Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 24

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली आणि आता म्हणते..

0
पहलगाम

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही जीव गमवावा लागला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयब्बाचा एक गट टीआरएफने (TRF) स्वीकारली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर कमांडर सैफुल्लाहने हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला. यानंतर, द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) ने देखील एक निवेदन जारी करत पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारली आहे.

द रेझिस्टन्स फ्रंट पहलगाम घटनेत कोणत्याही प्रकारचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे. हल्ल्यासाठी टीआरएफला दोष देणे चुकीचे आहे. हा घाईघाईत घेतलेला निर्णय आहे. काश्मिरी प्रतिकाराला बदनाम करण्यासाठी हे सुनियोजित मोहिमेचा एक भाग आहे, असे टीआरएफने म्हटले आहे.

द रेझिस्टन्स फोर्स -टीआरएफने पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबादारी स्वीकारली होती. या हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते. यामधील दोन दहशतवादी स्थानिक तर चार दहशतवादी हे पाकिस्तानातील असल्याचे समोर आले होते. या दहशतवाद्यांचे रावळपिंडी आणि रावळकोट कनेक्शन आता उघड झाले आहे. तर काही निवृत्त लष्करी अधिकार्‍यांच्या दाव्यानुसार दहशतवाद्यांमध्ये दोन जण हे पाकिस्तानी लष्करातील कमांडो असल्याचे म्हटले होते.

सायबर हल्ल्यामुळे पोस्ट केल्याचा दावा
टीआरएफने पोस्टमध्ये लिहिले आहे की, पहलगाममधील हल्ल्यानंतर लगेचच आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून एक खोटा संदेश पोस्ट करण्यात आला. चौकशीनंतर असे आढळून आले की, ते सायबर हल्ल्यामुळे पोस्ट केले गेले होते. उल्लंघन निश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण चौकशी करत आहोत. एवढेच नाही तर दहशतवादी संघटनेने या सायबर हल्ल्यासाठी भारतीय सुरक्षा संस्थांनाही जबाबदार धरले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या टीआरएफ या संघटनेने घुमजाव केले. हा हल्ला आपण केला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर त्याचवेळी टीआरएफने या हल्ल्यात आपला हात नसल्याचे म्हटले आहे. हा निश्चितच योगायोग नाही. पाकिस्तान सरकारने संघटनेवर दबाव टाकल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा डेप्युटी कमांडर सैफुल्लाह कसुरीचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये त्याने दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, आम्ही या हल्ल्याचा निषेध करतो. याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. भारताच्या माध्यमांनी आणि सरकारने कोणत्याही पुराव्याशिवाय आम्हाला आणि पाकिस्तानला जबाबदार धरले. हे एक षडयंत्र आहे. एवढेच नाही तर कसुरीने भारताला युद्ध शत्रू म्हटले आहे. भारत पाकिस्तानला नष्ट करू इच्छितो. भारताने काश्मीरमध्ये 10 लाख सैन्य पाठवून युद्धाचे वातावरण निर्माण केले आहे. पहलगाममध्ये भारतानेच हल्ला केला आहे आणि तो त्यासाठी जबाबदार आहे. हे त्याचे षड्यंत्र आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

PM Shahbaz Sharif : “भारताने जर आमचं पाणी रोखलं तर…”; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफांचे मोठे विधान

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने (India) कठोर भूमिका घेत पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार (Indus Water Treaty) स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा थयथयाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. भारताचे आरोप नाकारत पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पहलगाम हल्ल्याच्या चौकशीची मागणी केली. तसेच आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जायला तयार आहोत, असे म्हणत त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे.

यावेळी बोलतांना शहबाज शरीफ (Shahbaz Sharif) म्हणाले की, “पाकिस्तानचे पाणी (Pakistan News)कमी करणे किंवा अन्य ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ. आम्ही कोणत्याही कारवाईस उत्तर देण्यास तयार आहोत. शांतता हीच आमची प्राथमिकता आहे. आम्ही पाकिस्तानच्या अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत कोणतीच तडजोड करणार नाही. पाकिस्तानला शांतता हवी आहे. पण या इच्छेला कमजोरी समजू नये”, असे त्यांनी लष्करप्रमुखांसमोर बोलताना म्हटले.

