Saturday, May 3, 2025
Home Blog Page 12322

इगतपुरी : पूर्व भागात भात कापणी अंतिम टप्प्यात; रब्बीसाठी शेतकरी सज्ज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

इगतपुरी : तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची भात कापणी शेवटच्या टप्प्यात असून लवकरच रब्बी पिकांच्या कमला वेग येणार आहे.

दरम्यान जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले. असेंक पिकांचे नुकसान झाले. यामध्ये अंतिम टप्प्यातील भात कापणीसाठी आलेले भाताचे पीक शेतात पाणी असल्याने सोडून गेले. परिणामी उत्पादनावर परिणाम झाला. यातून उभारी घेतलेल्या भातपिकांची सध्या कापणी सुरु असून मजुरांद्वारे काम करावे लागत आहे. यासाठी भात कापणी यंत्राचा वापर न करता २५० रुपये रोज व एक वेळेचे जेवण व जेवण न देता ३०० रुपये कोरडा रोज देऊन रोजंदारीने मजूर आणून हाता तोंडाशी आलेली भात सोंगनी करावी लागली.

काही ठिकाणी अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे अतोनात नुकसान केले. यामध्ये शेतकऱ्यांना द्राक्ष बागा तोडाव्या लागल्या. उरलेल्या द्राक्षबागा वाचविण्यासाठी शेतकरी जीव ओतुन प्रयत्न करीत आहेत. दिवसाची सुरवात होण्याआधीच औषध फवारणीच्या कामकाजाला सुरवात केल्याचे दिसुन येत आहे .रात्री उशिरापर्यंत शेतकरी शेतात पिकांकडे लक्ष देवून असतात. परतीच्या पावसाने शेतीचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झालेले आहे .

अनेक भागांत भौगोलीक रचनेनुसार खरीप हंगाम जोरात होत असला तरी रब्बी मात्र जोरदार होत नाही. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने प्रथमच रब्बी हंगाम जोरात सुरु झाला आहे. रब्बी हंगामात गहु, हरभरा, कांदे ही प्रमुख नगदी पिके घेतली जातात. यंदा पाऊस चांगला पडल्यामुळे रब्बीतही भाजीपाला फळभाज्या घेण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. अवकाळी पावसाने उन्हाळ कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांद्यासाठी शेती पडून राहण्यापेक्षा अनेक शेतकरी गहु, हरभरा या पिकांना पसंती देत आहेत.

भात शेतीत ओलावा व पाणी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना भात कापणी, हारवेस्टर मशीन ऐवजी प्रती मजूर २५० रुपये रोज व एक वेळेचे जेवण,जेवण न देता ३०० रुपये कोरडा रोज देऊन रोजंदारीने भात सोंगनी व भातशेतीची कामे करावी लागली.
– सतिश बांबळे टाकेद

“यंदा अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाला असला तरी रब्बीसाठी जोरदार तयारी करीत आहे. अवकाळी पावसाने भातशेतीचे अतोनात नुकसान केले असले तरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, तसेच इतर भाजीपाला पिकवणायसाठी शेतकरी सज्ज झाला आहे.
– दिलीप बांबळे, शेतकरी, टाकेद बु.

Congress’ Nana Patole elected unopposed as Maharashtra Speaker

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

MUMBAI:

Senior Congress leader Nana Patole was on Sunday elected unopposed as the new Speaker of Maharashtra Legislative Assembly after the Bharatiya Janata Party candidate Kisan Kathore withdrew his nomination. Patole, a four-time MLA, represents the Sakoli Assembly segment in Vidarbha.

He represents the ruling Shiv Sena-Nationalist Congress Party-Congress Maha Vikas Aghadi (MVA) which won the vote of confidence in the assembly on Saturday .

Patole, a former Kisan Wing leader of the party, comes from the OBC Kunabi community in Vidarbha region. He was the first BJP MP to rebel against his party during Prime Minister Modi’s first term between 2014 to 2019.

He joined the Bharatiya Janata Party just ahead of the 2014 Lok Sabha polls to defeat NCP strongman Praful Patel from Bhandara–Gondiya seat. The leader later rebelled against the saffron party to join Congress, and contested against Union minister Nitin Gadkari from Nagpur. However, this time he lost to the BJP stalwart.

