Friday, June 19, 2026
Home Blog Page 13378

जळगाव (बांभोरी) : मोटरसायकल अपघातात काका-पुतण्या ठार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

रवंजे, ता.एरंडोल (वार्ताहर) –

जळगाव बांभोरी जवळील जैन पाईप कंपनी समोर आज दि.२० रोजी सकाळी मोटरसायकल अपघातात खडके-रवंजे (ता.एरंडोल) येथील काका-पुतण्या ठार झाल्याची घटना घडली.

सविस्तर असे की, खडके रवंजे, ता.एरंडोल येथील रहीवाशी महेश पोपट तायडे (वय ३२) व त्यांच्या भावाचा मुलगा (पुतण्या) जयवंत उर्फ (सोनू) नाना तायडे (वय १६) हे बांभोरी येथे महेश तायडे यांची बहीण नलूबाई हिचे सासरे नामदेव सिताराम नन्नवरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेसाठी बांभोरी येथे जात असताना जैन पाईप कंपनी समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.

महेश तायडे हा जळगाव येथील नरेंद्र कापड दुकानात कामाला होता तो रवंजे येथून रोज बसने ये-जा करत होता. मात्र आज बहीणीचे सासरे वारल्याने त्यांच्या अंत्ययात्रेसाठी पुतण्याला सोबत घेवून बांभोरी येथे येत असताना हा अपघात घडला.

पुतण्या जयवंत (सोनू) हा दहावीत शिक्षण घेत होता. महेश पोपट तायडे यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर जयवंत उर्फ सोनू याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

या दुर्दैवी घटनेने खडके गावावर शोककळा पसरली असून अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी जळगाव जिल्हा रूग्णालयात मोठी गर्दी केली असून काका-पुतण्याचा मृतदेह बघून सर्वांनीच आक्रोश केला.

जिल्ह्यात ८४ मुली ‘माझी कन्या भाग्यश्री’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | विजय गिते

मुलींचा जन्मदर वाढविणे,लिंग निवड प्रतिबंध करणे,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे, यासाठी‘माझी कन्या भाग्यश्री ’ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे.या योजनेंतर्गत जिल्ह्यात सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ७२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.सन २०१९-२०मध्ये आतापर्यंत १२ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून ३६ लाभार्थ्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण व आरोग्य यामध्ये सुधारणा व्हावी व त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आर्थिक तरतूद केलेली आहे.या योजनेंतर्गत बालिका भ्रूणहत्या रोखणे,मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचारांनी बालविवाह रोखणे आणि मुलांइतकाच मुलींचाही जन्मदर वाढविणे यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.ही योजना दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबात जन्माला येणार्‍या दोन अपत्य मुलींसाठी लागू असून दारिद्र्यरेषेवरील एपीएल कुटुंबात जन्माला येणार्‍या मुलींसाठी या योजनेतील काही लाभ दिले जात आहेत.

या योजनेअंतर्गत एका मुलीनंतर मातीने किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या मुलीच्या नावे ५० हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतविण्यात येतात.दोन मुलीनंतर मातेने किंवा किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांच्या पहिल्या व दुसर्‍या मुलीच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये प्रमाणे मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत ही गुंतवणूक करण्यात येते.

या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात ७३ कुटुंबांना याचा लाभ मिळालेला असून या अंतर्गत १८ लाख ५० हजार रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे.सन २०१९-२० मध्ये आतापर्यंत १२ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.उर्वरित ३६ लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून शासनाकडे यासाठी निधी मागविण्यात आलेला आहे.

सन २०१८-१९ मध्ये तालुकानिहाय लाभ घेतलेली कुटुंबांची संख्या पुढीलप्रमाणे नागरी नाशिक -१९, मालेगाव -४ ,दिंडोरी -३,-सिन्नर -३,पेठ-२, बागलाण-१नाशिक-१,इगतपुरी -४, एकूण ७३.सन २०१९ २० मध्ये लाभ घेतलेल्या लाभार्थींची संख्या तालुकानिहाय-नाशिक ५,इगतपुरी-१, चांदवड-१,बागलान- ३,देवळा-१,दिंडोरी-१एकूण -१२.

योजनेचा लाभ घ्यावा
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत ‘माझी कन्या भाग्यश्री ’ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे.मुलींचा जन्मदर वाढविणे,लिंग निवड प्रतिबंध करणे,मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे,मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ घ्यावा.
अर्पणा खोसकर सभापती,महिला व बाल विकास जि.प.

