Friday, June 19, 2026
Home Blog Page 13377

खुशखबर! रेल्वेमध्ये मेगा भरती; जाणून घ्या कोणत्या पदांसाठी मागवलेत अर्ज

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

नोकरीच्या शोधात असलेल्या युवावर्गासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये लिपिक पदांसाठी एकूण 251 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहे. आज पासून म्हणजेच (20 डिसेंबर) पासून या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. तसेच 19 जानेवारी ही अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे.

19 जानेवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 12वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. तसेच या  उमेदवारांना टायपिंग येणे बंधनकारक आहे.

या साठी इंग्रजी 30 शब्द प्रति मिनिट आणि हिंदीचा टायपिंग स्पीड 25 शब्द प्रति मिनिट असावा लागेल तर वरिष्ठ लिपिक वर्गासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 42 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये.

तसेच ओबीसी आणि एससी/एसटी वर्गातील उमेदवारांना अनुक्रमे 3 आणि 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. उमेदवारांना अर्ज करताना कोणत्याही प्रकारचं शुल्क भारावा लागणार नाही.

कंम्प्युटर बेस्ड टेस्टद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांची टायपिंगची परीक्षा घेतली जाईल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि त्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात येईल. इच्छुक उमेदवारांना  www.rrccr.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

गुजरात सीमेवर लाकडाची तस्करी; वन विभागाच्या कारवाईत दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पेठ / नाशिक | प्रतिनिधी 

शेकडो घनमीटर लाकडाचा साठा हरसूल वनक्षेत्रात वनविभागाने छापा टाकून जप्त केला आहे. सदर साठा गुजरात कडे वाहून नेण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वनविभागाच्या पथकाने छापा टाकत लाकडाचा साठा जप्त केला आहे.

अधिक माहिती अशी,  पेठ तालुक्यातील गुजरात सीमारेषेजवळ असलेल्या देवडोंगरी गावाजवळ खैराच्या झाडांची बेकायदेशीर कत्तल करून हे लाकूड गुजरात राज्यात नेण्यात येणार असल्याची समजले.

त्यानुसार वनविभागाच्या गस्तीवर असलेल्या पथकाने खैराची वाहतुक करणारे वाहन अडविले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी पोबारा केला.

हरसुल व पेठच्या जंगलातून रात्रीचे वेळी हरसूल येथील वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल के.व्ही. सुर्यवंशी ,के,एस. एकशिंगे वनरक्षक एन.एस.पाटील, एम.एस. परडे, आनंदा पवार व वनमजूर रात्रीचे वेळी गस्त घालत असतांना रस्त्यावर आयशर कंपनी या डीएन ० ९, ९९२७ क्रमांकाचा टेम्पो आढळून आला.

गस्ती पथकाची चाहुल लागताच अंधाराचा फायदा घेऊन तस्कर फरार झाले. वाहनाची तपासणी केली असता त्यात बेकायदा कत्तल केलेले खैर वृक्षाचे ओंडके आढळून आले.

मालाचे मोजमाप केले असता ० .८१ घ . मी . त्याचे मुल्य ९,८०० व वाहनाचे मुल्य १ लाख ९० हजार असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

विभागीय व्यवस्थापक यु. सी. ढगे, सहा .व्यवस्थापक एस.एच.वाजे यांचे मार्गदर्शनाखाली बोरीपाडाचे वनक्षेत्रपाल सी.आर.ढोबळ, झरी वनक्षेत्राचे एम.पी.जोशी, वनमजूर यांच्या प्रयत्नांनी सदर कारवाई यशस्वी करण्यात आली.

84 girls avail benefits under Mazi Kanya Bhagyashree

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

The Zilla Parishad, Nashik is no leaving no stone unturned to reach benefits of Mazi Kanya Bhagyashree scheme aimed at the overall development of girl child to every family under below poverty line (BPL) and above poverty line (APL). Under the scheme, the state government will transfer Rs. 50,000 in the bank account if the family opts for only one female baby. In case the couple has two baby girls, then the government will deposit Rs. 25,000 in the name of both the female children separately.

Meanwhile, for FY 2018-19, the ZP administration has disbursed Rs 18.50 lakh to as many as 72 beneficiaries and for the current fiscal 2019-20, so far 12 beneficiaries have been disbursed with the sum assured, while proposals of 36 other applicants are still pending with ZP administration for approval.

The key objectives of the scheme are to ensure increase in the birth rate of a girl child, elimination of sex ratio gap, increase in girl education percentile, create awareness about family planning, the prohibition of sex determination test, oveall health improvement of girl child and provision of financial aid.