Cloudy skies, light rain likely

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

Nashikites are likely to witness partly cloudy skies with light rain in the city and or at isolated places in the district over the next five days, forecasts Igatpuri-based agricultural research centre, yesterday. This forecast has added more worries to the already distressed rain-hit farming community in the district which has suffered huge losses due to crop loss arising out of prolonged rains.

“The district will experience cloudy skies for the next five days. Light drizzles are also expected at isolated places in the district during the period,” predicted Gramin Krishi Mausam Seva Sanshodhan Kendra, Igatpuri on Saturday.
On Saturday, the climate in the city and throughout the district remained partly cloudy since morning. An impact of a low belt developed in the Arabian sea is being widely felt across the state.

The changing climatic conditions, cloudy skies and predicted light spell of showers may adversely impact crops of bajra, maize, jwar and horticultural crops of vineyards and pomegranate.

Meanwhile, a fresh monsoon surge is all set to affect South India, as a new Low-Pressure Area has formed over Southeast Arabian Sea and adjoining areas of the Indian Ocean. With the formation of a new government in the state, farmers hopes are revived who have been waiting for disbursement of first tranche of a financial aid of Rs 181.50 crore declared by the state administration in the midst of high-voltage political drama.

About 6.47 lakh hectares of farm field out of the cultivated 7.50 lakh hectares in the district suffered huge crop damages while major crops of maize, soyabean, bajra, jwar, onion and other horticultural crops like vineyards and pomegranate were badly hit by the retreating rains which were prolonged till the end of October.
Talukas of Malegaon Chandwad, Niphad, Kalwan and Sinnar were the worst hit by the untimely rains.

देवगड फाट्याजवळ कारच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

लग्नाच्या वर्‍हाडाचे वाहन थांबले असता रस्ता ओलांडताना काळाचा घाला

एक महिला निपाणी वडगावची तर दुसरी जळगाव जिल्ह्यातील; दोघीही नवरदेवाच्या नातेवाईक

देवगडफाटा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील नगर -औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा पासून एक किलोमीटर अंतरावर हॉटेल दत्त दिगंबर समोर रस्ता ओलांडत असलेल्या दोन महिलांना भरधावकारने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी पावणेबाराच्या सुमारास घडली. मयत महिला श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथून लग्नाच्या वर्‍हाडात लासूरकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या.

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील नवरदेवाच्या लग्नाचे वर्‍हाड औरंगाबाद जिल्यातील लासूर जवळील भानवाडी येथे चालले होते. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी वर्‍हाडातील एक टेम्पो देवगड फाटा पासून एक किलोमीटर अंतरावर थांबला. यामध्ये काही महिला व पुरुष वर्‍हाडी होते. त्यातील काही महिला लघुशकेसाठी रस्ता ओलांडत असताना औरंगाबादहून नगरकडे जाणार्‍या एका कारने त्यांना जोराची धडक दिली त्यात या महिला जागीच ठार झाल्या.
मंगल सुनील काळे (वय 45) रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपूर तसेच ताराबाई संतोष वनवे (वय 53) रा. आडगाव ता. एरंडोल जि. जळगाव ही मयत महिलांची नावे आहेत.

त्यांचे मृतदेह नेवासा फाटा येथे ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकार्‍यांच्या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. उशिरापर्यंत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. टेम्पोतील सर्व वर्‍हाडींच्या डोळ्यासमोर ही घटना घडल्याने सर्वाना मोठा धक्का बसला. मृत्यू पावलेल्या महिला नवरदेवाच्या जवळच्या नातेवाईक होत्या. धडक दिलेल्या कारच्या चालकाने कार न थांबवता पळ काढला. गवते व इंगळे या कुटंबाच्या लग्नाला हे वर्‍हाड चालले होते.

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदांच्या बिनविरोध निवडीनंतर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस निवड झाली आहे.