‘शिवशाही’बस प्रवासाला प्रवाशांची नापसंती! ; नाशिकचे भारमान ४८ टक्के

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

कधी बंद तर कधी चालू होणारे एसी, बसचे बिघडलेले वेळापत्रक, अस्वच्छता आणि अपघातांची वाढती संख्या या कारणांमुळे एसटी महामंडळाच्या शिवशाही वातानुकूलित बस प्रवासाला प्रवाशांनी नापसंती दर्शविली आहे.

नाशिकसह औरंगाबाद, नागपूर, अमरावती प्रदेशात शिवशाहीचे भारमान ५० टक्क्यांपेक्षा खाली आले आहे. भाडेतत्त्वावरील अथवा स्वमालकीच्या शिवशाही बस चालवण्याचा सरासरी खर्च ४२ रुपये प्रति किलोमीटर आहे. परंतु आठ महिन्यांत प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा सहन करूनही या बस चालवण्याचा अट्टहास एसटी महामंडळाकडून केला जात आहे.

आठ महिन्यांत ३९ रुपये प्रति किलोमीटर दराने सुमारे ३६१ कोटी रुपयांचा महसूल शिवशाहीकडून महामंडळाला प्राप्त झाला आहे. तोटा झाल्याने यंदा ४० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा महसूल महामंडळ प्राप्त करण्यात अपयशीच ठरले आहे.

शिवशाहीला प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून प्रति किलोमीटर ३ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये शिवशाही वातानुकूलित बस दाखल केल्या. यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बसचा समावेश होता. प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर शिवशाहीला प्रथम अपघातांचे गालबोट लागले. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मध्ये शिवशाहीचे २२१ अपघात झाले. त्याआधीच्या वर्षी ही संख्या २४० एवढी होती.

अपघात घटले तरी त्याला पूर्णपणे आळा बसला नाही. त्यातच प्रवाशांना न घेताच निघून जाणे, वेळेत बस उपलब्ध न होणे, एसी यंत्रणेसह गाडीत बिघाडासह बसची अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे प्रवाशांकडून तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. १ एप्रिल ते १५ डिसेंबर २०१९ अखेर एसटी महामंडळाचे भारमान गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्क्यांनी घटले. याचे प्रमुख कारण हे शिवशाही सेवेला प्रवाशांकडून मिळालेला अल्प प्रतिसाद. शिवशाही सुरू होताच त्याचे प्रवासी भारमान ५४ टक्के होते. ते या वर्षांत घसरून सरासरी ५१ टक्क्यांवर आहे.

शिवशाहीचे प्रदेशनिहाय भारमान
औरंगाबाद प्रदेश ः ४९ टक्के, मुंबई प्रदेश ः ५८ टक्के, नागपूर प्रदेश ः ४२ टक्के, पुणे प्रदेश ः ५६ टक्के, नाशिक प्रदेश ः ४९ टक्के, अमरावती प्रदेश ः ४५ टक्के

सेवा प्रकार प्रवासी भारमान (टक्क्यांत)
हिरकणी बस ६६
शिवशाही बस ५१
शिवनेरी बस ५०

जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक जानेवारीत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक २ जानेवारी २०२० रोजी होण्याची शक्यता आहे. यासाठी उद्या शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करून अजेंडा काढला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

विद्यमान पदाधिकार्‍यांची अडीच वर्षांची मुदत २१ सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने ऑगस्ट महिन्यात पदाधिकार्‍यांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली. या मुदतवाढीचा अध्यादेश २३ ऑगस्टला काढण्यात आला. त्यामुळे या तारखेपासून पुढे १२० दिवसांचा कालावधी ग्राह्य धरत ग्रामविकास विभागाने गेल्या आठवड्यात नवीन आदेश काढत विद्यमान पदाधिकार्‍यांना दिलेली १२० दिवसांची मुदत २० डिसेंबर रोजी संपत असल्याचे सांगितले.

मात्र या पत्रापाठोपाठ काही तासातच नव्याने पत्र ग्रामविकासकडून काढून यात २० डिसेंबर रोजी वाढीव मुदत संपत असल्याने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात यावी, असे स्पष्ट केले. या पत्रानुसार उद्या शुक्रवारी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची चिन्हे आहेत.

