापूस वेचणीचे काम सुरू आहे. मात्र तालुक्यातील कामगार मोठ्या प्रमाणात बाहेर जात असल्याने शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतमुळे नांदगाव बाजारपेठेवर मोठा परिणाम जाणवणार आहे.

ऊसतोड कामगार ४ते ५ महिने पोटाची खळगी भरण्यासाठीआपल्या कुटुंबसह जातात. ऊसतोड मजुरांचे या गावाहून त्या गावाला मजुरांचे आठ ते पंधरा दिवसांत स्थलांतर होत असते. अनेक ठिकाणी शाळांची सोय नसल्याने ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असते. ट्रक, टँक्टरने तालुक्यातील वाड्यावस्ती व रस्त्यावर हजर होतात.

चोरीची वीज कट केल्याने दोघा वायरमनला मारहाण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- चोरीची वीज कट केल्याने दोघा वायरमनला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना बोल्हेगाव येथे घडली. याप्रकरणी मारहाण करणारे सुनील नारायण तांबे, निरज सुनील तांबे (रा. बोल्हेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन बाळासाहेब बोरूडे (वय- 28 रा. बोल्हेगाव ता. नगर) व रवी बाळासाहेब कराळे हे दोघे वायरमन शुक्रवारी (दि. 29) बोल्हेगाव परिसरात काम करत होते. साडेचारच्या सुमारास भारत बेकरीच्या पाठीमागे चोरून वीज वापरत असल्यांचे त्यांच्या निदर्शनास आले.

त्यावेळी बोरूडे व कराळे यांनी चोरीची वीज कट केली. वीज कट केल्यामुळे सुनील तांबे व निरज तांबे यांनी दोघा वायरमनला लोखंडी गजाने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवीगाळ व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी बोरूडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुनील तांबे व निरज तांबे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मुंडे हे करीत आहेत.

जागतिक एड्स दिवस : ‘एड्सबाधित’ ५०१ गर्भवतीनी दिला ४७८ निरोगी बालकांना जन्म

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

भारत पगारे
एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी एक हजाराहून अधिक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सेक्स वर्कर्सपासून ते ट्रक ड्रायव्हर व तृतीयपंथींपर्यंत व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या काही वर्षांत एचआयव्हीच्या नवीन संसर्गाचे प्रमाण अतिशय कमी होण्यास मदत मिळणार आहे. हे चित्र आशादायक आहे.

नाशिकमध्येही गेल्या सात वर्षांत एचआयव्हीबाधित मातांच्या 501 बाळांपैकी केवळ 23 बाळांनाच आजाराची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. एचआयव्हीबाधित गर्भवतींना ‘एआरटी’चे तत्काळ उपचार सुरू करण्यात आल्याने त्यांच्या गर्भातील बाळांना या गंभीर आजाराची लागण झाली नसल्याने आढळून आले आहे.

सर्व प्रकारच्या प्रयत्नांमुळेच एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण कमी-कमी होत आहे. मोजक्या दशकांपूर्वी भारतात दरवर्षी तब्बल दोन ते अडीच लाख नवीन व्यक्तींना एचआयव्ही संसर्ग होत होता आणि यामध्ये रक्त व रक्तघटकांच्या संक्रमणाद्वारे होणार्‍या संसर्गाचे प्रमाण 10 टक्क्यांवर होते. आज दरवर्षी नवीन व्यक्तींना होणार्‍या संसर्गाचे प्रमाण 80 हजारांवर आले आहे आणि रक्तघटकांच्या संक्रमणाद्वारे होणार्‍या संसर्गाचे प्रमाणदेखील एक टक्क्यावर आले आहे.