दरम्यान सकाळी विधानसभेचे अधिवेशन सुरु झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी काँगेसच्या नाना पटोले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सत्रात विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडवणवीस यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात महाविकासाआघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यानंतर काळ (दि. ३०) विधानसभेत पहिले अधिअवेशन पार पडले. यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावणाऱ्या भाजपने सभात्याग करावीत गोंधळ घातला. त्यानंतर आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे मागील पाच वर्ष राज्याचा कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस आता विरोधी बाकावर बस आहे.

जिल्ह्यात पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । पुढील पाच दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता इगतपुरी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा संशोधन केंद्राने वर्तविली आहे. अगोदरच अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुन्हा पावसाच्या शक्यतेने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

शनिवारी (दि.30) दिवसभर शहर व जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात कमी अधिक दाबाचे पट्टे तयार झाले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळत आहे. 3 डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहील. तसेच, हलका पाऊसदेखील पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचा परिणाम बाजरी, मका, ज्वारी या पिकांवर होण्याची चिन्हे आहेत.

तसेच द्राक्ष बागा व डाळिंब बागांनाही ढगाळ वातावरण व पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मागील महिन्यात झालेल्या अवकाळीच्या संकटामुळे शेतकरी पुरता बेजार झाला असताना पुन्हा एकदा आस्मानी संकट बळीराजासमोर उभे राहिले आहे.

विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले विराजमान

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : भाजपचे उमेदवार किसन कथोरे यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विधानसभा अधिवेशनला सुरुवात झाली असून हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी नाना पटोले यांचे विधानसभा अध्यक्ष म्हणून नाव घोषित केले.

दरम्यान विधानसभा विशेष अधिवेशनला सुरुवात झाली असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पासून अन्य नेत्यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष म्ह्णून नाना पटोले यांची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून किशोर कथोरे यांनी अर्ज मागे घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे संपुर्ण सभागृहाच्या वतीने अभिनंदन केले.

विधानसभा अध्यक्षपदांच्या बिनविरोध निवडीनंतर आता विधानसभेच्या कामकाजात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार विरोधी पक्षनेतेपदाची निवड आजच होणार असे सांगण्यात आले आहे. यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच विरोधी पक्षनेते होतील असे सांगण्यात येत आहे.

घोटी : शेतजमीन विकण्याचा घाट घातल्याने ‘त्या’ बाप-लेकाचा खून

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

घोटी । कर्ज फेडण्यासाठी शेतजमीन विकण्याचा घाट घातल्याने तीन भावांनी संगनमत करून वडिलांसह आजोबाचा निर्घृण खून केल्याची घटना घोटी खुर्द येथे शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वाडीवर्‍हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासचक्र वेगाने फिरवून संशयिताना 24 तासांच्या आत ताब्यात घेतले.

काशिराम वामन फोकणे (65), ज्ञानेश्वर काशिराम फोकणे (48) ही मृत बाप-लेकाची नावे आहेत.

ज्ञानेश्वर फोकणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी आहेत. घोटी खुर्द येथे ज्ञानेश्वर काशीराम फोकणे हे पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. तर वडील काशीराम वामन फोकणे हे एकटे शेतात राहायचे. ज्ञानेश्वर फोकणे यांनी एसएमबीटी परिसरात हॉटेल व्यवसाय सुरू केला असून त्यांचा संपूर्ण परिवार तेथेच वास्तव्यास आहे.

दररोज आपल्या वडिलांना जेवण घेऊन कोणी ना कोणी मळ्यात येत असत. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ज्ञानेावर फोकणे वडिलांना जेवणाचा डबा घेऊन आले होते. मात्र रात्री दीडच्या सुमारास दोघांवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून निर्घृण खून केला. ही घटना शेतातील घरात घडली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. वाडीवर्‍हे पोलिसांनी पंचनामा करून खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.पोलिसांंनी तपासचक्रे वेगाने फिरवून घरतील व्यक्तींना विश्वासात घेत खुनाचा छडा लावला.

वडिलांंचे अनैतिक संबंध,घरातील भांडणे,डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी शेती विकण्याचा घाट, त्याला आजोबांची साथ याला कंटाळून किरण,प्रमोद ,नितीन या तिन्ही भावांनी संगनमत करून वडील व आजोबाचा निर्घृण खून केल्याचे उघडकीस आले.