पदाधिकार्‍यांना पुन्हा मुदतवाढ
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पदाधिकार्‍यांची मुदत संपल्यानंतर यापूर्वी देण्यात आलेल्या चार महिन्यांच्या मुदतवाढीनंतर अजून नव्याने दोन महिने अशी एकत्रित सहा महिन्यांची मुदतवाढ देणारे विधेयक विधान परिषदेत संमत झाले आहे. नव्याने वाढीव कालावधीमध्ये पदाधिकारी निवडणूक होणार असून तोपर्यंत जुन्या पदाधिकार्‍यांना कामकाज पाहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पंचायत समित्यांचे सभापती यांची चार महिन्यांची मुदतवाढ २० डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र नवे पदाधिकारी निवडीसाठीची प्रक्रिया २० डिसेंबरनंतर सुरू केली जाणार आहे. त्यामुळे २० डिसेंबरनंतर पदाधिकार्‍यांचे कामकाज बघण्याची व्यवस्था निर्माण करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेता शासनाने पहिले चार महिने आणि त्याला जोडून आणखी दोन महिन्यांचा कालावधी कामकाज पाहण्यासाठी पदाधिकार्‍यांना दिला आहे. या वाढीव कालावधीमध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीची प्रक्रिया होणार असून निवड होताच नवे पदाधिकारी पदावर येतील त्याचवेळी जुन्या पदाधिकार्‍यांचा कालावधी संपुष्टात येईल.

१ लाख ८५ हजार शेतकर्‍यांचा पीक विम्यासाठी दावा; नुकसान भरपाईची प्रतीक्षा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात दोन लाख शेतकर्‍यांनी पीक विमा काढला असून अवकाळी पाऊस नुकसान भरपाई मिळावी, यासाठी एक लाख ८५ ंहजार शेतकर्‍यांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, पीकविमा कंपन्यांकडून मदतीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने जिल्ह्यातील साडेसहा लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. साधारणत: साडेसात लाख शेतकरी बाधित झाले. द्राक्ष, डाळिंब, कांदा, मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, भाजीपाला या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला. शासनाकडून पहिल्या टप्प्यात अवकाळी नुकसानग्रस्तांसाठी १८१ कोटी प्राप्त  झाले, तर दुसर्‍या टप्प्यात ३९६ कोटींची मदत देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १ लाख ९६ हजार ३९३ शेतकर्‍यांनी पीकविमा काढला आहे. त्यापैकी सुमारे १ लाख ८५ हजार शेतकर्‍यांनी पिकविम्यासाठी ऑनलाईन सादर केल होते. जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करतानाच पीकविमा काढलेल्या शेतकर्‍यांची माहिती गोळा करण्यात आली होती. नुकसानीची भरपाई मिळण्याचा प्रस्ताव कृषी विभागाच्या माध्यमातून संबंधित पीकविमा कंपनीकडे पाठविण्यात आलेला आहे.

परतु, कंपनीकडून नुकसान भरपाईबाबत अद्याप कोणत्याही हालचाली पहायला मिळत नाही. शेतकर्‍यांनी विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्याची फारशी दखल न घेता कंपनी प्रतिनिधींकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडून मदत मिळेल की नाही, याबाबत सांशकता व्यक्त होत आहे.

लँड रेकॉर्डसाठी स्वतंत्र पोर्टल; मालमत्ता खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी सरकार नियम बनवणार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

एखाद्या व्यक्तीला घर अथवा इतर स्थावर मालमत्ता खरेदी करायचे असेल, तर त्यामध्ये फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार नवीन नियमावली आणत आहे. एकच मालमत्ता अनेकांना विकण्याचा धोका टाळण्यासाठी यापुढे मालमत्तांच्या ऑनलाईन नोंदणीसाठी सरकारकडून खास पोर्टल विकसित करण्यात येत आहे.

तीस वर्षे जुन्या असणार्‍या मालमत्तांची डिजिटल नोंदणी करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगवेगळ्या लँड रेकॉर्डच्या नोंदणीसाठी एक पोर्टल बनवले जाणार आहे. या पोर्टलवर त्या मालमत्तेबद्दलची संपूर्ण माहिती मिळू शकेल. मालमत्तेचे वाद सोडवण्यासाठी देखील स्वतंत्र यंत्रणा तयार करण्यात येणार आहे. Independent Grievance Redressal System या यंत्रणेच्या माध्यमातून मालमत्तेच्या वादावर तोडगा काढता येईल. २००८ मध्ये लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोग्रॅम सुरू करण्यात आला होता. त्यानंतर राज्य सरकारांनी जमिनीची ऑनलाइन नोंदणी सुरू केली. पण उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ २ ते ३ टक्के मालमत्तांची नोंदणी ऑनलाइन झाली आहे.

