Sunday, June 21, 2026
Home Blog Page 5

‘बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड कधीच करणार नाही’ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0

मुंबई :

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित भव्य मेळाव्यात उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक राहण्याचा पुनरुच्चार करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणात शिंदे म्हणाले की, शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नसून मराठी माणसाच्या स्वाभिमानाची, हिंदुत्वाची आणि जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणारी चळवळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या विचारांशी तडजोड करणे शक्य नसल्यानेच २०२२ मध्ये आम्ही भूमिका घेतली आणि त्याच विचारांच्या आधारे आजही पक्ष पुढे जात आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पक्षाच्या वाढत्या ताकदीकडे लक्ष वेधले. अनेक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते शिवसेनेकडे आकर्षित होत असल्याचा दावा करत त्यांनी पक्षाचा जनाधार वाढत असल्याचे सांगितले. शिवसेनेची विचारधारा आणि काम करण्याची पद्धत जनतेपर्यंत पोहोचत असल्याने विरोधक अस्वस्थ झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अप्रत्यक्ष टीका करताना शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांनी ज्या तत्त्वांसाठी आयुष्यभर संघर्ष केला, त्या तत्त्वांपासून दूर जाण्याचा आम्ही कधीच विचार करू शकत नाही. शिवसेनेचा खरा वारसा म्हणजे राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हक्कासाठीचा संघर्ष असून, त्याच मार्गावर आम्ही पुढे जात आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी आगामी मुंबई महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा उल्लेख करत प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने जनतेमध्ये जाऊन विकासकामांचा प्रचार करावा, संघटन अधिक मजबूत करावे आणि बूथस्तरावर पक्षाची ताकद वाढवावी, असे निर्देश दिले. सरकारने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास वाढल्याचा दावाही त्यांनी केला.

भाषणाच्या शेवटी शिंदे यांनी शिवसैनिकांना एकजूट, शिस्त आणि समर्पणाचा संदेश देत, बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेनेचा भगवा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कायम फडकत राहील आणि आगामी राजकीय लढायांमध्ये पक्ष अधिक ताकदीने उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

‘शिवसेना संघर्षातून उभी राहिली, पुन्हा उभी राहील’ – उद्धव ठाकरे

0

मुंबई :

शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित भव्य मेळाव्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर जोरदार टीका केली. सध्या पक्षातील काही खासदारांच्या फुटीच्या चर्चांमुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एकजूट राखण्याचे आणि आगामी राजकीय लढायांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा इतिहास हा केवळ राजकीय पक्षाचा इतिहास नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा, मराठी अस्मितेचा आणि अन्यायाविरुद्धच्या संघर्षाचा इतिहास आहे. गेल्या काही वर्षांत पक्षाला अनेक धक्के बसले, नेत्यांनी साथ सोडली, पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, परंतु शिवसेनेची विचारधारा आणि शिवसैनिकांची निष्ठा कोणालाही संपवता आलेली नाही आणि पुढेही ते शक्य होणार नाही.

पक्षातील काही खासदारांच्या बंडाच्या चर्चेकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, पदे, सत्ता आणि स्वार्थासाठी येणारे-जाणारे अनेक असतात; मात्र संकटाच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणारे कार्यकर्तेच शिवसेनेची खरी ताकद आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांमुळे खचून न जाता प्रत्येक शिवसैनिकाने जनतेमध्ये जाऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक, ही शिवसैनिकांसाठी प्रतिष्ठेची लढाई असल्याचे सांगितले. प्रत्येक शाखाप्रमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने तळागाळात संघटनबांधणी मजबूत करावी, लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरावे आणि महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

भाजपवर टीका करताना ठाकरे म्हणाले की, विरोधकांनी शिवसेनेला संपवण्याचा, तिची ओळख पुसून टाकण्याचा आणि मराठी माणसाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना ही एखादी इमारत किंवा कार्यालय नसून लाखो शिवसैनिकांच्या मनात जिवंत असलेली विचारधारा आहे. शिवसेना संघर्षातून उभी राहिली आहे आणि संकटांवर मात करत पुन्हा अधिक ताकदीने उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी शिवसैनिकांना एकजुटीचा संदेश देत, महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी अस्मिता आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले. “संकटे येतील, आव्हाने येतील; पण शिवसेनेचा भगवा झेंडा कधीही झुकणार नाही,” असा निर्धार व्यक्त करत त्यांनी आगामी राजकीय लढायांसाठी कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव

0

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

शुक्रवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 2600 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 10344 गोण्यांची आवक झाली. कांदा (Onion) नंबर एकला 2000 ते 2600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा नंबर दोनला 1300 ते 1950 रूपये भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर 3 ला 600 ते 1250 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 500 ते 1300 रुपये. जोड कांदा 400 ते 700 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

कांद्याच्या (Onion) 8 गोण्यांना 2501 ते 2600 रुपये . 101 गोण्यांना 2401 ते 2500 रुपये. 72 गोण्यांना 2301 ते 2400 रुपये. 149 गोण्यांना 2201 ते 2300 रुपये भाव मिळाला. 279 गोण्यांना 2101 ते 2200 रुपये. 206 गोण्यांना 2001 ते 2100 रुपये. 342 गोण्यांना 1901 ते 2000 रुपये. 502 गोण्यांना 1801 ते 1900 रुपये. 671 गोण्यांना 1701 ते 1800 रुपये. 556 गोण्यांना 1601 ते 1700 रुपये भाव मिळाला. 764 गोण्यांना 1501 ते 1600 रुपये भाव मिळाला. 3163 गोण्यांना 1001 ते 1500 रुपये भाव मिळाला. 3531 गोण्यांना 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 1370 कॅरेटची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 191 रुपये ते 300 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 190 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 61 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 4 ला 10 ते 60 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. गव्हाची 4 क्विंटलची आवक झाली. गव्हाला किमान 2200 रुपये, जास्तीत जास्त 2300 रुपये तर सरासरी 2250 रुपये भाव प्रतिक्विंटलला मिळाला. बाजरीला सरासरी 1900 रूपये भाव मिळाला, अशी माहिती सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

नाशिकमध्ये उद्यापासून होणार पाणी कपातीची अंमलबजावणी

0

नाशिक | प्रतिनिधी Nashik

अल-निनोमुळे राज्यात पावसाला झालेला उशीर आणि धरणांमधील पाणीसाठा यांचा विचार करता नाशिक महापालिकेने पाणीकपातीचा मोठा निर्णय १७ जुलै रोजी घेतला असून त्याची अंमलबजावणी उद्या पासून म्हणजेच २० जून पासून होणार आहे. नाशिकमध्ये जून आणि जुलै महिन्यात दर शनिवारी पाणीकपात केली जाणार आहे.

अल-निनोचा प्रभाव कायम राहिल्यास ऑगस्टमध्ये दोन दिवसाआड पाणी पुरवठा न करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेनुसार उपलब्ध पाणीसाठा केवळ ६० दिवस पुरेल इतकाच शिल्लक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या पाणी कपातीमुळे अनेक भागांतील नागरिकांनी आजच पाणीसाठा करून ठेवला होता. आगामी काही आठवड्यांत पावसाची स्थिती समाधानकारक न राहिल्यास पाणी व्यवस्थापनाचे आव्हान आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सध्याचा शिल्लक पाणीसाठा केवळ ६० दिवस पुरेल इतकाच आहे. भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
— रविंद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा

Sangamner : सरळ रेल्वेमार्गासाठी राजकारण विरहित आग्रह धरावा लागणार

0

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मुंबई-नाशिक-पुणे हा गोल्डन ट्रँगल असून नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्गाकरीता (Nashik-Pune Railway Line) आपण सातत्याने पाठपुरावा केला. यासाठी सर्व काम पूर्ण होऊन भूसंपादनाची (Land Acquisition) सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही शेतकर्‍यांना देण्यात आली. आता मात्र वेगळी कारणे सांगितली जात आहेत. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाबाबत केलेले विधान हे अत्यंत दुर्दैवी असून या विभागाच्या विकासाकरीता हा सरळ मार्ग होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केले असून भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी राजकारण विरहित आपल्या सर्वांना सरळ रेल्वेमार्गासाठीच आग्रह धरावा लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Union Railway Minister Ashwini Vaishnaw) यांनी नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्याचे विधान नुकतेच केले आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील उत्तर भागांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री थोरात म्हणाले, नाशिक-पुणे रेल्वेबाबत (Nashik-Pune Railway) केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी केलेले वक्तव्य या विभागासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. मुंबई-नाशिक-पुणे हा गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जातो. विकासाच्या दृष्टीने हा ट्रँगल देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरीता नाशिक-पुणे रेल्वे होणे अत्यंत गरजेचे आहे.