४९ हजार नव्या वाहनांची नोंदणी; विभागात दीड लाख नवी वाहने रस्त्यावर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । भारत पगारे

आर्थिक मंदीचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसत असला तरी, दुसरीकडे जिल्ह्यात गेल्या सात महिन्यांत ४९ हजार नवीन वाहने रस्त्यावर धावत आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांची नोंदणी झाली आहे. तसेच नाशिक विभागात १ लाख ६७ हजार नव्या वाहनांची नोंद झाल्याचे नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

नाशिक जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत ४९ हजार १७२ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. यात ३४ हजार सहाशे १७ मोटार सायकलींची नोंदणी करण्यात आली असून २५२ मोपेड व ३९ स्कूटरचा समावेश आहे. त्या खालोखाल ७१९४ मोटार कारची नोंद झाली असून १८८० नवीन रिक्षांचीही नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात २५३५ नवीन ट्रक, लॉरी, ९१ टँकर, ८ रुग्णवाहिका, १६६६ ट्रॅक्टर, २२० ट्रेलर, अन्य ९९, १९६ स्कूल बस, ७६ लक्झरी व टुरिस्ट कार्स, १५२ तिचाकी डिलिव्हरी व्हॅन अशा एकूण वाहनांची नोंद झाली आहे.

दरम्यान, नाशिक आरटीओच्या विभागातील अहमदनगर जिल्ह्यात २१ हजार ६३७ नव्या वाहनांची नोंद झाली आहे. यात १६ हजार ३१२ मोटार सायकलींचा समावेश आहे. १५६३ कारचा समावेश असून १४२० ट्रँक्टरची नोंद झाली असून २७५ ट्रकचीही नोंदणी झाली आहे. श्रीरामपूरमध्ये २१ हजार ७९ वाहनांंची नोंद करण्यात आली असून मालेगाव येथे १४ हजार ८६१ वाहनांची नोंद झाली आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन विभागातील नाशिक, मालेगाव, अहमदनगर व श्रीरामपूर येथे एकूण १ लाख ६७ हजार ४१ वाहनांचे नोंद झाली आहे.

७९ हजार नव्या दुचाकी रस्त्यावर
गेल्या सात महिन्यात नाशिक विभागात ७८ हजार ८७७ नव्या दुचाकी रस्त्यावर धावत आहेत. तर ५ हजार ५५५ नवीन ट्रॅक्टर शेतीसाठी घेण्यात आले आहेत.

एकही सरकारी वाहनाची नोंद नाही
गेल्या सात महिन्यांत खासगी क्षेत्रातूनच वाहने नोंदविण्यात आली आहे. मात्र विभागातून शासनाच्या एकाही विभागाने कोणतेही वाहन नोंद केलेले नाही.

प्रयोगशील शेतीकडे शेतकर्‍यांचा कल; शेतकरी झाले मार्गदर्शक; अवकाळीत लाखमोलाची साथ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । दिनेश सोनवणे

नाशिक जिल्ह्यात आदिवासी दुर्गम भाग वगळता सर्वच तालुक्यांत सधन शेती केली जाते. आर्थिक मंदी, घटलेले रोजगार यामूळे सुशिक्षितांनीदेखील वडीलोपार्जित शेतीत बदल करत चांगले उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली. प्रयोगशील शेती साकारत अनेक शेतकरी इतर शेतकर्‍यांना मोफत मार्गदर्शनदेखील करत आहेत. यामूळे स्वतःसोबतच इतर सहकारी शेतकर्‍यांच्या उत्पन्नतात वाढ झाली असून याद्वारे आर्थिक विकास साधला जात आहे.

वातावरणीय बदलांमूळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला आहे. मात्र, खचून न जाता दिंडोरी, निफाड, सिन्नर तसेच कसमादेमधील शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा उभारी घेत शेतीत नवनवीन प्रयोग करायला सुरुवात केली आहे. शेतकरी आता माती आणि पाणी परिक्षण करुन शेतीतील पिकांना आणि जमीनीला गरजेूनसार खत खाद्य देऊ लागले आहेत. परिणामी उत्पन्नात भर पडलेली दूसरीकडे खत खाद्यांवरील अमाप खर्चही काही अंशी कमी झाला असल्याचे शेतकरी सांगतात.