उन्नाव बलात्कार प्रकरणी भाजपचा माजी आमदार सेंगरला जन्मठेप

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आमदार कुलदीपसिंग सेंगर यांना दिल्लीच्या तिस हजारी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याव्यतिरिक्त पीडितेच्या कुटूंबाला २५ लाख रुपयांची भरपाई देण्याचेही कोर्टाने निर्देश दिले आहेत.

दरम्यान २०१७ मध्ये उन्नाव येथे कुलदीप सेंगर आणि त्याच्या साथीदारांनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेनंतर भाजप पक्षातून कुलदीपसिंह सेंगर याला काढून टाकण्यात आले होते. आज शुक्रवारी कुलदीपसिंह सेंगरबाबतची कारवाई दिल्ली कोर्टात पूर्ण असून पोस्को कायद्यांर्गत त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याचबरोबर पीडित कुटुंबीयास आवश्यक सुरक्षा पुरविण्याचे आदेशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत. तसेच प्रतिमहिना १५ हजार रुपये एकवर्षांपर्यत देण्याचे आदेशही दिले आहेत.

Fadnavis tweeted ‘fake’ videos of Jamia protests to create confusion: Congress MLA

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NAGPUR:

Congress MLA and Advocate Yashomati Thakur accused former Chief Minister Devendra Fadnavis of trying to create an atmosphere of confusion by tweeting ‘fake’ videos of violent protests against the Citizenship Amendment Act by students in Delhi.

Raising the issue under the point of procedure in the Assembly here on Friday, Advocate Thakur said that Maharashtra being an industrial state could face the repercussions of the confusion created by leaders like Mr Fadnavis.

“The industries should not get affected hence some appropriate measures need to be taken in such issues,” she asserted.

“Former Chief Minister Prithviraj Chavan has already exposed Fadnavis on the tweets,” she told.

Maharashtra Assembly’s Leader of Opposition (LoP) Fadnavis had tweeted a couple of videos, which he purported as violent protests by students of Jamia Millia Islamia university.

शहरात २१२ रिक्षा थांब्यांना पोलिसांची मंजुरी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : शहरातील रिक्षांना उभेच राहण्यासाठी २०१५ मध्ये ठरविण्यात आलेल्या २६३ ठिकाणांपैकी २१२ ठिकाणांना अधिकृत रिक्षा थांबे म्हणून मंजुरी देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. मात्र गुरुवार (दि. १९) पासून एक महिन्यापुरतीच हि मंजुरी आहे.

शहरात २२ हजारांहून अधिक रिक्षा असून, रिक्षांच्या तुलनेत थांब्याची संख्या कमी आहे. रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी यांच्या संयुक्त पथकाने शहरात सर्व्हे करून २६३ रिक्षा थांबे निश्चित केले होते, मात्र आजपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात आलेला नव्हता. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरांमध्ये मान्यताप्राप्त थांबेच नसल्याची बाब गेल्या २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा निदर्शनास आणून दिली होती.

त्यामुळे समस्या सोडविणाच्या दृष्टीने २१२ रिक्षा थांबे अधिकृत करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतला आहे, मात्र दि. १९ डिसेंबर ते १९ जानेवारी या काळात नागरिकांकडून येणाऱ्या हरकती आणि सूचनांची नोंद घेऊनच या २१२ थांब्यांना कायमस्वरूपी रिक्षा थांबा म्हणून दर्जा देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना लेखी स्वरूपात शारांपुर रोड येथील वाहतूक शाखेकडे नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात; उत्तीर्ण व्हा अन्यथा सेवा समाप्त

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालय टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांना पाठीशी का घालत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनुत्तीर्ण असलेल्या राज्यभरातील शिक्षकांची सेवा समाप्त करण्याच्या अवर सचिवांच्या आदेशाची प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.

राज्यात 13 फेब्रुवारी 2013 नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने 31 मार्च 2019ची मुदत दिली होती. या मुदतीत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, ही मुदत वाढवण्याची राज्य शासनाची विनंती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 3 जून 2019 च्या पत्रान्वये फेटाळून लावली. त्यामुळे 24 ऑगस्ट 2018 च्या शासन निर्णयानुसार संबंधित शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. अवर सचिवांनी 25 नोव्हेंबरला प्राथमिक शिक्षण संचालनालयाला कारवाई करून अहवाल सादर करण्याबाबत स्पष्ट केले होते.