मालमत्तेच्या मालकीसाठी सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार तुमच्या स्थावर मालमत्तेचा मालकी हक्क मिळवण्यासाठी त्याबद्दलचा तपशील आधारकार्डला लिंक करावा लागेल. त्यामुळे मालमत्तेच्या खरेदी विक्रीतली फसवणूक तर टळेलच. शिवाय तुमच्याकडे असणार्‍या बेनामी संपत्तीचीही पोलखोल होईल.

जो कोणी आधारकार्डला मालमत्तेचा तपशील लिंक करेल, त्याच्या संपत्तीचा ताबा बेकायदेशीरपणे दुसर्‍या कुणी घेतला तर ती मूळ मालकाला पुन्हा मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी राहील. त्यासाठीची नुकसान भरपाईही सरकार देईल. मालमत्ता आधार कार्डला लिंक केली नाही; तर मात्र सरकार कोणतीही जबाबदारी स्वीकारणार नाही. मालमत्तेचा तपशील आधारकार्डला लिंक करणे हे ऐच्छिक असणार आहे. लोकांना जर त्यांच्या संपत्तीची हमी हवी असेल तर मात्र आधारकार्डला सगळा तपशील लिंक करावा लागेल.

अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभा राष्ट्रीय अधिवेशन : पुरोहितांच्या समस्या सोडवण्यासाठी संघटनाची गरज- महेश पाठक

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

तीर्थ क्षेत्रांच्या ठिकाणी कार्यरत पुरोहितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी मजबूत संघटनेची गरज असून त्यासाठी प्रत्येक प्रदेशात स्वतंत्र अध्यक्ष निवडावे असे प्रतिपादन अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष महेश पाठक यांनी केले.

लेउवा पाटीदार भवन, रामकुंड येथे काल  दि.१९ आयोजित केलेल्या अखिल भारतीय तीर्थपुरोहित महासभेच्या राष्ट्रीय अधिवेशानात ते बोलत होते. या अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष व वरिष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष सतीश शुक्ल, वरिष्ठ महामंत्री श्रीकांत वशिष्ठ, नवीन नागर, जयंत शिखरे, राष्ट्रीयमंत्री दिलीप शुक्ल, वरिष्ठ उपाध्यक्ष रामकृष्ण तिवारी, चिटणीस हेमंत तळाजिया आदी उपस्थित होते.

पाठक यांनी अध्यक्षीय भाषणात तीर्थ पुरोहितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत;असल्याकडे लक्ष वेधले.यासाठी संघर्ष करायला लागत असल्यामुळे सर्वांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे.अन्यायाला एकावेळी विरोध करून चालणार नाही. त्यासाठी वारंवार प्रयत्न करावा लागणार असून युवाशक्तीशिवाय कोणताही संघर्ष अटळ असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक प्रदेशासाठी अध्यक्ष निवडून त्यांच्या माध्यमातून संघटना वाढवावी असे आवाहन पाठक यांनी केले.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रारंभी रामकुंडावर गंगांपूजन करण्यात आले. त्यानंतर पंचवटी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.अमर डिब्बीवाला यांची युवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पाठक यांनी केली. दिनेशशास्त्री गायधनी व भालचंद्रशास्त्री शौचे यांनी मंत्रघोष केला. वेदवेदांग पुरस्कार मिळाल्याबद्दल दिनेशशास्त्री गायधनी यांचा सत्कार करण्यात आला. कीर्ती शुक्ल व नृत्यानंद कथक अकादमीचे शिष्य यांनी गणेशवंदना सादर केली. ऍड. भानुदास शौचे यांनी सूत्रसंचालन केले. रात्री गोदावरीची आरती करण्यात आली. त्यानंतर मोहन उपासनी यांचा वेणूनाद हा बासरी वादनाचा कार्यक्रम झाला.

पुरोहितांची शक्ती, ऊर्जा एकत्रित संघटित करणे यासाठी ं हे अधिवेशन बोलावले आहे. पुरोहितांचा विकास व्हावा. सन्मान वाढावा, यासाठी देशभरातील तीर्थपुरोहित वर्ग संघटित झाला पाहिजे असे सतीश शुक्ल यांनी सांगितले.