तसेच “आम्ही पूर्ण तयारनिशी आहोत. त्यामुळे कुणीही काही चूक करू नका. २४० कोटी लोक देशात आहेत. आम्ही आमचे शूर लोक सशस्त्र दलांच्या मागे आहेत. हा संदेश मोठ्याने आणि स्पष्ट असायला हवा. पहलगाममधील अलिकडची दुर्घटना ही या सततच्या आरोप-प्रत्यारोपाच्या खेळाचे आणखी एक उदाहरण आहे, जी आता थांबली पाहिजे. एक जबाबदार देश म्हणून आम्ही आमची भूमिका कायम ठेवतो. असेही पाक पंतप्रधान शरीफ यांनी म्हटले.

दरम्यान, या करारासंदर्भात शुक्रवारी (दि.२५) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराबाबत बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्रमंत्री, जलशक्तीमंत्री आणि तिन्ही मंत्रालयांचे सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील यांनी ‘सिंधू पाणी कराराबाबत घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. हा निर्णय तीन टप्प्यांत लागू केला जाईल. तत्काळ, मध्यावधी आणि दीर्घकालीन. एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ नये, यासाठी व्यवस्था केली जाईल. भारताच्या या कारवाईचा परिणाम लवकरच पाकिस्तानवर दिसून येईल, असे म्हटले.

सिंधूतून पाणी नाही तर रक्त वाहणार – बिलावल भुट्टो

सिंधू पाणी करार थांबविण्यात आल्यानंतर पाकिस्तानील (Pakistan) राजकीय नेते बिलावल भुट्टो (Bilawal Bhutto) यांनी भारताला धमकी दिली आहे. ते म्हणाले की, “सिंधू नदीत एकतर पाणी वाहील नाही तर रक्त वाहील. सिंधू खोरे आमचे आहे आणि आमचेच राहील”, असे भुट्टो म्हणाले होते.

 

Pahalgam Terror Attack : पाकला एक थेंबही पाणी देणार नाही – केंद्रीय जलसंपदामंत्री सी.आर.पाटील

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने (India) पाकिस्तानसोबत (Pakistan) असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला आहे. या करारासंदर्भात शुक्रवारी (दि.२५) गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या निवासस्थानी पाण्याचे व्यवस्थापन आणि वापराबाबत बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्रमंत्री, जलशक्तीमंत्री आणि तिन्ही मंत्रालयांचे सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत्त पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय जलसंपदामंत्री सी. आर. पाटील (Union Water Resources Minister C R Patil)  म्हणाले की, सिंधू पाणी कराराबाबत (Indus Water Treaty) घेतलेल्या निर्णयाचे पालन केले जाईल. हा निर्णय तीन टप्प्यांत लागू केला जाईल. तत्काळ, मध्यावधी आणि दीर्घकालीन. एक थेंबही पाणी पाकिस्तानात जाऊ नये, यासाठी व्यवस्था केली जाईल. भारताच्या या कारवाईचा (Action) परिणाम लवकरच पाकिस्तानवर दिसून येईल.

भारतातून पाकिस्तानला जाणारे पाणी थांबवल्यानंतर धरणांची (Dam) क्षमता वाढवली जाईल. धरणांची क्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून जास्त पाणी साठवता येईल. यासाठी धरणांमधील गाळ काढला जाईल. धरणांचे फ्लशिंगदेखील केले जाईल. हा करार जागतिक बँकेने केला होता, त्यामुळे त्यांनाही भारत सरकारच्या या निर्णयाची माहिती दिली जाईल.

पाकिस्तान्यांना शोधा – शहा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि त्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्याचे निर्देश दिले. ही यादी लवकरात लवकर केंद्राला पाठवावी, जेणेकरून त्यांचे व्हिसा तत्काळ रद्द करता येतील आणि त्यांना भारताबाहेर पाठवला येईल, असेही त्यांनी म्हटले आहे. पहलगामा दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना टीआरएफचा हात असल्याचे समोर आल्यानंतर याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलयाला सुरुवात केली आहे.