अर्थातच, त्यासाठी जनजागृतीच कारणीभूत ठरली आहे. केवळ रक्ताद्वारे नव्हे एचआयव्हीबाधित गरोदर मातेकडून जन्मणार्‍या नवजात बाळास होणार्‍या संसर्गाच्या प्रमाणातही उल्लेखनीय घट झाली आहे आणि त्यासाठी एचआयव्ही विषाणूचे प्रमाण (व्हायरल लोड) कमी करणारी प्रभावी उपचार पद्धती खूप उपयुक्त ठरत आहे. त्याचाच भाग म्हणून आता काही कोटी गरोदर मातांची एचआयव्ही तपासणी आवर्जून केली जात आहे आणि मातेकडून मुलास होणार्‍या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यात यश आले आहे.

दुसरीकडे राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेच्या (नॅको) निर्देशांनुसार महाराष्ट्रात ‘एचआयव्ही’बाधितांची नोंदणी होऊन उपचार सुरू आहेत. प्रत्यक्षात तीन लाख रुग्णांची नोंदणी होऊनही त्यापैकी सुमारे 63 हजार रुग्ण अद्याप मोफत विषाणू प्रतिबंधक उपचारापासून (एआरटी) दूरच असल्याचे वास्तव समोर आले आहे. 1998 सालापासून आतापर्यंत राज्यात सुमारे 70 हजार रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. नोंदणी केलेल्यांपैकी उपचारार्थींसह अन्य रुग्णांमधील हरवलेल्या रुग्णांची शोधमोहीम घेतल्यानंतर ही बाब समोर आली. नाशिक जिल्हा रुग्णालय व येथील ग्रामीण तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार घेणारे बाधित उत्तर महाराष्ट्रातून येतात.

त्याची आकडेवारी पाहिली तर, दरवर्षी बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. नाशिक जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 15 वर्षांत म्हणजेच सन 2005 पासून ऑक्टोबर 2019 पर्यंत 17 लाख 18 हजार 443 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील 20 हजार 860 जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच या रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेषो 6. 11 वरून आजमितीस 0.35 पर्यंत पोहोचला आहे.

असुरक्षित लैंगिक संबंधांमुळेच सर्वाधिक प्रमाणात एचआयव्हीचा संसर्ग होत आहे. आजही तिच परिस्थिती आहे. रक्ताद्वारे आणि मातेकडून मुलाला होणार्‍या संसर्गाचे प्रमाण फार कमी झाले आहे आणि विषाणूचा 95 टक्के संसर्ग हा केवळ लैंगिक संबंधातूनच होतो असल्याचे लक्षात आले आहे.

राज्यात सध्या 3 लाख 16 हजार 784 एचआयव्ही बाधितांची नोंदणी झाली आहे. नोंदीच्या रुग्णांपैकी 2 लाख 12 हजार 764 रुग्ण सध्या उपचारासाठी ‘फॉलोअप’ घेत आहेत. त्यापैकी 2 लाख 11 हजार 569 रुग्ण प्रत्यक्षात ‘एआरटी’ केंद्रावर जाऊन उपचार घेत आहेत. 1998 सालापासून या रुग्णांची नोंदणी करण्यात येऊ लागली. ही आकडेवारी पाहता तेवढ्या रुग्णांना उपचार मिळत नसल्याचे समोर आले.
एचआयव्ही बाधितांसाठी आजच्या घडीला सर्वांत प्रभावी औषध म्हणजे ‘डोल्युटेग्रॅव्हिर’ (डीटीजी) हे असल्याचे सिद्ध झाले आहे.

येत्या काही काळात देशातील 600 एआरटी सेंटरवर ही औषधी मोफत उपलब्ध केली जाणार आहे. या नवीन औषधाचे दुष्परिणाम कमीत कमी आहेत आणि फार कमी कालावधीत ‘व्हायरल लोड’ कमी करण्याची क्षमता या औषधाची सर्वाधिक आहे. त्यामुळे फर्स्ट लाईन, सेकंड लाईन व थर्ड लाईन ट्रिटमेंटमध्ये या औषधांचा उपयोग रुग्णांना होणार आहे.