याकरीता आपण सातत्याने पाठपुरावा केला. त्यादृष्टीने कामही झाले. रेल्वेसाठी जमिनी भूसंपादित करून सुमारे 500 कोटींपेक्षा जास्त रक्कमही देण्यात आली. असे सगळे झाले असताना आता मात्र जीएमआरटी आणि अन्य गोष्टी सांगितल्या जात आहेत. यावरून हा रेल्वे मार्ग रद्द केल्याचे सांगितले जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. नवीन मार्गदर्शक सूचवला आहे त्या मार्गातून उपलब्धी काय किंवा त्याचा फायदा काय असे विचारले असता तर काहीही दाखवता येणार नाही. म्हणून नाशिक-पुणे रेल्वे ही सरळ मार्गे झाली पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे.

हा विषय निवड आजच्या राजकारणाचा नाही किंवा कोणत्याही राजकारणी व्यक्तीचा नाही. राजकारणापलीकडे जाऊन विकासाच्या वाटचालीसाठी सरळ रेल्वे अत्यंत महत्त्वाची आहे. पिढ्यानपिढ्यांच्या भविष्यासाठी आणि या विभागाच्या समृद्धीसाठी गोल्डन ट्रँगल जोडणारा हा सरळ रेल्वेमार्ग झाला पाहिजे. यासाठी आपल्या सगळ्यांना आग्रह धरावा लागणार आहे आणि याकरीता सातत्य ठेवून ते मंजूर करून घ्यावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

नाशिक-पुणे या मेट्रो शहरांना जोडण्यासाठी सरळ रेल्वे मार्ग व्हावा याकरीता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पाठपुरावा करून हा रेल्वे मार्ग मंजूर करण्यात आला. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांना पैसे दिले गेले. मात्र नवीन सरकार आले आणि मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. याबाबत या मार्गावरील सर्व लोकप्रतिनिधी आणि जनतेला घेऊन आपण संघर्ष समिती तयार केली. माजी मंत्री थोरात यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची भेट घेतली तर आपण मुख्यमंत्री व विविध अधिकार्‍यांची सरळ मार्गासाठी भेट घेतली. रेल्वेमार्ग सरळ झाला पाहिजे ही आमची मागणी आहे. मात्र केंद्रीय मंत्र्यांनी केलेले विधान अत्यंत दुर्दैवी असून उत्तर महाराष्ट्राच्या विकासात खो घालण्याचे पाप केले आहे. त्यांचा हा निर्णय अत्यंत असंवेदनशील असून आपण या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहे.
सत्यजीत तांबे (आमदार)

मंत्री नरहरी झिरवाळ यांची दूध बाजार परिसरात अचानक भेट; दुग्धजन्य पदार्थांची केली तपासणी

0

ओझे l वार्ताहर Oze

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी सकाळी जुन्या नाशिकमधील प्रसिद्ध दूध बाजार परिसराला अचानक भेट देत दूध, खवा तसेच विविध दुग्धजन्य पदार्थांची तपासणी केली. ग्राहकांना शुद्ध व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत आणि भेसळखोरांवर प्रभावी आळा बसावा, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली.

यावेळी दूध विक्रेते व व्यापाऱ्यांकडील विविध पदार्थांचे नमुने घेऊन त्यांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तसेच अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. प्राथमिक तपासणीत दूध, खवा आणि अन्य दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नसल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

दुधातील भेसळ आणि निकृष्ट दर्जाच्या पदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाने अचानक तपासण्यांची मोहीम अधिक तीव्र केली आहे. मंत्री झिरवाळ स्वतः मैदानात उतरल्याने दूध बाजार परिसरात व्यापारी तसेच संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

अन्न सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसून, भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट संदेश या अचानक पाहणीमधून देण्यात आला आहे.

Aaditya Thackeray: एहसान फरामोश, विकाऊ, सडक्या वृत्तीचे…; आदित्य ठाकरेंकडून बंडखोर खासदारांचा शेलक्या शब्दात समाचार

0
आदित्य

मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून थेट आणि शेलक्या शब्दांत बंडखोर खासदारांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. तर उद्धव ठाकरे यांना आरोग्याच्या कारणांमुळे सातत्याने फिरणे शक्य नसले तरी आदित्य ठाकरे यांनी अधिक सक्रिय राहायला हवे होते, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन जोरदार पलटवार केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये थेट ओमराजे निंबाळकर यांचे नाव घेतले नसले तरी शिंदे गटात जाण्यासाठी वेगवेगळी कारणे देणाऱ्या खासदारांना त्यांनी लक्ष्य केले आहे.

