Sunday, May 4, 2025
Home Blog Page 2

Accident : गतिरोधकावर दुचाकी आदळून एक ठार; दोन जण जखमी

0

 

 

दिंडोरी। प्रतिनिधी Dindori

गतिरोधकावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दुचाकवरील अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले.

धनंजय शरद वार्डे (रा. मुरकुटे गल्ली दिंडोरी), योगेश थविल (रा. इंदिरानगर, दिंडोरी) आणि अजून एक व्यक्ती (नाव माहिती नाही) असे तिघे जण (एमएच 15 एचएन 9019) या दुचाकीने नाशिक – कळवण रस्त्यावरुन जात असताना वनारवाडी शिवारातील न्यू स्टार गॅरेजसमोर असलेल्या गतिरोधकाजवळ गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी जोरात आदळली.

दुचाकी जमिनीवर पडून झालेल्या अपघातात धनंजय वार्डे हा सतरा वर्षाचा दुचाकीस्वार ठार झाला व इतर दोघे जखमी झाले.

नाशकातील धोकादायक वाड्यांना मनपाकडून नोटीसा

0

 

 

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, नाशिक महापालिकेने जुने नाशिक परिसरासह शहरातील इतर काही भागातील धोकादायक इमारती, जुने वाडे व घरांना नोटासा देण्यास सुरूवात केल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान अत्यंत धोकादायक झालेल्या काझीगढीचा प्रश्न यंदाही गाजणार असल्याची चिन्हे आहे. कारण मनपाकडून त्यासाठी काही ठोस नियोजन करण्यात आल्याचे दिसत नाही. दर वर्षी पावसाळ्यात शहरातील जुन्या इमारतींना तडे जातात, काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दुर्घटनांपासून बचाव करण्यासाठी महापालिकेने आतापासूनच तयारी सुरु केली असून, धोकादायक घरांची यादी तयार करून संबंधितांना नोटिसा पाठवल्या जात आहेत.

गंगा घाट परिसरात हजारो भाविकांची ये-जा असते. त्यामुळे घाटाजवळील धोकादायक वाड्यांची स्थिती गंभीर बनत आहे. महापालिकेच्या नोटिसा ही सुरुवात असली तरी या ठिकाणी तत्काळ योग्य उपाययोजना न झाल्यास संभाव्य अपघात टाळणे कठीण जाईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, काझीगढीची समस्या अद्याप कायम ती गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी वारंवार निवेदने दिली असली तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्याामुळे या पार्श्वभूमीवर केवळ नोटिसा देणे पुरेसे नसून, शहराच्या विविध भागांतील दीर्घकालीन समस्यांवर महापालिकेने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Crime : लाखो रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला

0

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दरवाजा तोडून चोरट्यांनी एका घरातील कपाटातून सुमारे 11 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना आनंदवली, नवश्या गणपती परिसरात घडली. यात सुमारे 10 लाखांचा ऐवज चोरी झाला आहे.

प्रवीण गोवर्धन भोळे (रा. नवश्या गणपतीजवळ, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, बंद घराचा दरवाजा उघडून चोरट्यांनी बेडरूममधील दोन कपाटांतील सामान अस्ताव्यस्त फेकले. या कपाटातील 80 हजार रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, 96 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे पेंडंट व मंगळसूत्र, एक लाख 15 हजार रुपये किमतीचे 13 ग्रॅम वजनाचे फॅन्सी मंगळसूत्र, एक लाख 52 हजार रुपये किमतीचे 19 ग्रॅम वजनाचे तीन जोड कानातील टॉप्स,

एक लाख 44 हजार रुपये किमतीची 18 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 96 हजार रुपये किमतीचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 40 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडंट, 96 हजार रुपये किमतीच्या 12 ग्रॅम वजनाच्या तीन लेडीज अंगठ्या, 48 हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व 72 हजार रुपये किमतीचे एक ग्रॅम वजनाचे दोन पाळ्यांचे मंगळसूत्र, 48 हजार रुपये किमतीची सहा ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी असा एकूण नऊ लाख 87 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

गंगापूर ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक निरीक्षक अहिरराव करत आहेत.

Shirdi : दिल्ली-शिर्डी विमानात एअर होस्टेसचा विनयभंग

0

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

दिल्लीहून शिर्डीला येणार्‍या विमानात (Delhi Shirdi Flight) एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग (Air Hostess Molested) केल्याची धक्कादायक घटना घडली. इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईट क्रमांक 6A 6403 मध्ये घडली. विमान (Plane) शिर्डीत उतरल्यानंतर एअरलाइन्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राहाता पोलिसांनी (Rahata Police) आरोपी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रवाशी लष्करी जवान असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित एअर होस्टेस मूळची केरळमधील (Kerala) कोचीन येथील आहे. शुक्रवारी 2 मे रोजी दुपारी 1 वाजून 40 मिनिटे ते 4 वाजून 10 मिनिटांच्या दरम्यान दिल्ली ते शिर्डी या विमानाच्या (Delhi to Shirdi Flight) प्रवासादरम्यान ही घटना घडली. आरोपी प्रवासी संदीप सुमेर सिंग याने एअर होस्टेसला दोन वेळा जाणीवपूर्वक स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर शिर्डी विमानतळ (Shirdi Airport) इंटरग्लोब एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड इंडिगो कंपनीचे कर्मचारी संतोष कोंडीबा चौरे रा. लोणी यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये (Rahata Police Station) फिर्याद दाखल केली.

फिर्यादीनुसार पीडित एअर होस्टेसने याबाबत लेखी तक्रार दिली असून, आरोपी संदीप सुमेर सिंग (रा. गालड, चुरू, राजस्थान) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 354 (विनयभंग) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार पेटारे करत आहेत. या घटनेमुळे विमान प्रवासादरम्यान महिला कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

राज्याचे तीन मंत्री उद्यापासून इटलीच्या दौऱ्यावर

0

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

इटलीत आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅकफ्रूट’ प्रदर्शनाला उपस्थित राहण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह तीन मंत्री उद्या रविवारी इटलीच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

इटलीतील रोमिनी येथे ‘मॅकफ्रूट -२०२५’ हे जगातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय फळे आणि भाजीपाला प्रदर्शन ६ ते ८ मे या काळात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला माणिकराव कोकाटे यांच्यासह पणनमंत्री जयकुमार रावल आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे भेट देणार आहेत. या तिन्ही मंत्र्यांचा दौरा ४ ते ९ मे असा आहे.

इटलीच्या दौऱ्याचा खर्च बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी असलेल्या आर्थिक तरतुदीतून भागवण्यात येणार आहे.

या दौऱ्यात भारतीय दुतावास, इटलीतील चेंबर आँफ काँमर्स, आयातदार आणि वितरकांच्या प्रतिनिधींसोबत व्यावसायिक बैठका होणार आहेत.

माघार घेता घेता…काका झाले आमदार

0

श्रीराम जोशी| 9822511133

पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस मला आजही आठवतो….2009मधील विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवारी माघारीचा तो शेवटचा दिवस होता… काँग्रेसकडून जयंत ससाणे, शिवसेनेकडून डॉ. राजेंद्र पिपाडा व अपक्ष अरुणकाका जगताप उमेदवार होते… कोण रिंगणात राहते व कोणात लढत होते याची उत्सुकता होती….दुपारी अडीचची वेळ होती… जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये एक चारचाकी आली व सरळ जिल्हाधिकार्‍यांच्या नगर निवास या निवासस्थानाच्या लोखंडी दरवाजाजवळ जाऊन थांबली…दादा कळमकर व अरुणकाका जगताप असे दोघेच त्या गाडीत होते…इकडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पोर्चमध्ये श्रीरामपूरचे माजी आमदार जयंत ससाणे अस्वस्थ होते…येरझर्‍या घालत गाडीकडे पाहात होते…पत्रकार म्हणून मी एकटाच तेथे होतो….या सगळ्या घडामोडींचे मलाही कुतूहल होतेच…