एचआयव्हीची लागण झालेल्या रुग्णाने डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घेणे आवश्यक आहे. सुरू असलेल्या ट्रिटमेंटमध्ये सातत्य ठेवले तर, चांगले आयुष्य जगू शकतो. व्हायरस वाढत नाही. काळजी करू नका, काळजी घ्या. नियमित औषधे घ्या.
-डॉ. सुनील ठाकूर, बालरोग तज्ज्ञ व वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, एआरटी सेंटर, नाशिक.

पथकाने मॅटर्निटी होम येथे जनजाग़ृती केली आहे. नवजात बाळांना संसर्गापासून वाचविण्यात आले आहे. कुणालाही या संसर्गाबद्दल मनात शंका असेल त्यांनी आयसीटीयू केंद्रात तपासणी करावी. नाव व अन्य माहिती गोपनीय ठेवली जाते.
-डॉ. योगेश परदेशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स नियंत्रण पथक, नाशिक.

कर्जत : ताजु येथे विद्यार्थ्यांनी भरवला बाजार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कुळधरण (प्रतिनिधी)- कर्जत तालुक्यातील ताजू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दफ्तरमुक्त शनिवार उपक्रमांतर्गत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शाळेत बाजार भरवला. मुख्याध्यापक दिपक सुपेकर तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बाजार भरवला. या उपक्रमाला ताजू ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत पालेभाज्या,फळभाज्या व इतर वस्तूंची खरेदी केली. या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक करण्यात येत आहे.

ताजू शाळेत प्रथमच भरवण्यात आलेल्या बाजाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.शालेय विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री व्यवहाराचे ज्ञान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला.बाजारात मुलांनी भाजीपाला,फळे, कडधान्य,खाद्यपदार्थ यासह विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या.स्वतःच्या शेतात पिकवलेला माल विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणला होता. या उपक्रमामुळे शाळा परिसराला बाजाराचे रुप आले होते. ग्रामस्थांनी उस्फूर्त खरेदी करून विद्यार्थ्यांना चांगला प्रतिसाद दिला.

Fadnavis elected Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

MUMBAI:

Former Chief Minister Devendra Fadnavis was on Sunday elected unopposed as the Leader of Opposition in Maharashtra Legislative Assembly. Speaker Nanabhav Patole announced the name of Mr Fadnavis to the prestigious post, amid applause and thumping of desks by the ruling Maha Vikas Aghadi members and the Opposition benches.

Chief Minister Uddhav Thackeray and other leaders like Jayant Patil, Eknath Shinde and Balasaheb Thorat congratulated Mr Fadnavis and welcomed his election to the post. The 49-year-old was elected as the first-ever BJP CM of the state in October 2014 and later sworn-in again in November 2019, along with NCP’s Ajit Pawar as Deputy CM.

However, the two-man government collapsed in barely 80 hours, paving the way for the Shiv Sena-Nationalist Congress Party-Congress’ MVA regime. Fadnavis hails from Nagpur and was elected as Nagpur Municipal Corporation Mayor for five years in 1997 – the second youngest ever in India.

मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा ! विधानसभेत फडणवीसांचा शायराना अंदाज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : ‘मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी म्हणत विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपल्या आगमनाचे भाकीत केले आहे. विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात घोषणा केली, त्यानंतर भाजपा सदस्यांसह सर्वच सदस्यांनी बाके वाजवुन त्यांचे स्वागत केले. सत्ताधारी पक्षांनी गेल्या काही दिवसात राज्यात घडलेल्या राजकीय परिस्थितीची आठवण करुन देत देवेंद्र फडणवीस यांना राजकीय चिमटे काढले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही या वेळी फडणवीस यांना टोले मारायची संधी सोडली नाही…

आपण तर गेले २५-३० वर्षे एकत्र आहोत. मित्र होते ते विरोधात बसलेत, तुम्ही मित्रत्व जपले असते तर आज मी घरात बसुन विधीमंडळाचे हे प्रक्षेपण पाहीले असते पण आता विरोधी पक्ष सोबत आलेत आणि मित्र विरोधी बाकांवर बसलेत असा टोला मारत या अर्थाने खरे तर विरोधक कुणीच नाही. विरोधी पक्षनेता माझा मित्रच आहे, तेव्हा दोघांमध्ये अंतर ठेवायला नको. कोणाचे वाभाडे काढण्याची आपली परंपरा नाही,’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या ठरावावेळी केले.

‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ असे फडणवीस म्हणाले होते, पण मी पुन्हा येऊन कुठल्या जागेवर बसेन हे मात्र त्यांनी सांगितले नव्हते. ते सभागृहात पुन्हा आले आहेत, केवळ जागा बदलली आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते जयंत पाटील यांनी फडणवीस यांच्यावर शेलकी टीका केली. संसदीय लोकशाहीत मुख्यमंत्री पदा इतकेच विरोधी पक्षनेतेपदही महत्वाचे असते, त्यामुळे फडणवीस आपली ही जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडतील, यात आम्हाला शंका नाही, अशा शब्दात पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

अभिनंदनाच्या प्रस्तावाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की प्रेमाचे, जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध राजकारणापलिकडे असतात. ‘जनतेकडून त्यांच्या मनात ज्या आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत; तसेच मुख्यमंत्र्यांच्याही महाराष्ट्राच्या विकासासाठी काही योजना असतील, त्या सर्वांसाठी आम्ही त्यांना सहकार्य करू,’ मात्र जेव्हा जेव्हा सरकारचे नियमानुसार काम होणार नाही तेव्हा आसुड ओढल्याशिवाय रहाणार नाही, विरोधी पक्ष म्हणजे केवळ शत्रु नाही, तर वैचारीक विरोधक म्हणुन एकमेकाच्या विरोधात बसलो आहोत, मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो, पण वेळापत्रक सांगितलं नव्हतं, त्यामुळे वाट पाहा…अशा शब्दांत विधानसभेतील फडणवीस यांनी त्यांच्यावरील टीकेला सभागृहात उत्तर दिले

.’मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट के वापस आऊंगा,’ अशा कवितेच्या ओळी त्यांनी म्हटल्या. ‘लोकशाहीत अशा अनेक गोष्टी घडत असतात. ७० टक्के मार्क मिळूनही आम्ही मेरिटमध्ये आलो नाही, ४० टक्के मिळालेले तिघे १२० टक्क्यांनी मेरिटमध्ये आले,’ अशा शब्दांत फडणवीस यांनी नव्या सरकारच्या आघाडीची आकडेमोड केली.मुख्यमंत्र्यांनी कधीही आवाज दिला तरी जनतेच्या प्रश्नासाठी आपली भुमिका सकारात्मक असेल असेही त्यांनी या वेळी सांगितले..

शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक। शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून विविध ठिकाणांवरून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी पंचवटी, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

संजय जामराव गढरी (रा. शिवाजीनगर, सातपूर) हे गेल्या बुधवारी (ता.27) रविवारी कारंजा येथे गेले असता, पेठे हायस्कूलसमोर पार्क केलेली त्यांची 11 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 15 सीडब्ल्यु 9648) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर आधार ठाकरे (रा. सांजोरी, ता.धुळे) यांची 15 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर दुचाकी (एमएच 18 एल 8245) गेल्या 23 नोव्हेंबर रोजी नेहरु गार्डनसमोरून रमाबाई आंबेडकर वसतिगृहाच्या गेटसमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन अनिल थेटे (रा. बायजाबाई छावणी, रामवाडी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची 20 हजार रुपये किमतीची अ‍ॅॅक्टिवा दुचाकी (एमएच 15 इडी 2939) गेल्या 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्री राहत्या घरापासून अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mudray Yuva felicitates social activists with Maitri Sanman

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NEW NASHIK:

Celebrating its third fondation day, social organisation Mudray Yuva Foundation honoured social workers, institutions for their exemplary contribution in the social field. In a state-level award presentation ceremony held here, chief guest and famous actress Ashu Surpur, international athlet Monika Athare, Mrs India International Shilpi Avasthi, model Sandesha Patil, senior PI Shripad Paropkari and Adv Atul Sanap were present.