दुसरीकडे अनेक शेतकर्‍यांनी शेतीपुरक जोडधंद्यालाही पसंती दिली आहे. यामध्ये पोल्ट्री व्यवसाय, दुग्धोत्पादन, काही ठिकाणी अंड्यांचे पोल्ट्री आता वाढू लागलेले दिसून येतात. अनेक शेतकरी पोल्ट्रीसाठी लागणारे खत (फिड) तयार करण्यासासाठी पुढाकार घेऊन चांगले अर्थार्जन यातून मिळवत असल्याचे दिसून येते.

नियमित असलेल्या शेतीपिकांसोबत आता शेतकर्‍यांनी इतर शेतकर्‍यांच्या मदतीने पिकांमध्येही बदल करण्यास सुरवात केली. आपल्या परिसरातील पिकपद्धती बदलू शकते याची माहिती शेतकर्‍यांना झाली. नवनव्या प्रयोगातून आर्थिक गणित शेतकरी जूळविण्यासाठी प्रयत्न करताना नजरेस पडतात.

कसमादेमधील शेतकरी निर्यातक्षम डाळींबाचे उत्पादन गेल्या अनेक वर्षांपासून घेतले. यामध्ये सुरुवातील मोजक्याच शेतकर्‍यांना दर्जेदार उत्पन्न मिळत होते. मात्र, यानंतर हळूहळू बदल झाले, इतर शेतकर्‍यांनी या शेतकर्‍यांचे मार्गदर्शन घेऊन पिकपद्धतीत बदल केला. याचे चांगले परिणाम दिसून आल्याने पुढे त्यांनीही इतरांना मार्गदर्शन करून हातभार लावला परिणामी हा सर्व परिसर डाळींबाचे दर्जेदार उत्पादन घेणारा परिसर म्हणून नावारूपाला आला.

सेंद्रीय शेतीला पसंती
एकरी शेतीच्या एकूण खर्चापैकी ३० ते ४० टक्के खर्च रासायनिक खतावर होतो. शेतात शेणखत, गोबर गॅसची स्लरी, लेंडीखत व गांडूळ खताचा वापर वाढवल्याने खर्चात घट होऊ शकते हे लक्षात आल्यानंतर आता शेतकरी सेंद्रीय शेतीलाही पसंती देऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, सेंद्रीय शेतीतून आरोग्याला धोका कमी असल्याने सेंद्रीय उत्पादनास अलिकडच्या काळात मागणीही वाढलेली दिसून येते.

जैविक खतांचा वापर लाभदायी
जैविक खताचा वापर करुन यंदाच्या अवकाळीवर मात केली. अजूनही माझी द्राक्षबाग सुस्थितीत आहे. माझा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मी एवढ्यावरच थांबलो नाही, तर सोशल मीडियाद्वारे, द्राक्ष विज्ञान मंडळाच्या माध्यमातून हजारो शेतकर्‍यांचा मार्गदर्शन केले. जिवाणूयुक्त बुरशीनाशके वापरून द्राक्षबागेतून डावणी हद्दपार केला आहे.डॉ. वसंत ढिकले, शेतकरी, सैय्यद पिंप्री

मार्गदर्शन महत्त्वाचे
बदलत्या वातावरणामूळे शेती आता तोट्याची झाली आहे. मात्र, वेळोवेळी शेतीत मार्गदर्शन जमेची बाजू असून अनेक शेतकर्‍यांनी यातून दर्जेदार उत्पन्न मिळवले आहे. मोसम खोरे डाळींबाचा यशस्वी बेल्ट म्हणून ओळखला जातो. बागलाण पासून हॉलंडपर्यंत येथील डाळींब पोहोचले आहेत, केवळ शेतकर्‍यांचेच शेतकर्‍यांना वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन यासाठी कारणीभूत आहे असे मी म्हणेल.
लोटन जाधव, शेतकरी, बिजोटे (ता. बागलाण)