पाथर्डीचे शिवाजीराव गर्जे विधान परिषदेवर; आज शपथ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाथर्डी (प्रतिनिधी)- राज्यपाल भगतसिंह कोशीयरी यांनी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे व मुंबई युवती राष्ट्रवादी-काँग्रेसच्या अध्यक्षा आदिती नलावडे यांची विधानपरिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. यातील गर्जे हे दुलेचांदगावचे (ता. पाथर्डी, जि. नगर) रहिवासी आहेत.

गर्जे यांनी आतापर्यंत सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सुरुवातीच्या काळात अकोले येथील महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून आदिवासी भागात काम केले. त्यांनतर प्रशासकीय सेवेत उपजिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी म्हणूनही काम केले. लातूर येथील भूकंपाच्यावेळी त्यांनी मेहनत घेऊन आपत्कालीन परिस्थिती योग्यप्रकारे हाताळल्याने तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांचे लक्ष वेधले गेले.

त्यांच्या अत्युत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राज्य शासनातर्फे गौरविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2000 साली प्रवेश केला. पुढे 2009 साली मनसेकडून शेवगाव विधानसभा लढविली. पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला 2009 पासून आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.

2014 मध्ये काही काळासाठी राज्यमंत्री दर्जा असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी ते कार्यरत होते. गर्जे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व वरिष्ठ नेत्यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. प्रदेश कार्यालयात व पक्षात त्यांनी प्रशासन, निवडणूक नियोजन व पक्ष संघटना अश्या सर्व प्रकारच्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे त्यांना विधान परिषदेची बक्षीसी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

निळवंडेतून शिर्डी- कोपरगाव बंदिस्त पाणीपुरवठ्याला परवानगी – सौ. कोल्हे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

कोपरगाव (प्रतिनिधी)- निळवंडे धरणातून प्रस्तावित शिर्डी, कोपरगाव बंदीस्त पाईपलाईन योजनेला औरंगाबाद खंडपीठाने हिरवा कंदील दिला आहे. या योजनेचे सर्व अडथळे दूर झाले असून कोपरगाव शहरवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली. न्यायालयाच्या निर्णयामुळे माझ्याबद्दल गैरसमज निर्माण करणार्‍या विरोधकांना चपराक असून आपली आमदारकी सार्थकी लागल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निळवंडे- शिर्डी- कोपरगाव ही बंदीस्त पाईपालाईन मंजूर करून घेतली होती. या योजनेचे फेज 1 चे काम शिर्डी शहरात सुरू झाले होते. मात्र या पाईपलाईन विरोधात निळवंडे लाभधारक शेतकर्‍यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून सदर योजनेच्या कामाला स्थगिती मिळविली होती.

न्यायालयात या याचिकेवर न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्या. अविनाश घारोटे यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. त्यात निळवंडे धरणातील 15 टक्के पिण्याच्या पाण्याच्या आरक्षित साठ्यातून शिर्डी, कोपरगावला पाणी देण्यास हरकत नसल्याचे सांगत न्यायालयाने या बंदिस्त पाईपलाईन योजनेला हिरवा कंदिल दिला.

याबाबत माहिती देताना माजी आ. स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, निळवंडे धणातून बंदिस्त पाईपलाईव्दारे कोपरगाव शहराला शुध्द पाणी मिळणार आहे. यासाठी मी या योजनेचा पाठपुरावा केला. अनेकांनी या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. शेजारच्या तालुक्यांतील नेत्यांबरोबरच तालुक्यातील परंपरागत विरोधकांसह शहरातील झारीतील शुक्राचार्यांनी कोर्टात हा संघर्ष नेला. शेतकर्‍यांमध्ये माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केले. शहरातील जनतेला चुकीची माहिती देऊन माझ्याविरोधात असंतोष पसरविण्याचे काम केले. मात्र माझी भूमिका प्रामाणिक होती. शहरातील महिलांना शुध्द पाणी देण्याचे स्वप्न मी पाहिले होते. यासाठी माझी आमदारकी पणाला लावली.