Apart from Nashik, social activists and institutions from Mumbai, Dhule and Thane were honoured with Maitri Sanman, given by Mudray Yuva Foundation. The foundation honours individuals, institutions for their immense contribution in the social arena.

Aditi Deore and Sunil Pardeshi anchored the programme, while Shivanjali Yuvak Mitra Mandal, Eknishtha Foundation, Aasra Foundation, Nisargsevak Yuva Manch, Aai Godamai Sanstha (Nashik), Chhava Sanghatana, Daivat Foundation among others took initiative. Kavita Patil proposed a vote of thanks.

Maitri Sanman awardees: Kiran Patil, Rahul Wagh, Vishwas Ahire, Pintu Thorat, Chetan Sonar, Suresh Shirude, Pritam Bhamare, Sagar Bodke, Vishal Patil, Ashwini Baviskar, Kachru Vaidya, Vikas Sonje, Ashwini Choumal, Sachin Mahajan, Shivam Patil, Vijay Ingale, Sunita Patil, Bharati Devkar, Ayesha NGO, Vaishali Chavan, Suvarna Vishwasrao and M D Mhatre among others.

भूमिपुत्रांना रोजगारासाठी विशेष कायदा आणणार – राज्यपाल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : ‘भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासंदर्भात आरक्षणााचा विशेष कायदा आणणार असल्याचे आश्वासन राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानसभेत दिले. तसेच अवकाळी पावसामुळे आणि महापुरामुळे झालेल्या नुकसानीस आर्थिक साहाय्य देण्यासाठी शासन वचनबद्ध असेल असेही त्यांनी यावेळी आश्वासन दिले. महत्वाचे म्हणजे राज्यपालांनी मराठीतून अभिभाषण केले.

ते विधानसभेत सुरु असलेल्या विशेष अधिवेशना दरम्यान बोलत होते. सकाळच्या सुमारास विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदी नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. त्यानंतर संध्याकाळी ०४ वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिभाषण केले.

ते यावेळी म्हणाले कि बेरोजगारांना नोकऱ्या उपलब्ध करुन देणारा असून भूमिपुत्रांसाठी आरक्षण ठेवण्यासाठी कायदा करणार आहोत, त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जाणार असल्याचे त्यांनी अभिभाषणात सांगितले. मुख्यमंत्री रस्ते निर्माण योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, अल्पदरात वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालये महाविद्यालये देखील निर्माण केले जातील असेही त्यांनी सांगितले.

Fitness first for people at city’s jogging tracks, gyms

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK ROAD:

As the city’s temperature level has been hovering around 15.0 degrees Celsius for the past several days signalling colder days ahead, the Nashikites having greater awareness about fitness and healthier lifestyle are wasting no time in approaching to their nearest jogging tracks, green gyms to reap benefits out of regular exercise which is healthier especially during winter.

A number of women enthusiasts working out at playgrounds, jogging tracks and green gyms this season is significant due to increasing health awareness among them. The children, on the other hand, giving preference to cricket, football and kabaddi, while the tiny-tots flocking public parks.

Joining a gym or any other fitness facility is one way to beat the cold because training indoors cancels out the cold weather. There are cardio machines, treadmills, bicycles, ellipticals, rowing machines, stair masters, weight machines, free weights and group training classes the gym lovers are now preferring as their best fitness mantra.

Some jogging tracks in the city are playing the role of an entertainer and motivating the joggers. In some tracks, there are music systems installed so that joggers can listen to music while running. Golf Club ground, Indiranagar jogging track, Nashik Road playground behind Mukti Dham and Shikharewadi ground in the city, in particular, are now flooded with gym lovers to keep themselves fit and healthy.