पावणे तीन वाजले आणि गाडीचा दरवाजा उघडला गेला….दादा कळमकर मोबाईल फोनवर बोलत बाहेर आले….कोणाशी तरी त्यांचा संवाद सुरू होता…3-4 मिनिटे ते बोलले व पुन्हा गाडीत बसले….क्षणार्धात गाडी सुरू झाली व पोर्चमध्ये वळसा घालून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडू लागली….ते पाहिल्यावर जयंत ससाणे अस्वस्थ झाले….त्या गाडीजवळ ते गेले…गाडीच्या काचा खाली झाल्या….जयंतराव म्हणत होते….काका, असे करू नका. माघार घ्या. माझे राजकीय करियर संपून जाईल. सारे अवघड होऊन जाईल….तुमच्यावर माझी सारी भिस्त आहे…त्यांचे बोलणे सुरू होते…त्यांनी हात जोडलेले होते…गाडीतून काहीही प्रतिसाद आला नाही….त्यांचे बोलणे झाले आणि गाडीच्या काचा वर होऊन गाडी दुसर्‍या क्षणी पोर्चबाहेर पडली…इकडे ससाणेंनी डोक्याला हात लावला व तेही त्यांच्या समर्थकांसमवेत लगेच बाहेर पडले. मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मलाही हात जोडले व नंतर बोलतो म्हणून ते निघून गेले. त्या घटनेनंतर माघारीची मुदत संपल्याने रिंगणात किती राहिले व मतदान प्रक्रियेविषयी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेऊन मी त्यावेळी काम करीत असलेल्या सकाळ कार्यालयात आलो व निवडणुकीची बातमी केली तसेच विशेष बातमी पान 1 साठी दिली….माघार घेता घेता काका माघारी वळले….त्यात हा सगळा घटनाक्रम दिला.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या पहिल्या पानावर ही बातमी ठळक स्वरुपात छापून आली आणि सकाळीच मला अरुणकाकांचा फोन आला….श्रीरामजी, खूप मस्त बातमी दिली तुम्ही… मी त्यांना धन्यवाद म्हटले व आपण आता आमदार झालाच आहात, त्यामुळे सर्वात आधी आमदारकीच्या तुम्हाला शुभेच्छा देतो…अभिनंदन करतो…असे त्यांना म्हटले…त्यावर ते म्हणाले, अहो श्रीरामजी, थांबा जरा. अजून मतदान व्हायला वेळ आहे. मी म्हटले, नाही हो काका….दादा व भय्या तुमच्यासमवेत असल्यावर तुम्ही आजच आमदार झालात…त्यावर ते मोठ्याने हसले….तुमचा अभ्यास चांगला आहे, तसे जर झाले तर तुमच्या तोंडात पहिली मी साखर भरवेन….मी धन्यवाद म्हणून व पुन्हा त्यांचे अभिनंदन करून संभाषण संपवले….

त्यानंतर, निवडणूक सुरू झाली. त्याच्या बातम्याही त्या-त्यावेळी दिल्या. कोणत्या राजकीय घडामोडी घडत आहेत, कोण कोणाबरोबर आहे, कोणाचे पारडे जड आहे….अशा बातम्या सुरूच होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष मतदान झाले. मतमोजणीच्यावेळीही मी होतो. डॉ. पिपाडांना 85, ससाणेंना 180 व अरुणकाकांना 220 मते मिळाली. अरुणकाका 40 मतांनी निवडून आले व आमदार झाले. मतमोजणीच्या ठिकाणीच त्यांनी मला मिठी मारली. तो आनंदक्षण आम्ही दोघांनीही अनुभवला. आजूबाजूचे अनेकजण व माझे पत्रकार मित्र तो क्षण पाहातच राहिले. माघार घेता घेता आमदार झालेले अरुणकाका त्यामुळेच जास्त लक्षात राहिले. त्यानंतर 2016मध्ये ते पुन्हा स्थानिक स्वराज्य मतदार संघातून ते आमदार झाले. नगरपालिका, महापालिका, क्रिकेट असोसिएशन, आयुर्वेद महाविद्यालय आदी माध्यमांतून अरुणकाकांशी मैत्रीचे संबंध आधीपासून होतेच. मात्र, ते पहिल्यांदा आमदार झाले व त्यासंबंधित बातम्यांशी माझा व्यक्तिगत संबंध राहिला…या आठवणी आज मनात दाटून आल्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धाजली….

Politics News : उत्तर महाराष्ट्रात शरद पवार गटाला धक्का; माजी मंत्री, आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश

0

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) गटाचे जळगाव जिल्ह्यातील नेते आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश केला. या दोघांनी २०२४ ची विधानसभा निवडणूक अनुक्रमे जळगाव ग्रामीण आणि एरंडोलमधून लढवली होती. याशिवाय माजी आमदार कैलास पाटील, दिलीप पाटील, शरद पाटील यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. या पक्ष प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रात शरद पवार गटाला धक्का बसला आहे.

चर्चगेट येथील के. सी. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunit Tatkare) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी बोलताना अजित पवार यांनी, बेरजेचे राजकारण करत आपण सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया, असे सांगताना सभासद नोंदणीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा करण्याचे  आवाहन केले.

आम्ही राजकारणात (Politics) किंवा सार्वजनिक जीवनात जात-पात, धर्म कधी पाळला नाही. अठरापगड जातींना घेऊन शिवरायांनी जसे राज्य केले त्याच पध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे, असेही पवार यावेळी म्हणाले. तुम्हाला शिवसेना चालत असेल तर भाजप (BJP) का चालत नाही? असा सवाल करत अजित पवार यांनी शरद पवार गटावर निशाणा साधला.

गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार (MLA) होते, त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे असे ठरले होते, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तर, उभ्या महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी सज्ज होऊया, असे आवाहन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी केले. खान्देशाचा विकास सर्वांना सोबत घेऊन करायचा आहे. भविष्यात हा विकास पक्षाच्यावतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, शरद पवार गटाच्या उत्तर विभागीय अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती, बाजार समितीच्या प्रमुख पदाधिकारी आणि  कार्यकर्त्यांनीही अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील,आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, सुरेखाताई ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव आदी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात घरफोडी करणारी ‘खिडकी गँग’ धुळ्यात जेरबंद

0

धुळे : प्रतिनिधी – खिडकीची ग्रिल काढून घरात प्रवेश करून चोरी करणाऱ्या ‘खिडकी गँग’चा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. महाराष्ट्र भर पाहिजे असेलेल्या अतिशय सराईत पाच चोरट्यांना अटक केली. या टोळीने साक्री रोडवरील महिंदळे शिवारातील एका घरातून लग्नासाठी जमवलेले सोनं व रोकड असा 12 लाख 78 हजाराचा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी या टोळीकडून कारसह दागिने असा एकूण 15 लाख 66 हजाराचा  मुद्देमाल जप्त केला आहे.

Nashik Crime : जाधव बंधू हत्याप्रकरण; पाच जणांना तिसऱ्यांदा पोलीस कोठडी मंजूर

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

उपनगर (Upnagar) येथील आंबेडकरवाडीत जाधव बंधू हत्याकांडासह (Jadhav Brother Murder Case) कटात सहभागी सातवा संशयित मंगेश चंद्रकांत रोकडे याच्या अटकेनंतर या हत्याकांडात वापरण्यात आलेल्या व खरेदी केलेल्या हत्यारांची माहिती उघड होणार आहे. कारण, एसआयटीने (SIT) पूर्वी अटकेत राहून न्यायालयीन कोठडीत असलेल्या पाच संशयितांचा न्यायालयाकडून सलग तिसऱ्यांदा ताबा मिळविला आहे. त्यामुळे आता सातवा संशयित मंगेश व इतर पाच संशयितांना समोरासमोर बसवून खून प्रकरणासह हत्यारांच्या खरेदीसह वापरानंतर त्यांची विल्हेवाट व कटाचा सखोल तपास एसआयटी करणार आहे. खूनांत वापरलेली सर्वच वाहने, हत्येसाठी अर्थपुरवठा केला का? कुणी केला याचा उलगडा लवकरच होणार आहे.

सागर मधुकर गरड (३२, रा. आंबेडकरवाडी), अनिल विष्णू रेडेकर (४०, रा. उत्तरानगर), सचिन विष्णू रेडेकर (४४, रा. गायत्रीनगर), योगेश चंद्रकांत रोकडे (३०, रा. आंबेडकरवाडी), अविनाश उर्फ सोनू नानाजी उशीरे (२६, रा. नवीन सिडको) अशी पाच मुख्य संशयितांची नावे असून त्यांना न्यायालयाने (Court) एसआयटीच्या विनंतीनुसार २५ एप्रिल रोजी पोलीस कोठडी सुनावली होती. त्या तपासात सहावा संशयित (Suspected) योगेश गरड याला पकडण्यात आले होते. त्यांनतर, सातवा संशयित मंगेश रोकडे याचे नाव समोर आले. मात्र तो १९ मार्चपासून (रंगपंचमी) परागंदा होता. त्याचा शोध सुरु असताना गुंडाविरोधी पथकाने ठाणे येथील मनोरमानगर स्लम भागातून नुकतीच अटक (Arrested) केली होती.