Telegram: दिल्ली उच्च न्यायालयाचा टेलिग्रामला झटका; २२ जून पर्यंत बंदी कायम

कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले
आज आपला 60 वा वर्धापन दिन! पुन्हा एकदा आपण घाणेरड्या राजकारणाचे विदारक उदाहरण पाहत आहोत. एहसान फरामोश आणि विकाऊ अशा सडक्या वृत्तीचे हे काही ठराविक व्यक्ती 2024 मध्ये ज्यांच्यामुळे जिंकून आले, त्यांनाच दगा देत आहेत! कितीही कारणे द्या… सत्य एकच आहे. तुम्ही स्वतःला निर्लज्जपणे विकले आहे. स्वतःला तर विकलेच, पण त्यासोबत तुमची प्रतिष्ठा, तुमचे नाव आणि तुमच्या कुटुंबाचे नावही पणाला लावले आहे. महाराष्ट्र हे घाणेरडे राजकारण सहन करणार नाही… मुळीच नाही! ह्या काळोखात प्रकाश देणार ती फक्त आणि फक्त आपली मशाल!, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Telegram: दिल्ली उच्च न्यायालयाचा टेलिग्रामला झटका; २२ जून पर्यंत बंदी कायम

0
टेलिग्रामला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नीट परीक्षेपर्यंत बंदी घातलेल्या मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेलिग्रामला दिल्ली उच्च न्यायालयाचा आणखी एक झटका बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी कायम ठेवली आहे. टेलिग्राम विरोधातील याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आणि तो संबंधितांपर्यंत पोहोचवण्यासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला होता. न्यायालयाने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी घालणाऱ्या केंद्र सरकारच्या आदेशाला कायम ठेवले.

वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आणि तो समाजमाध्यमावर व्हायरल करण्यासाठी टेलिग्रामचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे या परीक्षेवरुन देशात बराच गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर या परिक्षेची नवी तारीख जाहीर करतानाच केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी लागू केली होती. या बंदीविरोधात टेलिग्रामने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती जी आज न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आणखी चार दिवस टेलिग्रामवरील बंदी कायम राहणार आहे.

Uddhav Thackeray: “किरणांचा उघडून पिसारा, देवदूत कोणी, काळोखावर…; खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची पिहिली प्रतिक्रिया

२१ जून रोजी होणाऱ्या नीट-यूजी २०२६ च्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्राम ॲपवर बंदी घातली आहे. टेलिग्रामने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. गुरुवारी टेलिग्रामच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने आपला निर्णय कायम ठेवला. सुनावणीदरम्यान, न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी नीट पुनर्परीक्षेपूर्वी टेलिग्रामवर घातलेल्या बंदीसंदर्भात केंद्र सरकारच्या वकिलांना विचारले, “केवळ काही नागरिक परीक्षा देत आहेत म्हणून आम्ही १५ कोटी लोकांच्या अधिकारांवर गदा कशी आणू शकतो? एका परीक्षेसाठी १५ कोटी वापरकर्त्यांचा आवाज दाबला जाऊ शकतो का?

टेलिग्राम आणि केंद्र सरकारकडून आलेला प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायमूर्ती तेजस कारिया यांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69अ अंतर्गत जारी केलेल्या ब्लॉकिंग आदेशाला आव्हान देणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या याचिकेवरील आपला निर्णय कायम ठेवला.

यावर भूमिका व्यक्त करताना, संपूर्ण प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याऐवजी संबंधित माहिती किंवा चॅनेल्स ब्लॉक करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचे टेलिग्रामच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते. तर टेलिग्रामचा वापर केवळ पेपरफुटीसाठीच नव्हे तर दहशतवादी कारवाया, सायबर गुन्हे आणि अमली पदार्थांच्या तस्करीसाठीही होतो, तशी माहिती उपलब्ध असा दावा सरकारकडून करण्यात आला. त्यामुळे सामाजिक हित तसेच राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेतल्यास ही कारवाई आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले.

Uddhav Thackeray: “किरणांचा उघडून पिसारा, देवदूत कोणी, काळोखावर…; खासदार फुटीनंतर उद्धव ठाकरेंची पिहिली प्रतिक्रिया

0
उद्धव

मुंबई | Mumbai
शिवसेनेतील खासदारांच्या फुटीनंतरही उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. थोडक्यात पण प्रभावी शब्दांत त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संदेश दिला. संकटे कितीही आली तरी संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या काव्यपंक्तींच्या माध्यमातून अधोरेखित केले. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी वडील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोसोबत त्यांनी कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या प्रेरणादायी कवितेतील ओळी पोस्ट केल्या.

