Monday, May 5, 2025
Home Blog Page 9

Crime News : विश्रांतवाडीतील दुचाकी चोरटे जामखेडमधून अटकेत; तीन दुचाकी जप्त

0

पुणे(प्रतिनिधि)

विश्रांतवाडी परिसरातून दुचाकी चोरून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी जामखेड (अहिल्यानगर) येथून अटक केली आहे. या चोरट्यांकडून तीन चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यात एक बुलेट दुचाकीचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत. आतिक बाबा शेख (वय २२, रा. कवडगाव, जामखेड), चांद नूरमहंमद शेख (वय २०, रा. पिंपरखेड, जामखेड) आणि चेतन ज्ञानेश्वर साळवे (वय १९, रा. कळस माळवाडी, विश्रांतवाडी, पुणे). विश्रांतवाडी परिसरातून आतिक शेख व चेतन साळवे यांनी दुचाकी चोरून त्या जामखेडला नेल्या होत्या. या चोरीप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरटे स्पष्टपणे दिसून आले.

पोलिस कर्मचारी विशाल गाडे व प्रमोद जाधव यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे विश्रांतवाडी पोलिसांचे पथक जामखेड येथे रवाना झाले. तेथे त्यांनी अतिक शेख व चेतन साळवे यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई पोलीस उपायुक्त हिंमत जाधव व सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक मंगेश हांडे, उपनिरीक्षक महेश भोसले, विशाल माने, बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत आणि संजय बादरे यांनी सहभाग घेतला.

 

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या तरुणाला अटक

0

पुणे(प्रतिनिधि)

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज पाठवून आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या एका तरुणाला पुण्यातील भोसरी येथून पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे (वय २५) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्याचा आहे.

गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडेंना कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता. या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम ७८ आणि ७९ तसंच आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली.

याप्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकांत संपर्क करुन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले. तो पुण्यातील भोसरी असल्याचे आढळून आले. यानंतर, सायबर पोलिसांनी भोसरी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आरोपी अमोल काळे याला अटक केली. चौकशीत काळेने पंकजा मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली. अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

एका सायबर अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी हा विद्यार्थी आहे आणि त्याने अपशब्द वापरण्यामागील आणि त्रासदायक वर्तनामागील हेतू सध्या तपासला जात आहे. मात्र, त्याला पुण्यातील भोसरी येथून अटक करण्यात आली. आरोपी अमोल काळे हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील परळी येथील रहिवासी आहे.

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या अडचणी वाढणार?

0

दिल्ली । Delhi

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर नॅशनल हेराल्ड प्रकरणात अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) अलीकडेच आरोपपत्र दाखल केले असून, त्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेग घेताना दिसत आहे.

दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने गुरुवारी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे. ईडीच्या आरोपपत्रात या सर्वांची नावे नमूद करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात आपली बाजू मांडण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ मे रोजी होणार आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, खटला औपचारिकपणे सुरू करायचा की नाही, हे ठरवण्याआधी संबंधितांना सुनावणीचा संधी देणे आवश्यक आहे. निष्पक्ष न्याय मिळावा यासाठी ही नोटीस जारी केल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

नॅशनल हेराल्ड हे इंग्रजी दैनिक भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 मध्ये सुरू केले होते. हे वर्तमानपत्र ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (AJL) या कंपनीमार्फत चालवले जात होते. मात्र, 2008 साली आर्थिक अडचणींमुळे हे बंद करण्यात आले. यानंतर काँग्रेस पक्षाने ‘यंग इंडियन’ या नव्या कंपनीच्या माध्यमातून AJL चा ताबा घेतल्याचा आरोप आहे. काँग्रेसने या कंपनीला सुमारे 90 कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, आरोपानुसार हे कर्ज वसूल न करता यंग इंडियनला AJL च्या संपत्ती व हक्कांचे हस्तांतरण करण्यात आले.