दरम्यान, वरील पाच संशयितांच्या पोलीस कोठडीची (Police Custody) मुदत संपल्याने न्यायालयाने त्यांना ‘एमसीआर’ सुनावला होता. याचवेळी गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त आणि एसआयटीचे (विशेष तपास पथक) प्रमुख संदीप मिटके यांनी तपासादरम्यान वाहने, धारदार हत्यारे व त्यांची विल्हेवाट आणि खरेदीबाबत काही महत्वाच्या मुद्यांचा तपास करावायचा असल्याने संशयितांचा ताबा पुन्हा एसआयटीकडे देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. यानंतर, न्यायालयाने काही मुद्यांवर कटाक्ष टाकून सलग तिसऱ्यांदा पाच संशयितांचा ताबा एसआयटीकडे सोपविला.

एसआयटीमुळे दोघांचा तपास

उमेश व प्रशांत या सख्ख्या भावांचा खून (Murder) करण्यात आल्यावर मृतांच्या नातलगांसह विविध संघटनांसह मित्रपरिवाराने पोलीस तपासावर संशय व्यक्त केला होता. या निषेधार्थ मोर्चाही काढला होता. तत्पूर्वी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या हत्याकांडाचा विशेष तपास पथकामार्फत तपास करण्याचे आदेश काढले. या एसआयटीची जबाबदारी गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्याकडे सोपविली. अखेर या एसआयटीने पाच आरोपींव्यतिरिक्त कटातील दोघांचा सहभाग उघड केला असून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. या दुचाकींवर रक्तांचे नमूने मिळाले आहेत.

हत्यारे कोणी पुरवली याचा तपास

– कटाचा मास्टरमाईंड कोण हे कोडे उलगडणार
– हत्या का झाल्या याची माहिती उघड होणार
– हत्यारांची लवकरच रिकव्हरी होणार
– सहावा संशयित सागरचा सख्खा भाऊ योगेश गरड
– सातवा संशयित मंगेश ४२ दिवसांपासून नातगांकडे आश्रयास
– हत्येसाठी तलवार, कोयते, जांबिया व इतर टणक हत्यारांचा वापर

Nashik Fraud News : पुन्हा सायबर फ्रॉड; शेअर मार्केटच्या नादात गमवले ३७ लाख रुपये

0

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शेअर मार्केट व आयपीओत गुंतवणूक (Share Market and IPO Investment) करण्यास भाग पाडून शहरातील दोघा ब्रोकरांसह सायबर चोरांनी (Thief) गुंतवणुकदारांना वेगवेगळया दोन घटनांमध्ये तब्बल ३७ लाख रूपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी भद्रकाली आणि सायबर पोलीस ठाण्यात (Bhadrakali and Cyber Police Station) फसवणूक आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

होलाराम कॉलनीत राहणाऱ्या गिरीश चंद्रकांत कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे यांना संशयित प्रतिक विकास वैद्य (रा. हॉटेल कामत शेजारी, पुणेरोड, नाशिक) व विवेक खोंडे (रा. वडजाई मातानगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) या ब्रोकरांनी गंडविले. संशयितांनी १ मे २०२२ रोजी कांबळे यांची एमजीरोड (MG Road) येथील एका इलेक्ट्रॉनिक या दुकान परिसरात भेट घेत विश्वास संपादन केला.

यावेळी शेअरमार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परताव्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले. काही काळ परताव्याची रक्कम देत नंतर गुंतवणुकीची रक्कमही देण्यास टाळाटाळ केली. तर, संबंधित संशयितांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने कांबळे यांनी पोलिसात धाव घेतली. यात विवेक खोंडे यांनी २९ लाख १६ हजार ३०० रूपयांची तर वैद्य याने ९० हजार अशी सुमारे ३० लाख ६ हजार ३०० रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case) करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.

तर शहरातील ३५ वर्षीय व्यक्तीची सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) फसवणूक (Fraud) केली. वेगवेगळया व्हाटसअप क्रमांकावरून जानेवारी महिन्यात तक्रारदाराशी संपर्क साधण्यात आला होता. वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्टॉक मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून भामट्यांनी स्टॉक मार्केट ब्रोकर असल्याचे भासवून भामट्यांनी तक्रारदार यांना गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. विश्वास संपादन होताच तक्रारदारास वेगवेगळया बँक खात्यात पैसे भरण्यास भाग पाडून भामट्यांनी ही फसवणूक केली. या घटनेत तब्बल सात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असून सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक ढवळे करीत आहेत.