त्यानुसार गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांची यादी तयार करून ती केंद्र सरकारला (Central Government) पाठवण्यास सांगितले आहे. सरकारने आधीच जाहीर केले आहे की, पाकिस्तानी नागरिकांचे सर्व व्हिसा २७ एप्रिल २०२५ पासून रद्द केले जातील, तर वैद्यकीय व्हिसा २९ एप्रिल २०२५ पर्यंत वैध राहतील. याशिवाय भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तानातून परतण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अमित शहांनी सर्व मुख्यमंत्र्यांना या कामाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आणि आपापल्या राज्यांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

Nashik News : मनपा सेवक, एजंटाच्या घरावर ईडीचे छापे; बनावट जन्मदाखल्याप्रकरणी कारवाई

0

मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon

बांगलादेशी-रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदात्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात (Case) आज ईडीच्या (ED) पथकाने शहरात महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागात कार्यरत व सध्या तुरुंगात असलेल्या दोघा कर्मचाऱ्यांसह एका एजंटाच्या घरावर छापे (Raid) टाकत सखोल चौकशी केली सुमारे चार ते पाच तास घरांच्या झाडाझडतीसह चौकशी केली गेली. या कारवाईत एका घरात जन्म दाखले मिळून आल्याने पथकाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करत ते जप्त केले या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरात मनपा व तहसील कार्यालयातून बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोरांना बनावट कागदपत्रांच्या (Fake Document) आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप करीत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली होती या प्रकरणाची गंभीर दखल घेत शासनातर्फे विशेष तपास पथकाची नियुक्ती देखील करण्यात आली आहे तर छावणी पोलीस ठाण्यात यासंदर्भात १५ पेक्षा अधिक गुन्हे दाखल करण्यात येऊन वकील, मनपा कर्मचारी एजंटासह अनेकांना अटक करण्यात आली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

बनावट जन्म दाखला प्रकरणी काल इडीच्या पथकांनी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेत (NMC) जन्ममृत्यू विभागातील कर्मचारी व सध्या नाशिक रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शेख अब्दुल तथ्याब शेख रज्जाक याच्या रोनकाबाद गल्ली नंबर ७ मध्ये असलेल्या घरावर सशत्र पोलीस बंदोबस्तात छापा टाकत घराची झाडाझडती घेतली तब्बल चार ते पाच तास सुरू असलेल्या या चौकशी मोहिमेत ईडी अधिकाऱ्यांना घरात जन्म दाखले मिळून आल्याने ते पंचनामा करीत जाम करण्यात आले. दुपारी चार वाजेनंतर ईडीचे पथक या घरातून बाहेर पडले या कारवाई संदर्भात माहिती देण्यास पथकातील अधिका-यांनी पत्रकारांना नकार दिला.

दरम्यान, ईडी पथकाने महानगरपालिकेत जन्म मृत्यू विभागातील कार्यरत कर्मचारी व सध्या गुन्ह्यात तुरुंगात (Jail) असलेल्या गजाला परवीन तिच्या घरावर देखील छापा मारून घराची झाडाझडती घेतली तसेच एजंट मोहम्मद अमीन याच्या दरेगाव शिवारातील अहमद रजा इदगा लगत असलेल्या घरावर इडीपथकाने छापा टाकून घराची झाडाझडती घेतली या कारवाईत पथकाच्या हाती काय लागले याची माहिती मिळू शकली नाही.

अपयश लपविण्यासाठी छापेमारी आसिफ शेख

बनावट जन्म दाखले घेऊन शहरात बांगलादेशी व रोहिंग्या घुसखोर वास्तव्य करीत असल्याचा आरोप भाजप नेत्यातर्फे केला गेला, बनावट जन्म दाखल्या प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये तीन महिने उलटले तरी पोलीस व तपास यंत्रणेस शहरात एकही बांगलादेशी घूसखोर सापडलेला नाही तपासाचे अपयश लपवण्यासाठीच ईडी पथकातर्फे आज शहरात छापेमारी करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकारांशी बोलताना केला. रौनकाबाद भागात मनपा कर्मचारी शेख अब्दुल तवाब यांच्या घरावर इडी पथकाने छापा मारल्याची माहिती मिळतात माजी आमदार आसिफ शेख यांनी घटनास्थळी भेट देत छापा टाकण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची चर्चा केली जन्ममृत्यू दाखल्या संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी ही तपासणी केली जात असल्याचे पथकातर्फे सांगण्यात आल्यावर आसिफ शेख यांनी अब्दुल तवाब याच्या कुटुंबीयांना पथकाच्या अधिकायांना चौकशीसाठी सहकार्य करण्याची सूचना केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार असिफ शेख यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे मालेगाव शहराला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे शरद बांगलादेशी रोहिंग्या घसूखोर वास्तव्य करीत असल्याचा आरोप केल्या जात आहे मात्र पोलीस व विशेष तपास पथकास अद्याप पर्यंत एकही बांगलादेशी शहरात मिळून आलेला नाही असे असले तरी निरपराध नागरिकांना त्रास दिला जात आहे या संदर्भात कायदेशीर लढा अल्पसंख्याक सुरक्षा समिती देत राहणार असल्याचे आसिफ शेख यांनी सांगितले.

Maharashtra Politics : “वेळ आलीयं, एकत्र येण्याची”; Shivsena UBT पक्षाची सूचक पोस्ट

0

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात (State Politics) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, हे दोन्हीही नेते परदेश दौऱ्यावर गेल्याची माहिती असून, ते मुंबईमध्ये परतल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवर एक सूचक पोस्ट केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाने केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी (Maharashtra) शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी!”, अशा आशयाचा मजकूर त्यामध्ये आहे. अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘वास्तव में Truth’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत त्यांना “समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून या पोस्टच्या संदर्भात खुलासा करण्यात आल्याचे पुढे आले आहे. अशा प्रकारच्या पोस्ट दररोज सकाळी केल्या जातात आणि त्यातून कार्यकर्त्यांचा (Worker) उत्साह वाढावा, हा हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. तर अनेकांनी या पोस्टचा संदर्भ मनसे आणि शिवसेना यांच्या मनोमिलनाशी जोडल्याचे दिसून येत आहे. या पोस्टची (Post) सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

उद्धव आणि राज ठाकरे दोघेही परदेश दौऱ्यावर

उध्दव ठाकरे आणि कुटुंबीय युरोप दौऱ्यावरती (Tour) आहेत. ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये परतणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील परदेश दौऱ्यावर असून ते २९ एप्रिलला मुंबईत परतणार आहेत. युतीच्या चर्चेदरम्यान ठाकरे बंधुंचा हा परदेश दौरा सुरू असून, हे दोन्ही नेते मुंबईत (Mumbai) परतल्यावर कोणता निर्णय घेतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

 

 

 

 

India vs Pakistan: “एकतर सिंधुचे पाणी वाहत राहील, नाहीतर भारताचे रक्त…”; सिंधु करार स्थगित करताच बिलावल भुत्तोंचा भारताला इशारा

0
बिलावल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. पाकिस्तानसाठी महत्त्वाचा असलेला सिंधू जल करार भारत सरकारने स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानची आदळआपट सुरू झाली आहे. पाकिस्तानातील मंत्री आणि नेते भारताला धडा शिकवण्याची भाषा करत आहे. त्यात आता माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी सिंधू नदीतून पाणी वाहिले नाही, तर भारताचे रक्त वाहणार, अशी धमकी दिली आहे.

एका रॅलीत पाकिस्तानी जनतेला संबोधित करताना माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो झरदारी यांनी हा इशारा दिला. सिंधू नदीजवळ उभे राहून भारताला स्पष्ट शब्दांत सांगतो… सिंधू नदी आमची होती, आमची आहे आणि आमचीच राहील… एकतर या नदीचे पाणी वाहत राहील किंवा आमची नदी आमच्याकडून हिसकावून घेऊ पाहणाऱ्यांचे रक्त वाहील, असा इशारा त्यांनी दिला.

सखरमध्ये झालेल्या सभेत बिलावल भुत्तोंनी भारताविरोधात थयथयाट केला. ते म्हणाले, “जी घटना काश्मीरमध्ये झाली आणि भारताने पाकिस्तानवर आरोप केले आहेत. भारताने आपल्या उणीवा लपवण्यासाठी, त्यांच्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी मोदींनी पाकिस्तानवर खोटे आरोप केले आहेत.”

“या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे, असे सांगितले. त्यामुळे त्यांनी घोषणा केली आहे. हा त्यांचा एकांगी निर्णय आहे की, जो सिंधू जल करार आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेला; ज्या माध्यमातून भारताने हे मान्य केलेले आहे की, सिंधू पाकिस्तानची आहे”, असे भुत्तो म्हणाले.