ही सर्व वजाबाकी होत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र गोळाबेरीज पुन्हा मांडली आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात मराठीतील सुप्रसिद्ध कवी, वि. वा शिरवाडकर यांच्या त्या प्रसिद्ध कवितेच्या सुरुवातीच्या ओळी लिहित त्यांनी मोठा संदेश दिला आहे. कितीही संकटं आली तरी आता थांबायचे नाही. नवीन काही तरी घडवत राहायचं, असा संदेश त्यांनी या ओळीतून दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा तो फोटो आणि त्याखाली कविवर्य कुसुमाग्रजांच्या त्या ओजस्वी ओळीतून त्यांनी परिणामकारक संदेश आज वर्धापन दिनाच्या काही तास अगोदर दिला आहे.

Omraje Nimbalkar: भावनिकदृष्ट्या चुकीचा, तरी…; अखेर ओमराजे निंबाळकरांनी सोडलं मौन, म्हणाले…

काय म्हंटले आहे पोस्ट मध्ये?
“किरणांचा उघडून पिसारा, देवदूत कोणी, काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी…” या काव्यपंक्तींच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी अंधारानंतर प्रकाशाचा मार्ग शोधण्याचा संदेश दिला. राजकीय संकटे आणि अडचणींच्या काळातही हार न मानता नव्या उमेदीने पुढे जाण्याचा त्यांचा निर्धार या पोस्टमधून दिसून आला. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या काही तास आधी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

उद्धव ठाकरेंच्या या पोस्टकडे अनेकजण नव्या सुरुवातीचा संकेत म्हणून पाहत आहेत. संकटांनंतर पुन्हा संघटना उभी करण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न या संदेशातून दिसून येत आहे. कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी शब्दांद्वारे त्यांनी समर्थकांना एकच संदेश दिला आहे की संघर्ष संपलेला नाही, प्रवास अजून बाकी आहे आणि नव्या ताकदीने पुढे जायचे आहे.

Omraje Nimbalkar: भावनिकदृष्ट्या चुकीचा, तरी…; अखेर ओमराजे निंबाळकरांनी सोडलं मौन, म्हणाले…

0
ओमराजे

मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार फुटणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. यानंतर आता त्यांनी एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीमधे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भावनिक दृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या योग्य
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी थेट भाष्य केले आहे. हा राजकीय निर्णय घेताना आपण मोठ्या धर्मसंकटात असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या योग्य आहे, असा दावा त्यांनी केला आहे. राजकीय अस्तित्वाचे संकट, विकासनिधीचा अभाव या सारखी कारणे निंबाळकर यांनी दिली आहेत. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबाबतचा निर्णय २० जून नंतर घेणार असल्याचे निंबाळकर यांनी म्हटलेय.

कोरड्या हाताने किती दिवस फिरणार?
ओमराजे निंबाळकर यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हंटेलय की, “सध्या माझ्या समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे केवळ पक्षाविषयीची निष्ठा आहे. मात्र, पक्षात निष्ठा असूनही जर मला माझ्या मतदारसंघातील लोकांची कामेच करता येत नसतील, तर मी कोणत्या तोंडाने लोकांसमोर जाऊ? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार?” अशा उद्विग्न शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी आपली भावना व्यक्त केली.

Sanjay Raut: फुटीर खासदारांशी मोठी डील? कोणाला मंत्रीपद, तर कोणाला…; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ते पुढे म्हणाले की, खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

निष्ठेच्या जोरावर टिकून राहणे अशक्य
सत्ताधारी महायुतीची ताकद, पैसा आणि कामांचा सपाटा यांसमोर केवळ निष्ठेच्या जोरावर टिकून राहणे अशक्य झाल्याचे सांगत, आता आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे स्पष्ट संकेत ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.

ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके संख्याबळ आणि आमदार असतानाही ते शांत बसलेले नाहीत, याकडे ओमराजेंनी लक्ष वेधले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत, असे निंबाळकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंवर निशाणा
“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सध्या फिरणे शक्य नाही, हे मी समजू शकतो. पण किमान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तरी राज्याचा दौरा करायला हवा होता. त्यांनी फिरून कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही,” असा थेट हल्लाबोल त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला.