Wednesday, April 29, 2026
Home Blog Page 13300

खून, लुटमार करणारे ४ तासात जेरबंद; ग्रामिण दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

मालेगाव तालुक्यात खून करून लुटमार करणार्‍या टोळक्यास ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार तासात शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांनी इतर नागरीकांची लूट केल्याचे समोर आले आहे.

शाहबाज अंजुम मेहमूद अहमद (२०, रा.गल्ली नं.४, हकिमनगर, मालेगाव), नुर अमीन नियाज अहमद उर्फ सोनु (२२, रा. हकिमनगर, मालेगाव) व मोहमद युसूफ मोहमद याकुब उर्फ युसूफ भ्ाुर्‍या(23, रा. पवारवाडी, मालेगाव) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

मालेगाव तालुक्यातील सायने बु॥ शिवारातील आर.आर.जाजु कंपाऊंड परिसरात शनिवारी (दि.७)रात्री आठ वाजेच्या सुारास एका राखाडी रंगाचे युनिकॉर्न मोटर सायकलवर आलेल्या अज्ञात तीघांनी येथील गोरख नामदेव जाधव (५०, रा.गिगाव, ता.मालेगाव) यांचा मोबाईल हिसकावला होता. त्यांनी विरोध करताच त्यांंच्या छातीवर चाकुने वार करून पळुन गेले होते. तसेच नागरीकांनाही चाकुचा धाक दाखवुन मारहान करून त्यांचे मोबाईल व रोख रक्कम जबरीने लुटमार केली होती. या घटनेतील जखमी गोरख जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानुसार मालेगाव पोलीस ठाण्यात जबरी लूटीसह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचा समांतर तपास सुरू केला होता.

मालेगावातील काही सराईत गुन्हेगारांकडे सध्या विना नंबरची युनिकॉर्न गाडी असुन गुन्ह्यात वर्णन केल्या प्रमाणे ते असल्याचे व ते हकिमनगर परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून स्थागुशाचे पथकाने हकिमनगर परिसरात महाराटं लाईट हाउस समोर सापळा रचुन सराईतांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी जाधव यांची लूट करून चाकू मारल्याची तसेच इतर तिघांची लूट केल्याची कबुली दिली आहे. त्यांचेकडुन अजुन काही गुन्हे उघडकीस येण्याची ाक्यता आहे.

जिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक संदिप घ्ाुगे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहायक निरिक्षक संदिप दुनगहू, सुनिल आहिरे, पोहवा सुहास छत्रे, राकेश उबाळे, देवा गोविंद, चेतन संवत्सरकर, फिरोज पठाण, रतिलाल वाघ, संदिप लगड, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, दत्ता माळी यांचे पथकाने ही कामगिरी केली. अवघ्या चार तासात सराईत पकडल्याने अधिकक्षक डॉ. सिंह यांनी पथकाचे कौतुक केले.

11 मोबाईल जप्त
संशयितांच्याकब्जातुन रेडमी कंपनीचे ५ मोबाईल, व्हीवो, लिनोव्हो, पॅनासोनिक, आयटेल व जिओ कंपनीचे ६ मोबाईल असे एकुण ११ मोबाईल हॅण्डसेट, गुन्हयात वापरलेली होण्डा युनिकॉर्न मोटर सायकल व रोख रक्कम असा एकुण ९४ हजार ५९० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अठ्ठावीस लाखाच्या मद्याची परस्पर विक्री; टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

बनावट ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावे बुकींग करून दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारातील मॅकडॉल्स कंपनीचा २८ लाखांचा मद्यसाठा परस्पर विक्री करणार्‍या औरगांबादच्या टोळीला नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

किशोर मारूती पडदुणे (२९, रा. बजाजनगर, वाळुंज एमआयडीसी), रवी उर्फ लंडन ड्रिम्स सुरेश शर्मा (२७, रा. बजाजनगर, औरंगाबाद), जगन्नाथ उर्फ बाळू शंकर सोनवणे (२९, रा. पिंपळगाव थोट, ता. भोकरदन, जिल्हा जालना) आणि शेख समद शेख अहमद (३२, रा. भारतनगर, वाळुंज) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