सिंधू नदी पाकिस्तानची आहे, असे या करारात भारताने म्हटले आहे. पण आज, आम्हाला हा करार मान्य नाही, असे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. हे असे होणार नाही. हे गोष्ट कोणीही स्वीकारणार नाही. पाकिस्तानची जनता तर हे मान्य करणार नाहीच, पण लोक सहमत होणार नाहीत आणि भारतातील लोकही आपल्यावरील हा अत्याचार सहन करणार नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

“मोदींनी आणि त्यांच्या सरकारने घोषणा केली की, आता कोणताही करार मानणार नाही. आणि मी सखरमध्ये, याच सिंधू नदीच्या काठावरून भारताला सांगू इच्छितो की, सिंधू आमची आहे आणि आमचीच राहणार. एकतर या नदीतून आमचे पाणी वाहणार, नाही तर त्यांचे रक्त वाहणार”, अशी गरळ बिलावल भुत्तोंनी ओकली आहे.

काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आपण सर्वांनीच निषेध केला आहे. पाकिस्तान स्वतः दहशतवादाने ग्रस्त आहे, असे आम्ही सांगितलेही, पण तरीही भारताने या हल्ल्यासाठी आम्हालाच जबाबदार धरले. जर तुमची लोकसंख्या मोठी असेल आणि तुम्ही एक मोठा देश असाल तर, याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणताही निर्णय घ्याल! पाकिस्तानचे लोक अभिमानी आणि धाडसी आहेत…त्यांना आपल्या हक्कांचे रक्षण कसे करायचे हे माहीत आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी जिथे जातात तिथे ते स्वतःला हजारो वर्षे जुन्या संस्कृतीशी संबंधित असल्याचे सांगतात. पण मी हे तुम्हाला सांगतो की, आज आपण जिथे उभे आहोत तिथे सिंधू संस्कृतीचा जन्म झाला. आपण या संस्कृतीचे खरे वारस आहोत. आपण या नदीचे खरे वारस आहोत, असे त्यांनी सांगितले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

लष्कराची मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली

0

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगामजवळ असलेल्या बैसरन खोऱ्यात दहशतावाद्यांनी पर्यटकांच्या हत्या केली. या भ्याड हल्ल्यानंतर (Attack) भारतीय लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम हाती घेतली असून, भारत सरकारने जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. काल तीन दहशतवाद्यांचे घर जमीनदोस्त केल्यानंतर आता आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत.

एकूण पाच दहशतावाद्यांची घरे (House) पाडून लष्कराने अतिरेक्यांचे कंबरडे मोडले आहे. हे दहशतवादी २०२३ पासून लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले आहेत. लष्कराने जून २०२३ पासून लश्कर ए तोयबाचा दहशतवादी असलेल्या एहसान अहमद शेख याचे दोन मजली घर आयईडी स्फोटके लावून पाडले. तो पुलवामातील मुर्रान येथील रहिवासी आहे. अशीच कारवाई सुरक्षा दलाने २ वर्षांपूर्वी लश्कर ए तोयबामध्ये दाखल झालेल्या आणखी एका दहशतवाद्याविरोधात केली.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील (Kulgam) झाकीर अहमद गनी आणि शोपियाँ जिल्ह्यातील छोटीपोरा येथील लष्कर-ए-तैयबाचा कमांडर शाहिद अहमद कुट्टय यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत. याआधी लष्कराने अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील आदिल हुसैन ठोकेर (उर्फ आदिल गुरी), अवंतीपुरा येथील आसिफ शेख आणि पुलवामामधील एहसान शेख यांच्या घराचे पाडकाम केले होते. ठोकेरने २०१८ साली अटारी-वाघा सीमेतून पाकिस्तानमध्ये कायदेशीर प्रवेश मिळविला होता. मागच्या वर्षी तो लपून-छपून जम्मू-काश्मीरमध्ये परतला. पाकिस्तानमध्ये त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे.

आदिल थोकरने रचला होता बैसरनमधील हल्ल्याचा कट?

आदिल थोकर ऊर्फ आदिल गुरी असे नाव असलेल्या दहशतवाद्यानेच बैसरनमध्ये पर्यटकांची हत्या करण्याचा कट रचला आणि तो हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे.

घरे पाडण्यात आलेले पाच दहशतवादी 

आदिल थोकर (बिजबेहरा)
आसिफ शेख (ट्राल)
अहसान शेख (पुलवामा)
शाहीद अहमद (शोपिया)
जाकीर गनी (कुलगाम)

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग दुसऱ्या दिवशी LoC वर मध्यरात्री गोळीबार

0

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने उचललेल्‍या कडक पावलामुळे पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. पाकिस्‍तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले आहे. काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) पाकिस्तानी सैन्यांकडून मध्यरात्री विनाकारण गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिलेय.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरवारी आणि शुक्रवारी रात्री, काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तान लष्कराकडून भारताच्या विविध चौक्यांवर विनाकारण गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनीही याला जशास तसे प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्‍तानला ही भीती सतावत आहे की, भारतीय सेना सीमारेषा पार करून पाकिस्‍तानात घुसू नये. सीमेपलीकडील पाकिस्‍तानी चौक्‍यांकडून २५ आणि २६ च्या रात्री मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आल्‍याचे भारतीय सैन्याने सांगितले.