या व्यवहारात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा मुख्य सहभाग असल्याचे सांगितले जात आहे. ‘यंग इंडियन’ कंपनीत त्यांचा मिळून 76 टक्के हिस्सा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ED ने आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला असून, त्याचा तपास सुरू आहे. आता न्यायालयीन टप्प्यावर सुनावणीला सुरुवात होणार असल्यामुळे गांधी कुटुंबावरचा दबाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.

 

१ मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी रोखले

0
वैतरणा

इगतपुरी | प्रतिनिधी
इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन योजनेचे कामे फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांच्या आर्थिक फायद्यासाठीच आहे का असा सवाल उपस्थित करुन १ मे महाराष्ट्र दिनी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी रोखणार असा इशारा एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिला होता. त्यानुसार, एल्गार कष्टकरी संघटनेने १ मे रोजी आंदोलन करत पाणी रोखले. वैतरणा धरणावर एल्गार कष्टकरी संघटनेने जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेली योजनेची चौकशी करण्यासाठी व वाडयापाड्यावर टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी आक्रमक होत आंदोलनात्मक पवित्रा घेत मुंबईला जाणारे पाणी रोखण्यासाठी आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. वैतरणा धरणावर १ मे रोजी एक आक्रमक आंदोलन करण्यात आले.

मुंबईला होणारा पाणीपुरवठा रोखण्यासाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे पदाधिकारी आणि महिलांनी धरण परिसरात जोरदार आंदोलन छेडले. आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असलेले हे आंदोलन अचानक तीव्र झाले. संघटनेच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी थेट वैतरणा धरणाच्या मुंबईकडे जाणाऱ्या कॅनलमध्ये उड्या मारल्या. हा धक्कादायक प्रकार घडताच प्रशासनाने आणि जलसंपदा विभाग व पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी तत्काळ कॅनलमधून मुंबईकडे जाणारा पाणीपुरवठा थांबवण्याचा निर्णय घेतला. संघटनेचा आरोप आहे की, आदिवासी पाड्यांना अजूनही शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळत नाही. वारंवार निवेदने देऊनही स्थानिक जलसमस्या तसेच जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांमध्ये अपारदर्शकता आणि दिरंगाई असल्याची तक्रार संघटनेने केली. यावेळी उपस्थित पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी सुरु असलेल्या सर्व योजनांची चौकशी केली जाईल असे लेखी स्वरूपात आश्वासन दिले.

केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेली, एक चांगली योजना जलजीवन योजना सध्या राज्यात सर्वच ठिकाणी या योजनेतून कामे सुरू आहे. मात्र ते कामे कासव गतीने सुरू आहेत. जे कामे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबाला सन- २०२४ पर्यंत “हर घर नल से जल” प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येईल असे अपेक्षित होते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपूरी, नाशिक, पेठ, सुरगाणा व इतर तालुक्यातील अनेक कामे अपूर्ण आहेत. अशा सर्व कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी एल्गार संघटनेने ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालयावर हंडा मोर्चा काढला होता. तसेच १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंत्रालयावर हंडा मोर्चा काढला होता. यावेळी कार्यकर्त्यांना इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबवून लेखी आश्वासन देऊन त्यानुसार १५ एप्रिल रोजी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक झाली. मात्र त्यावेळी झालेल्या निर्णयाची आणि संघटनेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि दिलेले आश्वासन पाळले नाही म्हणून १ मे रोजी वैतरणा धरणातून मुंबईला जाणारे पाणी बंद करून आंदोलन करण्यात आले अशी माहिती यावेळी एल्गार संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी दिली.

या आंदोलनात संतू ठोंबरे, तानाजी कुंदे, वसंत इरते, सुरेखा मधे, मंगल खडके, मथुरा भगत, मीना लोणे, काळू निरगुडे, तुषार देहाडे, समाधान सदगिर, ढवळू गोहिरे, राजेंद्र आव्हाटे, संदीप झुगरे, गणेश गोहिरे, संतू पादिर, हनुमंत सराई, कविता पुंजारे, संजय पारधी, हनुमंत वारे, शिवाजी दोरे, रामदास सावंत, शांताराम बेंडकोळी, काळू बेंडकोळी, कृष्णा वारे, पदू गांगड, बाळू गांगड, मनोज दिवे, भीमाबाई बांगारे, धोंडाबाई लोते, पिंटू गांगड, नामदेव लचके, नामदेव पारधी, सोमनाथ अव्हाटे, दत्तू बांगारे, सुभाष मधे, गंगुबाई शिद, विलास शिद, लक्ष्मण बांगारे ,भागा आगीवले, यमुना लचके आदी सहभागी झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

 

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींच्या खात्यात १५०० रुपयांचा हफ्ता कधी जमा होणार? मंत्री आदिती तटकरे यांनी दिली महत्वाची अपडेट

0
लाडक्या

मुंबई | Mumbai
राज्यभरातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एप्रिलचा सन्मान निधी कधीपासून बँक खात्यात जमा होणार आहे, या संदर्भातील महत्त्वाची अपडेट दिली आहे.

मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात X वर पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे”.

“पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे”, असेही त्या म्हणाल्या.

 

PM Narendra Modi: “आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार”; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला

0
झोप

केरळ | Kerala
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ दौऱ्यावर होते. त्यांनी केरळमधील तिरुअनंतपुरम येथील विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन केले. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पीएम मोदी यांनी असे विधान केले आहे की, ‘त्या’ विधानामुळे राजकीय वर्तुळात अस्वस्थता वाढली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मी मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांना सांगू इच्छितो की, तुम्ही इंडिया ब्लॉकचे एक मजबूत आधारस्तंभ आहात. शशी थरूरही इथे बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडाणार आहे,”असे म्हणत मोदींनी टोला लगावला.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
PM मोदी विझिंजम बंदराच्या उद्घाटन समारंभात बोलताना म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री विजयन येथे बसले आहेत. ते इंडिया आघाडीचे एक मजबूत आधारस्तंभ आहेत. शशी थरूर देखील बसले आहेत. आजच्या कार्यक्रमामुळे अनेकांची झोप उडेल. जिथे संदेश जायचा होता तिथे गेला आहे.” पीएम मोदींच्या या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात गौतम अदाणी यांच्या नावाचाही उल्लेख केला.

आद्य शंकराचार्यांनी चेतना जागृत केली
मोदी म्हणाले, “आज भगवान आदि शंकराचार्य यांची जयंती आहे. तीन वर्षांपूर्वी सप्टेंबर महिन्यात मला त्यांच्या जन्मभूमीत जाण्याचे भाग्य लाभले. आद्य शंकराचार्य यांनी केरळ सोडून देशाच्या विविध कानाकोपऱ्यात मठ स्थापन करून राष्ट्राची चेतना जागृत केली. मी त्यांना अभिवादन करतो.”

केरळला जागतिक सागरी नकाशावर स्थान मिळण्याची अपेक्षा
विझिनजम बंदर सुरू झाल्यामुळे, केरळला जागतिक सागरी नकाशावर एक महत्त्वाचे स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. हे बंदर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि शिपिंगमध्ये भारताच्या भूमिकेत एक गेम चेंजर ठरू शकते.

मोदींकडून गौतम अदाणींचा उल्लेख
पंतप्रधान मोदींनी नाव न घेता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. गौतम अदाणी यांच्या उल्लेख करत ते म्हणाले, “येथे गौतम अदानीही उपस्थित होते. अदाणी यांनी जेवढे चांगले बंदर येथे तयार केले आहे, तेवढे चांगले बंदर तर गुजरातमध्येही तयार केलेले नाही.”

