नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दि.२२ एप्रिल रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून, दहशतवाद्यांना धडा शिकविण्याची मागणी केली जात आहे. तसेच जगभरातून देखील भारताला पाठिंबा मिळत आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्यांवर निशाणा साधत पुन्हा एकदा इशारा दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (शनिवारी) हैदराबाद हाऊस येथे अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मॅन्युएल गोन्साल्विस लॉरेन्को (Joao Manuel Goncalves Lourenco) यांची भेट (Meet) घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय बैठक घेत दहशतवादाच्या मुद्द्यावरुन चर्चा केली. यावेळी मोदी म्हणाले की, मी राष्ट्रपती लोरेन्सू आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात मनापासून स्वागत करतो. हा एक ऐतिहासिक क्षण आहे, असे म्हटले.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,”दहशतवाद्यांना (Terrorists) पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. सीमापार दहशतवादाविरुद्धच्या आमच्या लढाईत अंगोलाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. दहशतवाद हा मानवतेसाठी सर्वात मोठा धोका आहे, यावर आमचे एकमत आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल राष्ट्रपती लॉरेन्को आणि अंगोला यांनी व्यक्त केलेल्या शोकसंवेदनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, अंगोला (Angola) या देशाला भारत सैन्य प्रशिक्षण आणि आधुनिकीकरणासाठी मदत करत आहे. तसेच अंगोला लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी भारत २०० लक्ष डॉलरची मदत करणार आहे. अंगोलाच्या सशस्त्र दलाला प्रशिक्षण देण्यात भारताला मदत करण्यात आनंद होईल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. तर दोन्ही देशांच्या संबंधाला आता ४० वर्षे पूर्ण झाली असून, अंगोलाच्या स्वातंत्र्य संग्रामात भारताने (India) मदत केली आहे.