याआधी पाकिस्‍तानी सैन्याने गुरूवार-शुक्रवार रात्री नियंत्रण रेषा (एलओसी) वर अनेक चौक्‍यांवरून मोठ्या प्रमाणात गोळीबार करून युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्यानेही प्रत्‍युत्तरादाखल गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोट्या शस्‍त्रांच्या साहाय्याने काही ठिकाणांवरून पाकिस्‍तानी सैन्याकडून गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने याला प्रभावीपणे उत्तर दिले.

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावादरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी वरिष्ठ लष्करी कमांडर्ससोबत श्रीनगरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Nashik News : मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

0

नाशिक | Nashik

नाशिकचा संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले मधुकर झेंडे (Madhukar Zende) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन (Passed Away) झाले. मृत्यसमयी ते ८८ वर्षांचे होते. नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी या नात्याने ते २८ वर्षांपूर्वी महापालिकेतून (NMC) सेवानिवृत्त झाले. परंतु त्यानंतरही सुमारे १० वर्षे ते मानद अधिकारी म्हणून कार्यरत होते.

भूतपूर्व नगरपालिका तसेच १९८२ पासून स्थापित झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या अनेक स्थित्यंतरांचे मधुकर झेंडे साक्षीदार होते. १८५ वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (Nashik) या संस्थेच्या प्रगतीमध्ये मधुकर झेंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. सामान्य कार्यकर्ता ते सावानाचे अध्यक्ष अशी ४० वर्षांची प्रदीर्घ कामगिरी झेंडे यांनी केली. सन २००८ ते २०१२ या कार्यकाळात त्यांनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषविले.

नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधुकर झेंडे यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. १०१ वर्षांची अभिमानास्पद वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष पद देखील झेंडे यांनी भूषविले होते. भद्रकाली मार्केट परिसरात अत्यंत गरीब परिस्थितीत वाटचाल करणाऱ्या मधुकर झेंडे यांनी लहानपणी मोहन मास्तर तालीम येथे व्यायाम करून शरीर कमावले आणि अनेक कुस्त्यांचे फडदेखील गाजविले.

लोकरंजन कलाकेंद्राची स्थापना करून अनेक नाट्य कलावंतांना घडविण्याचे काम केले. लहानपणी विविध मेळयांमध्ये सहभागी होऊन झेंडे यांनी रंगमंच देखील गाजविला. लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड यासारख्या असंख्य सामाजिक संस्थांशी झेंडे यांचा निकटचा संबंध होता. आण्णा अशी ओळख असलेल्या मधुकर झेंडे यांनी नाशिकच्या चौकांचा इतिहास (History) हे संदर्भ कोष ठरलेले पुस्तक देखील लिहिले.

नाशिकच्या सुमारे ७० वर्षांची वाटचाल मुखोद्गत असलेले मधुकर झेंडे हे नाशिकचा संदर्भकोष म्हणून देखील ओळखले जायचे. लोकशाहीर गजाभाऊ बेणी आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने मधुकर झेंडे यांनी १९९१ साली नाशिकच्या शिवाजी उद्यानामध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा अर्धपुतळा उभारला होता. तेव्हापासून त्यांचे लता मंगेशकर आणि कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी, बिनाका गीतमालाचे प्रसिद्ध निवेदक अमीन सायानी यांसह अनेक दिग्गजांशी झेंडे यांचे घरोब्याचे संबंध होते. नाशिकच्या सहा कुंभमेळ्यांचे ते साक्षीदार होते.

दरम्यान, झेंडे यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र, मुलगी रेखा व रत्ना, जावई प्रकाश पाटील व आल्हाद वाघ, सून, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. मधुकर झेंडे यांच्या निधनामुळे समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी (Citizen) शोक व्यक्त केला आहे.