विरोधकांनी न्यायालयात नेलेल्या या प्रश्‍नाला साईबाबाच न्याय मिळवून देतील अशी मला खात्री होती. आज न्यायालयाने योजनेला दिलेली स्थगिती उठविल्याने माझे शहरातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे हा आनंद आहे. विरोधकांनी माझ्याबद्दल जनतेमध्ये चुकीचा संदेश देऊन राजकारणासाठी माझ्याविरूध्द कटकारस्थान केले. आज न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने विरोधकांना चागली चपराक बसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाचे नागरिकांनी फटाके फोडून स्वागत केले. शिर्डी कोपरगाव बंदिस्त पाईपलाईन योजनेच्या जलद कामासाठी बंदिस्त पाईपलाईन कृती समिती स्थापन करण्यात येणार असून भविष्यात योजनेच्या कामात अडथळा आणणार्‍यांना शिवसेना स्टाईल उत्तर देण्यात येईल असे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव व माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांनी सांगितले. यावेळी भाजपचे गटनेते रवींद्र पाठक, पराग संधान, युवा नेते विवेक कोल्हे, उपनगराध्यक्ष योगेश बागुल, विजय आढाव, कैलास जाधव, तालुकाध्यक्ष शरद थोरात, शहराध्यक्ष कैलास खैरे आदीसह भाजप शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते.

पोहेगाव येथील सभेत आशुतोष काळे यांनी शेतकर्‍यांना सांगितले होते, निळवंडे लाभक्षेत्रातील 11 गावांवर मी अन्याय होऊ देणार नाही. निळवंडेचे पाणी कोपरगावला जाऊ देणार नाही. प्रसंगी शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढाई लढू. त्याच्या चित्रफिती आजही उपलब्ध आहे. आज न्यायालयाने बंदिस्त पाणी योजनेस परवानगी दिली आहे. आता विद्यमान आमदारांनी या योजनेबाबद आपली भूमिका जाहीर करावी.

– विवेक कोल्हे, युवा नेते

कोपरगावला पाणी देताना अनेकवेळा माझ्या डोळ्यात पाणी आलं. महिला म्हणून मला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले. आरक्षण कोट्यातून पाणी मिळत होते. तरीही शेतकर्‍यांना तुमचे पाणी कमी होते असे सांगून माझ्याविरूध्द भडकविले. त्याचा परिणाम पोहेगाव गटात मला मताधिक्य मिळाले नाही. ज्या शहराच्या भविष्याचा विचार करून पाणी योजना राबविली त्यांनीही साथ दिली नाही. विरोधक अपप्रचार करण्यात यशस्वी ठरले. याची चिंता नाही. शहरवासीयांना पाणी मिळणार आहे. मी मनापासून लढले अन् जिंकलेही याचा मला आनंद आहे.

– स्नेहलता कोल्हे, माजी आमदार

कापूस व्यापार्‍याचे पावणेतीन लाख लांबविले

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

धुळे  – 

गुजरात राज्यात कापूस विकून घर परतणार्‍या व्यापार्‍याच्या बॅगमधून चोरट्याने दोन लाख 66 हजाराची रोकड लांबवल्याची घटना शहरातील धुळे बसस्थानकावर घडली. तर दुसर्‍या बॅगेच्या भागात ठेवलेले दोन लाख रुपये चोरट्याच्या हाती लागले नाहीत.

याबाबत माहिती अशी की, धुळे तालुक्यातील नंदाळे येथे राहणारे शेतकरी विकास पाटील हे गुजरात राज्यात कापूस विक्रीसाठी गेले होते. कापूस विक्रीनंतर चार लाख 66 हजार रुपये एका रेग्जीनच्या बॅगमध्ये ठेवून त्यांनी परतीचा प्रवास केला.

बॅगमध्ये पैसे ठेवतांना त्यांनी पांघरण्यासाठी म्हणून घेतलेल्या ब्लॅकेटमध्ये एक बाजूला दोन लाख तर दुसर्‍या बाजुला दोन लाख 66 हजार 660 रुपये ठेवले होते.

काल सायंकाळी अहमदाबाद येथून अहमदाबाद-औरंगाबाद या गुजरात डेपोच्या बसने त्यांनी प्रवास केला. आज सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास ते धुळे बसस्थानकावर उतरले.

त्यांना गावी जाण्यासाठी गिरणा डॅम ही बस सकाळी पावणे आठ वाजता असल्याने ते बसस्थानकावरच थांबले. दरम्यानच्या काळात त्यांनी बाहेर जावून चहा व नास्ता घेतला.

त्यानंतर गिरणा डॅम बसमध्ये चढत असतांना त्यांची बॅग चोरट्याने कापली व बॅगेच्या एका कप्प्यातील दोन लाख 66 हजार 660 रुपये लांबविले.

पैसे चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.