या टोळीने बनावट कंपनीच्या नावे २६ सप्टेंबरला दिंडोरीतील मॅकडॉवल्स कंपनीतून २८ लाख रूपयांचा मद्यसाठा ट्रकमध्ये भरला हा मद्यसाठा पुणे येथे सोडण्याऐवजी त्यांनी रस्त्यातच राजगुरूनगर येथे दुसर्‍या ट्रकमध्ये भरून धुळे येथे रफिक शेट नावाच्या व्यक्तीस विक्री केला. हा सौदा १४ लाखांमध्ये ठरला होता. त्यातील १० लाख रूपये टोळीने रोख स्वरूपात घेतले. कंपनीने दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू केला. तपासात या गुन्ह्याचा संबंध थेट औरंगाबाद येथे जोडला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज एमआयडीसी भागात रात्रभर सापळा लावून रवी उर्फ लंडन ड्रिम्स याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या टोळीचा पर्दाफाश झाला.

गुन्हा झाल्यानंतर सर्व आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले होते. या सर्वांना पोलिसांनी शोधून अटक केली. पडदुणे हा या कामात सराईत असून, त्याने जळगाव, औरंगाबाद, ठाणे, पालघर, सांगली, सातारा, नागपूर आदी एमआयडीसीमधील कंपन्याची याप्रकारे फसवणूक केली आहे. त्याच्याविरोधात किमान आठ गुन्ह्याची नोंद असून, किमान तीन जिल्ह्यांमधील पोलिस संशयिताचा शोध घेत होते.

पडदुणे मुख्य सुत्रधार
पडदुणे हा टोळीचा मुख्य सूत्रधार आहे. सप्टेंबर महिन्यात पडदुणे आणि त्याचा साथिदार दिंडोरीला आला होता. त्यावेळी त्याने मॅकडॉवल्स कंपनीच्या मालाची वाहतूक कशी होते, याची माहिती घेतली. त्यानुसार त्याने बनावट अरिहंत ट्रान्सपोर्ट कंपनीच्या नावाने २६ सप्टेंबर रोजी कंपनीच्या व्यवस्थापनाची संपर्क साधून मद्यसाठा आपल्या ट्रकमध्ये भरून घेतला व अपहार केला होता.

तर एकनाथ खडसेंचे काँग्रेसमध्ये स्वागत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

ना.थोरात : त्यांना पक्षातून मिळणारी वागणूक जनतेला न पटणारी

संगमनेर (प्रतिनिधी)- भाजप सत्तेवर येण्यासाठी एकनाथ खडसे यांनी मोेठे योगदान दिले आहे. आम्ही सत्तेत असताना त्यांनी विरोधीपक्षनेते म्हणून चांगले काम केले. मात्र आता त्यांना जी वागणूक पक्षात मिळते आहे ती सर्वसामान्यांना न पटणारी आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केलाच तर अशा व्यक्तिमत्वाचे आम्ही स्वागतच करू, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकनाथ खडसे यांना पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचे संकेत दिले आहेत.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे सध्या नाराज असल्याने ते पक्ष सोडण्याचा विचार करत असल्याचे माध्यमांमधून पुढे आले आहे. जर त्यांनी पक्ष सोडला तर ते काँग्रेस बरोबर येतील का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना काल संगमनेर येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, भाजपाची विचार प्रणालीच वेगळी आहे. कुठलाही कार्यकर्ता हा त्याच्या राजकीय जिवनात नेता होईपर्यंत खूप कष्ट घेतो. अनेक गोष्टींना सामोरे जातो. अशा परिस्थितीतून तो नेता म्हणून पुढे आल्यावर त्याचे कर्तव्य बजावतो. भाजप सत्तेवर येण्यासाठी एकनाथ खडसे यांचे मोठे योगदान राहिले आहे. परंतू पक्षात त्यांना जी वागणूक दिली जात आहे ती सर्वसामान्यांना न पटणारी आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा विचार केला तर अशा अनुभवी व्यक्तीमत्वाचं आम्ही स्वागतच करु.