संपादकीय : २६ एप्रिल २०२५ – मैत्रीतील मंदी परवडणारी नाही

0

मैत्रीचे नाते सर्वांना कायमच भुरळ घालते. तिचे वर्णन करताना साहित्यिकांच्या शब्दांना धुमारे फुटतात. कवींना कविता स्फुरतात. जिवलग मित्रांच्या भेटीच्या अनेक कथा, गोष्टी आणि कविता घराघरांतील मुलांना नेहमीच ऐकवल्या जातात. ‘देव माझा सांगून गेला पोटापुरतं कमव पण जिवाभावाचे मित्र जमव’ असे कवी अनंत राऊत म्हणतात. ‘मैत्रीला कुठल्याही तराजूत तोलता येत नाही. जीवाला जीव देणारी ही मैत्री कायमस्वरुपी आपल्या सोबत असते’ असे पु. ल. देशपांडे म्हणतात. अशी मैत्री अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या सर्वेक्षणाचा विषय बनली. त्या सर्वेक्षणाचा माध्यमात आलेला प्रमुख निष्कर्ष मात्र काहीसा अस्वस्थ करणारा आहे.

जागतिक स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रात मंदी येते. जिवाभावाच्या मैत्रीतही मंदीने शिरकाव केल्याचे आणि एकही जवळचा मित्र नाही असे सांगणार्‍या व्यक्तींची संख्या वाढत असल्याचे त्यात म्हटले आहे. या मंदीचे मानसिक आणि शारीरिक परिणामही त्यात नमूद असल्याचे वृत्तात म्हटले आहे. सर्वेक्षण अमेरिकेतील असले तरी आपल्याकडेही माणसे एकटी होत चालल्याचे आढळायला लागले आहे. हातात मोबाईल असेल तर माणसांना इतर कोणीही नको असते. म्हणूनच समाज माध्यमांवर ढीगभर मित्र असणार्‍यांच्या आयुष्यात मित्रांचा दुष्काळ असतो, ही भावना सध्या प्रचलित आहे.

माणसे स्वतःत अधिकाधिक गुंतत चालली आहेत. मैत्रीत मंदी होण्याची काही ढोबळ कारणे शोधली जाऊ शकतील का? जसे की, अति अपेक्षा, भावनांची खिल्ली उडवणे, त्या समजून न घेणे, गृहीत धरून बोलणे, मित्राच्या वैयक्तिक गोष्टी इतरांना सांगणे म्हणजेच त्याचा विश्वासघात करणे इत्यादी. तथापि आयुष्यात मित्र नसण्याचे तोटे यापेक्षा जास्त सांगितले जाऊ शकतील. सामाजिक एकटेपणा हृदयरोग, डिमेन्शिया आणि मृत्यूचा धोका वाढवतो. इतरही छोटे-मोठे परिणाम होतात. हे परिणाम गंभीर आणि आयुष्य पणाला लावणारे आहेत.

एकटेपणाच्या नादात ते पत्करण्यापेक्षा मैत्री जपणे आणि जोपासणेच माणसाच्या हिताचे आहे. कारण माणूस समाजशील प्राणी आहे. विविध सणांच्या आणि उत्सवांच्या माध्यमातून त्याला खतपाणी घातले गेले आहे. कारण व्यावहारिक भाषेत मैत्रीचे अनेक फायदे सांगितले जाऊ शकतील. पण खरी मैत्री या सर्वांच्या परे असते. अनेक जण ती जोपासताना आढळतात. वर उल्लेखिलेली कारणे सहज टाळली जाऊ शकतील. माफ करा.. माफी मागा आणि मैत्रीच्या सुंदर स्मृती निर्माण करा. ते सर्वांच्याच हातात आहे.

अर्थात ते घडवून आणण्यासाठी अहंकाराचा आणि अपेक्षांचा त्याग मात्र करावा लागतो. स्वतःला कायम तपासत राहावे लागते. पण एकदा का ही जादूची किल्ली माणसाला गवसली की पु. ल. देशपांडे वर्णन करतात तशी मैत्री फुलते. रोज आठवण यावी असे काही नाही, रोज भेट व्हावी असे काही नाही, एवढेच कशाला रोज बोलणे व्हावे असेही काहीच नाही; पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणे ही झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झाल्या तरी गाठी बसणे महत्त्वाचे. ज्यांनी हे जाणले त्यांनी माणसातले माणूसपण जाणले. तेव्हा मैत्री फुलवणेच हिताचे आहे.