असे असतानाही प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याने अद्याप प्रत्यक्ष कारवाई झालेली नाही. टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची सेवा समाप्त केल्यास ते न्यायालयात धाव घेऊन आदेशावर स्थगिती मिळवतील या शक्यतेने शासनाकडून न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामात थोडा वेळ गेल्याने अद्याप कारवाई झालेली नाही, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या तिन्ही खंडपीठांमध्ये कॅव्हेट दाखल करण्याचे काम पूर्ण झाले असून टीईटी अनुत्तीर्णाची सेवा समाप्त करण्याच्या आदेशासंबंधीचा मसुदा तयार करून शासनाला सादर करण्यात येणार आहे. त्याला शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात येईल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

कॉलेजरोडला मोबाईलमध्ये रौलेट जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । मोबाइलमध्ये रोलेट जुगार इस्टॉल करून देत जुगार्‍यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणार्‍या संशयितांविरोधात पोलीस आयुक्तांच्या अवैध धंदे कारवाई पथकाने कारवाई केली. कॉलेज रोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजल्यावरील गाळ्यात बुधवारी (दि.18) रात्री ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉलेज रोडवरील एका दुकानात मोबाइलमध्ये बिंगो, फन रोलेट हे जुगार इन्स्टॉल करून देत जुगार्‍यांना पॉईंट दिले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली. त्यांनी अवैध धंदे कारवाई पथकास कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांनी इतर सहकार्‍यांसोबत ही कारवाई केली. त्यात संशयित जोगंंदर उर्फ पप्पु रघुनंदन शहा हे त्याच्या गाळ्यात इंटरनेटच्या माध्यमातून जुगार्‍यांना ऑनलाइन जुगार गेम डाऊनलोड करून देत असल्याचे आढळून आले.

तसेच जुगार्‍यांकडून पैसे घेऊन त्यांना पॉइंट दिले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या ठिकाणाहून 1 लाख 35 हजार रुपयांची रोकड, वाहन, जुगाराचे साहित्य असा एकूण 4 लाख 899 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गाळा मालक शहा याच्यासह राहुल शाहु पटेल, जसविंदर रवींद्र सिंग, किरण साहेबराव ढोकळे, कमलेश अनिरुद्ध मंडल, राकेश शरद जाधव आणि कैलास जोगेंदर शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिरसाठ, पोलीस नाइक सारंग वाघ, पोलीस शिपाई गजानन पवार, सूरज गवळी आणि संतोष वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आता इन्स्टाग्राम स्टेटसला एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : तरुणाईचे आवडते अँप इन्स्टाग्रामला नवीन फिचर अपडेट झाले आहे. यामध्ये आता इन्स्टाग्राम स्टेटसला एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार आहे. इन्स्टाग्रामचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अँडम मॉसरी यांनी अधिकृत घोषणा केली आहे.

https://twitter.com/mosseri/status/1207076646122995714?s=20

देशातील बहुतांश लोक इन्स्टाग्रामचा वापर करत असतात. यामध्ये इन्स्टास्टेटसला एकावेळी दोन किंवा तीन फोटो शेअर करता येत होते. परंतु आता सहा फोटो ठेवता येणार आहेत. याबाबतचे नवे फीचरची घोषणा सीईओनी आपल्या ट्विटर हँडलवरून केली आहे. या फीचरमुळे कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीशिवाय युजर्सना त्यांच्या ‘स्टोरी स्टेटस’मध्ये एकावेळी सहा फोटो शेअर करता येणार आहेत.

तसेच इन्स्टाग्रामनेदेखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरूनही या नव्या फोटो फिचरची माहिती दिली आहे. यामध्ये युजर्सना नवीन फिचर्स समजावून सांगण्यासाठी फोटो ग्रीड फॉरमॅटचा वापर करून काढलेले ६ फोटो शेअरही करण्यात आले आहेत.

२२ व २३ डिसेंबरला राज्यात पावसाचा अंदाज; नाशिक १३ अशांवर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : थंडीचा जोर वाढत असून मुंबईसह, ठाणे, पालघर भागामध्ये येत्या रविवारी (दि. २२) तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर २३ डिसेंबर पर्यत ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान हवामान बदलांमुळे तुरळक सरी बरसणार असल्याचे स्कायमेट या खाजगी वेधशाळेने सांगितले आहे. त्यामुळे येत्या २२ व २३ डिसेंबर रोजी मुंबईसह नजीकच्या शहरांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

२०१९ या वर्षात पाऊसाने जोरदार धुमाकूळ घातल्याने अनेक ठिकणी पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर दिवसेंदिवस हवामान बदलत आहे. नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा घसरला असून तापमानाचा पारा १३ अशांवर स्थिरावला आहे. दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळेने म्हटले आहे.