हिवाळी अधिवेशनाचा कालखंड अल्प स्वरुपाचा का? याबाबत ते म्हणाले, निवडणूकांनंतर बराच कालखंड हा जनतेपासून लांब गेल्यासारखा वाटला अशी सर्वांची भावना होती. त्यामुळे आता जनतेशी संवाद साधू. पुढच्या अधिवेशनाला पुरेसा काळ देता येईल, असे ते म्हणाले.

चव्हाणद्वयी अनुभवी नेते
मंत्रीमंडळाच्या विस्तारात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण यांचा समावेश होईल का? या प्रश्नावर ते म्हणाले, दोन्ही व्यक्तीमत्व अनुभवी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहे. त्यांनी चांगलं काम केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाचा उपयोग करुन घेतला गेला पाहिजे. मात्र हा सर्वस्वी निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असेही ते म्हणाले.

सत्ताहरणानंतर भाजपचा ‘कार्यक्रम’ही ढेपाळला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पदाधिकारी निवड : आजपासून पुन्हा बूथस्तर माहिती संकलन || जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाध्यक्ष निवड शक्य

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्याच्या सत्ता संघर्षात पिछेहाट झालेल्या भाजपच्या जिल्ह्यातील पक्षांतर्गत पदाधिकारी निवडीच्या कार्यक्रमाचा बोजवारा उडाला आहे. 10 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या पक्षांतर्गत निवडीच्या प्रक्रियेत 15 डिसेंबरपर्यंत पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष निवडीचे तयार केलेले वेळापत्र कोलमडले असून बूथ समिती पातळीवरील माहिती अद्याप जिल्हास्तरावर पोहचलेली नाही, असे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पक्षाच्या संघटनात्मक पदाधिकार्‍यांनी पक्षांतर्गत निवडीचा कार्यक्रम वेळापत्रकानुसार पूर्ण होणार नसल्याचे मान्य केले असले तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्हाध्यक्षांची निवड पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच सोमवारपासून बूथ पातळीवरील माहिती, सक्रिय सभासदांची माहिती जिल्हा पातळीवर संकलित होणार असून या माहितीच्या तपासणीसाठी जिल्हा पातळीवर समिती असून ही समिती सक्रीय सभासदांची तपासणी करणार असल्याचे पक्षाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

गेल्या महिन्यांत भाजप संघटन पर्व म्हणून पक्षांतर्गत निवडणूक वेळापत्रक निवडणूक अधिकारी सुरेश हळवणकर यांनी जाहीर केले होते. 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर सक्रिय सदस्य नोंदणी, 24 नोव्हेंबरपर्यंत सक्रिय सदस्य पडताळणी, 15 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर बूथ अध्यक्ष आणि बूथ समिती सदस्यांची निवड, 25 ते 30 नोव्हेंबरपर्यंत मंडल अध्यक्ष आणि मंडल समिती सदस्यांची निवड, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष व जिल्हा समिती सदस्यांची निवड, 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यातून प्रदेश परिषद सदस्य निवड, 15 डिसेंबरला प्रदेशाध्यक्षपदाची निवड असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.

राज्यातील सत्ताखेळात झालेल्या पराभवामुळे भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमधील उत्साह घसरला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नवे राजकीय समिकरण जुळविण्यात आले. महाविकास आघाडी सत्तारूढ झाल्याने अनेक नेत्यांचेे अवसान गळाले. त्याचा परिणाम संघटनात्मक निवडणुकीवर झाला. स्थानिक नेत्यांनी या निवडीकडे दुर्लक्ष केल्याने बूथस्तरावरील निवडी रखडल्या आहेत. या नेत्यांशी चर्चा करूनच निर्णय होणे अपेक्षित आहे. पण नेतेच या प्रक्रियेपासून लांब असल्याने कार्यकर्त्यांची अडचण झाली आहे. निवड रखडल्याने पुढील मंडल म्हणजे तालुकाध्यक्षांच्या निवडी लांबणीवर पडल्या आहेत.

काय घडले?
नगर जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक खासदार गिरीश बापट यांनी जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निवडणुकीची माहिती दिली होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी तातडीने मंडल अध्यक्ष निवडीसाठी तालुकानिहाय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करून त्यांना वेळापत्रकाप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु अजूनही बूथस्तरावरील निवडी झाल्या नाहीत. डिसेंबर महिना सुरू झाला असून या कालावधीत जिल्हाध्यक्षाची निवड प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित होते.

भगवद् गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

सरसंघचालक मोहन भागवत : लाभाच्या गोष्टींना महत्त्व न देता कर्म करा

संगमनेर (प्रतिनिधी)- मोह, आशा, अपेक्षा, आकांक्षा, अहंकारापासून दूर राहिले पाहिजे. याच कारणामुळे आपण मुख्य उद्देशापासून दूर जातो. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करत रहा, भगवद् गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरू बनेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. दरम्यान, यावेळी 35 हजार विद्यार्थ्यांनी भगवद् गीतेतील कंठस्थ केलेला 12 वा व 15 वा अध्यायाचे पठण केले. हा एकप्रकारे नवा विक्रम ठरला आहे.

संगमनेर येथे जाणता राजा मैदानावर पूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या 71 व्या जन्मवर्षानिमित्ताने गीता परिवाराच्यावतीने आयोेजित गीता महोत्सवात ते बोेलत होते. या कार्यक्रमात 71 हजार गीतेचे मुखोद्त अध्याय गोविंददेव गिरी महाराज यांना भेट देण्यात आले. यावेळी योेगगुरू रामदेव बाबा, भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष शाम जाजू, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, ललितादेवी मालपाणी, सुवर्णाताई मालपाणी, उद्योगपती राजेश मालपाणी, गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, मनिष मालपाणी, गिरीश मालपाणी, आशिश मालपाणी उपस्थित होते.

प्रारंभी श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. तर डॉ. संजय मालपाणी यांनी संपूर्ण गीता कंठस्थ केल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहन भागवत म्हणाले, गीता परिवाराच्या माध्यमातून ज्ञानदानाचे कार्य होत आहे. गीतेतील ज्ञान प्रत्येकाने आचरणात आणण्याची गरज आहे. जीवनात कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे याचा वस्तुपाठ म्हणजे भगवद्गीता आहे. मात्र लोेभापोटी आपण मूळ उद्देशापासून दूर जातो. लाभांच्या गोष्टींना महत्त्व देतो. ते न करता आपले कर्तव्य आपण केले पाहिजे. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्म करत रहा. गीतेच्या संस्कारामुळे भारत विश्वगुरु बनेल असेही ते म्हणाले.

रामदेवबाबा म्हणाले, ज्ञानापेक्षा कोणीही मोठे नाही. तेव्हा ज्ञान मिळवा. परमेश्वराला सर्व समान आहे. आपल्यातील शक्ती जागृत करा. आपल्या देशात आज बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई अशा समस्या आहेत. मात्र केवळ समस्यांवर विचार करत बसून नका. आज कांद्याचे भाव वाढत असून लोक पंतप्रधान मोदी यांना कांद्याचे भाव कमी करा असे म्हणतात, आता मोदी हे काय कांदे उगवणार आहेत का? असा प्रतिसवाल करुन ते म्हणाले, आपण आपले कर्तव्य करुन स्वत:ला सिध्द करा. दुसर्‍यांचे भाग्य बनविणारे बना. गीता कंठस्थ करणारी तुम्ही मुलं कधीही दुराचारी होणार नाही याचा आत्मविश्वास वाटतो. मी सर्वसामान्य कुटूंबात जन्माला आलोे, आणि सर्वसामान्य कुटूंबातील लोकांनीच प्रगती केली आहेे. माझ्या शिक्षणासाठी केवळ 500 रुपये खर्च झाला आहेे. आज मी तुमच्या समोेर उभा आहे. तुम्ही असं काम करा की, सर्व जग तुमच्या पाठीमागे फिरेल असे काम तुम्हाला करायचे आहे. आज अनेकजण प्रश्न उपस्थित करत आहे. देशात हिंसा वाढली आहे. पण हे थांबविण्यासाठी चांगले संस्कार हा उपाय आहे. हे संस्कार गीता परिवाराच्या माध्यमातून मिळताहेत ही अभिमानास्पद बाब आहे असे सांगत त्यांनी व्यासपीठावर योगाचे धडे दिले.

गोविंददेवगिरी महाराज म्हणाले, आजची शिक्षण व्यवस्था बिघडल्यासारखी वाटते. तिच्यात बदल करण्याची गरज आहे. योग्य वयातच मुलांना योग्य शिक्षण मिळाले पाहिजे. योग्य शिक्षणासाठी भगवद्गीता वाचावी लागेल. त्यांच्या डोक्यात ती गेली पाहिजे, कंठस्थ झाली पाहिजे. राष्ट्रप्रेम, राष्ट्र धर्म त्यातूनच निर्माण होेईल. ‘विद्या धर्मेण शोेभते’ हे बोेध वाक्य घेवून गीता परिवार मार्गक्रमण करत आहे. गीता वाचली जाईल. तिचे आचरण केले जाईल असे सांगून ते म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पतंजली हे धर्माच्या मार्गावर पुढे गेले. त्यापाठोपाठ गीता परिवार मार्गक्रमण करत आहे. देशाची मुळ ऊर्जा जिवंत ठेवली पाहिजेे. तरच देशाची महानता वाढेल.

प्रास्ताविकातून कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी सांगितले की, 33 वर्षापूर्वी गीता परिवाराची सुरूवात संगमनेरात झाली. आजच्या कार्यक्रमाला आठ राज्यातून 185 शाळांमधून 35 हजार विद्यार्थी उपस्थित राहिले. 81 विद्यार्थ्यांनी पूर्ण गीता कंठस्थ केली तर 35 हजार विद्यार्थ्यांनी भगवद् गीतेतील कंठस्थ केलेला 12 वा व 15 वा अध्याय कार्यक्रमस्थळी म्हणून दाखविला. यावेळी संपूर्ण गीता कंठस्थ केलेल्या 81 विद्यार्थ्यांना ‘गीताव्रती’ ही उपाधी व सुवर्णपदक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

क्रीडा संकुलातील अनधिकृत बांधकामावर सहा वर्षांनंतर मनपाचा हातोडा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मंजुरी 57 हजार 500 चौरस मीटरला असताना प्रत्यक्षात दीड लाख चौरस मीटरचे बांधकाम

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगरपालिकेने 1998 साली वाडिया पार्कची जागा क्रीडा संकुलासाठी जिल्हा क्रीडा संकुल समितीकडे हस्तांतरीत केली होती. या समितीने ती जागा विकसीत करण्यासाठी ठेकेदाराला दिली. मात्र, त्या ठेकेदाराने मंजुरीपेक्षा जास्त बांधकाम केले. याबाबत महानगरपालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर 2013 निकाल लागून वाढीव अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सहा वर्षांनी रविवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलीस बंदोबस्तात बांधकामावर बुलडोझर फिरविला.

नगर शहरातील माळीवाडा परिसरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बीओटी) तत्वावर जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले आहे. या क्रीडा संकुलात ठेकेदारानेच विनापरवाना अतिरिक्त एक लाख चौरस फूट बांधकाम केले आहे. हे अतिक्रमण पाडण्याचे 2013 मध्ये उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिलेले असल्याने महापालिकेने रविवारी सकाळी आठ वाजेपासून ही कारवाई सुरू केली.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकातील कर्मचारी रविवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास नव्या महापालिका इमारती जवळ जमा झाले. नगर रचना विभागातील उपअभियंता तथा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या नेतृत्त्वाखाली महापालिकेच्या झेंडीगेट प्रभाग समितीचे अधिकारी अशोक साबळे, 40 कर्मचारी, दोन जेसीबी, एक डंम्पर असे पथक सकाळी साडेसातच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुलात दाखल झाले.

जिल्हा क्रीडा संकुलात ए इमारत, एमआर ट्रेड सेंटर (बी इमारत) पार्किंगच्या जागेत बांधण्यात आलेल्या आहेत. तर संकुलातील तळघरात सुमारे 48 गाळे विनापरवाना अतिरिक्त बांधण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे दीड वर्षांपूर्वी महापालिकेच्या प्रभारी आयुक्तपदाचा पदभार होता. त्यावेळी द्विवेदी यांनी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट दिली होती. या भेटीत जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्त बांधकामाचा विषयही निघाला होता. या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी वेळोवेळी तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी व जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्याशी चर्चाही केली होती.

महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग सेवानिवृत्त झाल्यामुळे आता पुन्हा जिल्हाधिकार्‍यांकडे महापालिकेचे प्रभारी आयुक्तपद आले आहे. हा पदभार मिळताच जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा क्रीडा संकुलातील विनापरवाना अतिरिक्त बांधकाम काढण्यासंदर्भात बैठका घेतल्या. महापालिकेच्या स्थायी समितीनेही हे अतिक्रमण काढण्यासंदर्भात ठराव संमत केला होता.

रविवारी सकाळपासूनच एमआर ट्रेड सेंटर (बी इमारत) पाडण्यास सुरवात झाल्याचे समजताच ठेकेदार जवाहर मुथा जिल्हा क्रीडा संकुलात दाखल झाले. त्यांनी सुरेश इथापे यांना माझ्याकडे न्यायालयाचे स्टे ऑर्डर आहेत. त्यामुळे कारवाई थांबवा, असे सांगितले. यावेळी जिल्हा क्रीडा संकुलाचे वास्तुविशारद अशोक काळे यांनीही इथापे यांना कारवाई थांबविण्याची विनंती केली. मात्र, ऑर्डर दाखविल्याशिवाय कारवाई थांबविली जाणार नाही असे इथापे यांनी स्पष्ट केले.

2001 साली तत्कालीन नगरपालिकेने ठराव करून वाडिया पार्कची जागा जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यासाठी क्रीडा संकुल समितीकडे वर्ग केली. यात 57 हजार 500 चौरस फूट बांधकाम करण्याची परवानगी नगरपालिकेच्या नगररचना विभागाने दिली होती. यात 152 गाळांना मंजुरी देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात सुमारे दीड लाख स्केअर फूट बांधकाम करण्यात आले. यात दोन इमारती पार्किंग जागेत तयार करण्यात आल्या तर संकुलात तळघर तयार करून सुमारे 48 गाळे अतिरिक्त तयार करण्यात आले.

2004 साली बांधकाम पूर्ण झाले. अतिरिक्त बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने संबंधितांना नोटिसा दिल्या. 2005 साली उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेवर 2013 साली निकाल लागला. न्यायालयाने महापालिकेला हे अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले. या संदर्भात जवाहर मुथा यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्तांकडे अर्ज केला होता. विभागीय आयुक्तांनी चौकशी करून हे अनधिकृत अतिरिक्त बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.

श्रीरामपुरात गळफास घेऊन विवाहितेची आत्महत्या

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- शहरातील थत्ते मैदान परिसरात राहणारी वंदना दीपक सिरपुरे (वय 31) या विवाहीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत वंदना हिचे पती दीपक सिरपुरे हे श्रीरामपूर पंचायत समितीच्या लेखा विभागात सेवेत आहेत. मयत वंदना ही त्यांची दुसरी पत्नी आहे. त्यांना एक मुलगी आहे. पहिल्या पत्नीला एक मुलगी असून ती महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास वंदना घरात एकट्या होत्या. त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही घटना घडली तेव्हा पती दीपक हे पंचायत समितीमध्ये काम करीत होते. तिथे फोन आल्यावर ते तात्काळ घरी गेले. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी पाठविला. शनिवारी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी आकस्मात मॄत्यूची नोंद केली.

याबाबत कुणाचीही तक्रार नसल्याने कुणावरही गुन्हा दाखल केला नाही. असे पोलीस सांगत असले तरी दीपक व त्यांच्या घरातील महिला पुरुषांना पोलीस ठाण्यात कशाला बोलावले. तक्रार नाही तर अंत्यसंस्काराच्यावेळी स्मशानभुमित बंदोबस्त का लावला ?, याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.

विमान प्राधिकरणाने प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय घ्यावे : आ. काळे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (प्रतिनिधी)- विमानतळ उभारणीच्यावेळी विमान प्राधिकरणाने प्रकल्पबाधीत शेतकर्‍यांना जी आश्वासने दिली होती त्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही करण्यात आली नाही. त्यामुळे विमान प्राधिकरणाने या प्रकल्पबाधित शेतकर्‍यांच्या व ग्रामस्थांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी काकडी विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री, टर्मिनल व्यवस्थापक एस. मुरली कृष्णा व सहाय्यक कार्यकारी अभियंता कौस्तुभ ससाणे आदी विमान प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन विमानतळासंदर्भात असलेल्या अडचणींचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.त्यावेळी आ. काळे यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची विमानसेवा बंद आहे. ही सेवा तातडीने सुरू करावी तसेच रात्रीची सेवा सुरू करावी, काकडी ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी. रन वे वरचे पाणी वळवून काकडी गावातील पाझर तलावात सोडावे. टॅक्सी चालक, छोटे कॉन्ट्रॅक्ट स्थानिकांना देण्यात यावे. काकडी प्रकल्पग्रस्त भूमीपुत्रांचे प्रश्न मार्गी लावावेत.

स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे. प्रकल्पबाधित ज्या शेतकर्‍यांना अजूनही मोबदला मिळालेला नाही त्या शेतकर्‍यांना त्वरीत मोबदला देण्यात यावा. नवीन भूसंपादन करताना जमिनीचा दर जास्तीत जास्त देण्यात यावा व काकडी परिसरात रस्त्याच्या दुतर्फा विजेचे बल्ब बसवावेत अशा प्रकारच्या स्थानिक प्रकल्प ग्रस्तांना आवश्यक असणार्‍या अनेक सूचना आ. आशुतोष काळे यांनी विमान प्राधिकारणाला दिल्या. यावेळी सुनील शिंदे, बाबासाहेब गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ आदींसह काकडी परिसरातील प्रकल्पबाधीत शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारखाना निवडणुकीत कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही – राजेंद्र नागवडे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – नागवडे सहकारी कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक नव्या वर्षांत होत आहे. वैयक्तिक व सोसायटी सभासद मतदान पात्रतेस नवीन सहकार कायद्यानुसार निरनिराळ्या अटी आहेत. त्यांचा अवलंब केल्यास अनेक सभासद मतदानापासून वंचित राहू शकतात. मात्र याबाबत आम्ही दक्षता बाळगली असून नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत कोणताही वैयक्तिक व सोसायटी सभासद मतदानापासून वंचित राहणार नाही, असा विश्वास नागवडे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला.

शनिवारी सकाळी अकरा वाजता नागवडे कारखान्याच्या अतिथीगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत नागवडे बोलत होते. यावेळी नागवडे म्हणाले, नागवडे कारखान्याच्या उभारणीपासून सभासदांनी सतत आमच्यावर विश्वास दाखवला आहे. सभासदांच्या विश्वासाला साजेसा कारभार संचालक मंडळ करीत आहे. सहकार विभागाने घालून दिलेल्या नियम व अटी लागू करून त्याअनुषंगाने आम्ही सहकार विभागाला प्राथमिक माहिती सादर केली. मात्र सुधारित सहकार कायद्यान्वये वैयक्तिक व सोसायटी मतदारसंघातील अनेक मतदार मतदानास अपात्र ठरत होते. मात्र, कारखाना प्रशासन सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार सहकार विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून सर्व सभासद मतदानास पात्र ठरविण्यासाठीची पूर्तता कारखान्याच्या पातळीवर केली जाणार आहे.

मतदार पात्रतेबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत. या सर्व चर्चा निरर्थक असून नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत प्रत्येक सभासदाला मतदानाचा हक्क असेल, अशी माहिती नागवडे यांनी दिली. यावेळी कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, श्रीनिवास घाटगे, अरुण पाचपुते, प्रा. सुनील माने, अ‍ॅड. सुनील भोस, विश्वनाथ गिरमकर, विलास काकडे, योगेश भोयटे, सचिन कदम, शरद खोमणे, अ‍ॅड. अशोक रोडे आदी उपस्थित होते.

अपूर्ण भाग पूर्ण करण्यासाठी ठेवीची रक्कम भागांमध्ये वर्ग करण्याचे काम नागवडे कारखान्याने 2017 सालामध्येच केलेले आहे. नागवडे कारखान्याचा सहवीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण झाला आहे.

वाळूतस्करी; पाचेगाव ग्रामस्थांनी दुसरा तराफाही पेटवून केला नष्ट

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाचेगाव (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील पुनतगावात गेल्या गुरुवारी महसूल प्रशासनाने वाळूचा अवैधरित्या उपसा करणार्‍या एक तराफा बोट ग्रामस्थांच्या मदतीने जाळून नष्ट केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा वाळू तस्करी करणारा दुसरा तराफा पाचेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी रविवारी सकाळी जाळून नष्ट करण्यात यश मिळवले.

याबाबत माहिती अशी की, वाळूउपशासाठी वापरल्या जाणार्‍या एकूण दोन तराफा बोटींपैकी एक तराफा जाळण्यात आला होता. परंतु दुसरा तेथून वाळू तस्करांनी त्या दिवशी पळविला होता. या तराफ्याद्वारे पुन्हा वाळू तस्करी होत असल्याची खबर पाचेगाव येथे रविवारी सकाळी मिळाली. सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी त्वरित पाचेगाव प्रशासनास सदर माहिती दिली. त्यानंतर लगेच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दरम्यान वाळू भरलेल्या अवस्थेत हा तराफा आढळून आला. पाचेगाव व पुनतगाव ग्रामस्थांच्या मदतीने सदर तराफा जाळून नष्ट केला. या कारवाई दरम्यान पाचेगावचे कामगार पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, तलाठी कार्यालयातील कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या या धडक कारवाईने वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असून अवैध वाळू उपशास आता कायमचा चाप बसेल अशी आशा व्यक्त होत आहे. एकीकडे वाळूचे रक्षण करण्यासाठी पुनतगाव व पाचेगाव ग्रामस्थ कायमस्वरूपी प्रयत्न करीत आले आहेत. पण कुंपणच शेत खात असेल तर कसे होणार? असा आरोप सामाजिक कार्यकर्त्याबरोबरच ग्रामस्थ करीत आहेत.

स्थानिक तरुण या वाळू तस्करांना थोड्याफार पैशासाठी मदत करतात. या तरुणांचाही बंदोबस्त करण्यासाठी सामजिक कार्यकर्ते व दोन्ही गावांतील ग्रामस्थ आता सरसावले आहेत. पाचेगावच्या पलीकडील हद्दीतील परिसरातून देखील मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत आहे. रविवारी पहाटेच्या वेळी तीन ते चार डंपर वाळू भरून गोणेगाव परिसरातून गेल्याची खात्रीशीर माहिती आहे. प्रवरा नदीपात्रात पाणी असताना देखील मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत आहे. जर नदीपात्रातील पाणी कमी झाले तर या भागातील वाळूचे काय होईल अशी भीती या भागातील ग्रामस्थांना चिंतीत करू पाहत आहे.

तालुक्यातील अवैध वाळू उपसा थांबला नाहीतर सामाजिक कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

तहसीलदारांचे दुर्लक्ष
या घटनेची माहिती नेवासा तहसीलदार यांना फोनद्वारे देण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप पाचेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केला. या अगोदरही तीन आठवड्यांपूर्वी असाच अनुभव आला होता असे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. त्याचबरोबर तहसीलदारांच्या वाहनचालकाचे तालुक्यातील वाळू तस्करांबरोबर लागेबांधे असल्याची जोरदार चर्चा पाचेगावात झडत आहे.