राजकीय प्रतिस्पर्धी अस्वस्थ
काँग्रेस खासदार शशी थरूर हे काँग्रेसचे तिरुवनंतपुरम लोकसभेचे खासदार आहेत. जे इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लूसिव्ह अलायन्सचे (इंडिया) एक प्रमुख सदस्य आहे. मोदींनी हे वक्तव्य जरी विनोदाने म्हटले असले तरी, राजकीय प्रतिस्पर्ध्यांना अस्वस्थ करण्याच्या उद्देशाने ते होते असे दिसून आले.

थरुर यांच्याकडून मोदींची प्रशंसा
रशिया-युक्रेन युद्धावर भारताची भूमिका आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी राजनैतिक चर्चा सुरू ठेवणे. यासह अनेक मुद्द्यांवर थरूर यांनी पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रशंसा केली. यानंतर मोदींनी हे भाष्य केले आहे.

खोल समुद्रातील हे बंदर भारतातील सर्वात मोठे बंदर विकासक अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (APSEZ) द्वारे विकसित केले आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप -PPP) मॉडेल अंतर्गत सुमारे 8,867 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण झाला. यशस्वी चाचणी झाल्यानंतर ४ डिसेंबर २०२३ साली या बंदराला व्यावसायिक कमिशनिंग प्रमाणपत्र मिळाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Ajit Pawar: शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांचा उलट सवाल; म्हणाले, “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले?

0
शेतकरी

कोल्हापूर | Kolhapur
विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) महायुतीने (Mahayuti) दिलेल्या आश्वसनांची पूर्तता करावी अशी मागणी आता सामान्यांकडून होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer Loan) देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले होते. हे आश्वासनाबाबत महायुतीच्या जाहीरनाम्यातही लिहिण्यात आले होते. पण महायुतीची सत्ता येऊन १०० दिवस होऊन गेले असले तरी अद्यापही सरकारकडून कर्जमाफीबाबत काहीही बोलले जात नाही. तर, दुसरीकडे महायुतीच्या मंत्र्यांकडून काही आश्वसनांबाबत सपशेल घुमजाव करत असल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले, असा थेट उलटसवाल केला. अजितदादांच्या या वक्तव्यावरून राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महायुती सरकार कर्जमाफीचे आश्वासन पाळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील मंत्री पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यापेक्षाही क्रूर झाले आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासने दिल्याने दररोज राज्यातील सात शेतकरी आत्महत्या करत आहेत, अशी पोस्ट X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजू शेट्टी यांनी केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांच्या या खळबळजनक विधानाबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत पवारांनी या मुद्द्याबाबत हात वर केले आहे.

काय म्हणाले अजित पवार?
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. त्याबाबत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारले असता त्यावर अजित पवार यांनी उलट सवाल करत “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले? मी दिलं आहे का? मी दिले आहे का? मी तरी दिले नाही!” अशा स्पष्ट आणि थेट शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली. त्यामुळे आता अजित पवारांच्या या विधानामुळे एका नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्याने आता लवकरच त्यांच्याकडून कर्जमाफी करण्यात येईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच याबाबत आश्वासन मी दिलेले नाही, असे म्हटल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा तर येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीची सत्ता आल्यास कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आले होते. त्याशिवाय लाडकी बहीण योजनेचे मानधन हे १५०० रुपयांवरुन २१०० रुपये करण्याची घोषणा महायुतीने केली होती. त्यानंतर महायुतीच्या मंत्र्यांकडून या घोषणेवर प्रश्न निर्माण केले. आता, अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्याने आता विरोधक आणखीच आक्रमक होण्याची शक्यता आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

संरक्षण मंत्र्यांनंतर आता बिलावल भुत्तोंनी दिली कबुली ; म्हणाले, हो आम्ही दहशतावादी…

0
बिलावल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानकडून दहशतवाद पुरस्कृत केला जाते, असा आरोप भारतासह अनेक देशांनी आजवर केलेला आहे. पाकिस्तानने मात्र कधीही ही बाब स्वीकारली नव्हती. मात्र २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाकिस्तानने अमेरिका आणि पाश्चात्या देशांच्या सांगण्यावरून दहशतवादाला खतपाणी घातल्याचे मान्य केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टोनेही ही बाब मान्य केली आहे. पाकिस्तानचा इतिहास आहे, पाकिस्तानात वाढणाऱ्या दहशतवाद्यांनीच माझ्या आईची हत्या केली. मी स्वत: दहशतवादाचा पीडित आहे असे बिलावल भुट्टोने म्हटले आहे.

बिलावल भुट्टो यांनीही एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांच्यासमोरही ख्वाजा आसिफ यांना विचारलेला प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर उत्तर देताना भुट्टो म्हणाले की, हे काही आता गुपित राहिलेले नाही. पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरविली होती. कट्टरपंथी भूमिकेतून आम्ही धडा घेतला आहे. त्यातून अंतर्गत सुधारणाही केली आहे. आता हा सगळा इतिहास आहे. आम्ही आता दहशतवादात सहभागी नाही. देशाने खूप काही भोगले आहे असे त्यांनी म्हटले.

भुट्टो पुढे म्हणाले, “पहिल्या अफगाण युद्धादरम्यान पाकिस्तानने मुजाहिदीनला पाठिंबा देऊन त्यांना निधी पुरवठा केला होता. पाकिस्तानचा यात सक्रिय सहभाग होता. पाश्चात्या देशांसह एकत्र येऊन आणि त्यांच्या साथीने आम्ही हे काम केले. पाकिस्तानात दहशतवादाच्या अनेक लाटा येत राहिल्या. यात आमचेही नुकसान झाले.”

पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादाला पोसले असले तरी आता मात्र परिस्थिती बदलली आहे, असा दावाही भुट्टो यांनी केला. “आज आम्ही दहशतवादाच्या कोणत्याही कृत्यात सामील नाहीत. इतिहासात नक्कीच दुर्दैवाने आम्ही याचा भाग होतो. पण यातून आम्ही काही धडेही शिकलो”, असे भुट्टो यांनी या मुलाखतीत सांगितले.

काय म्हणाले होते ख्वाजा असिफ
पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी टीव्ही चॅनेलवरील मुलाखतीत आम्ही ३ दशकांपर्यंत अमेरिका आणि पाश्चात्य देशांसाठी डर्टी वर्क केले असे विधान केले होते. ही आमची चूक होती, त्याची शिक्षा आम्ही भोगतोय असेही ख्वाजा आसिफ यांनी कबुली दिली होती. २२ एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ला झाला. त्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी घडवून आणला. या दहशतवादी संघटनेला पाकिस्तानात आश्रय दिला जात आहे असा आरोप होतो.ॉ

गुरुवारी मीरपुरखास येथे एका रॅलीला संबोधित करताना बिलावल भुट्टो म्हणाले की, “पाकिस्तानला शांतता हवी आहे. पण भारताने चिथावणी दिली, तर युद्धासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला युद्ध नकोय. पण कोणी सिंधुवर हल्ला केला, तर त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ” पाकिस्तानी नेत्यांच्या या वक्तव्यावरुन त्यांचा दुटप्पीपणा दिसून आलाय.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तान दहशतीत; PoK मधील पर्यटन स्थळ, मदरसे १० दिवसांसाठी केले बंद

0
मदरसे

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान देशांदरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ( PoK) भारत केव्हाही हल्ला करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर पाकिस्तानमध्ये गेल्या आठवडाभरापासून यु्द्धाची तयारी सुरू आहे. पाकिस्तानने देशातंर्गत सुद्धा युद्धाची तयारी सुरू केली आहे. सायरन बसवण्यात आले आहे. तर दुसरीकडे नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताकडून संभाव्य लष्करी कारवाईच्या भीतीमुळे सुरक्षा परिस्थिती लक्षात घेता नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील भागात पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच धार्मिक मदरसे १० दिवसांसाठी बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

पाक व्याप्तचे पंतप्रधान चौधरी अन्वर-उल-हक याने याबाबत संकेत दिले आहेत. जर परिस्थिती आणखी बिकट झाली तर या प्रदेशात आणीबाणी लागू केली जाऊ शकते, असे संकेत दिले आहेत. सुरक्षेसाठी नीलम खोरे आणि नियंत्रण रेषेजवळ पर्यटनाला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

पीओके हल्ल्याच्या भीतीने दहशतीत
भारत पीओके भागात केव्हाही हल्ला करु शकतो या भीतीने दहशतीत आहे. हल्ला झाल्यास जेवण, औषधी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची कमतरता पडू नये यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. युद्ध झाल्यास आर्थिक रसद कमी पडू नये यासाठी आपात्कालीन निधी तयार करण्यात आला आहे. जवळपा एक अब्ज रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. तर पाकव्याप्त परिसरातील सर्व हॉटेल, गेस्टहाऊसचा ताबा पाकिस्तानी लष्कराने घेतला आहे. या वास्तूंच्या मालकांकडून ते बळजबरीने घेण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर आपण सैन्यासाठी या वस्तू सोडत असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यात येत आहे.

मदरसे केले बंद
नीलम व्हॅली आणि नियंत्रण रेषेच्या आसपासच्या संवेदनशील भागात असलेले मदरसे १० दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. भारत या संस्थांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे म्हणून संबोधून त्यांना लक्ष्य करू शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी नीलम खोरे, किशनगंगा नदी परिसर आणि संवेदनशील परिसरात पर्यटनासाठी पूर्णपणे बंदी घातली. अनेक पर्यटकांना मार्बल चेकपोस्टवरूनच परत पाठवण्यात आले. लिपा खोऱ्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ जाण्यास पाकिस्तानी लष्कराने बंदी घातली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Rain Update: दिल्लीत अवकाळी पावसाचा हाहाकार; वादळीवाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याची घटना, अनेकांचा मृत्यू, महाराष्ट्रालाही दिला अलर्ट

0
अवकाळी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळ, पाऊस आणि वीज पडण्याच्या घटनांमध्ये १० जणांचा मृत्यू झाला. दिल्ली-यूपीमध्ये प्रत्येकी ४ आणि छत्तीसगडमध्ये २ जणांचा मृत्यू झाला. मुसळधार पावसासोबत जोरदार वादळीवाऱ्यामुळे झाडे पडण्याचे तसेच घरांचे छप्पर पडण्याच्या घटना दिल्लीत घडल्या आहेत. अशाच एका घटनेत, दिल्लीतील जफरपूर कला भागात एका घरावर झाड पडून या अपघातात ३ मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याशिवाय, दिल्लीतील छावाला येथे एका घराचे छत कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत.

बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे मोठ्या प्रमाणावर राज्याच्या दिशेने येत आहे. यामुळे पुढील चार दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवेच्या दाबाचा पट्टा विदर्भातून जात असल्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून पूर्व विदर्भात शुक्रवारी (ता. 2 मे) आणि शनिवारी (ता. 3 मे) हलक्या पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा दिला आहे. नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये ३ मे पर्यंत हलक्या पावसाचा अंदाज आहे.

दरम्यान, उत्तर भारतात हवामान विभागाने आज राजस्थानच्या ३० जिल्ह्यांमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. गुरुवारी यापूर्वी जयपूर, जैसलमेर, भिलवाडा आणि पाली येथे वादळासह पाऊस पडला आणि अनेक ठिकाणी गारपीटही झाली. हवामान विभागाच्या मते, शुक्रवारी मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, ओडिशा, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा येथे गारपीट होऊ शकते. तर राजस्थान, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाबमध्ये धुळीचे वादळ येईल.

आज झालेल्या मुसळधार पावसानंतर दिल्ली-एनसीआरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. सकाळपासून असे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची अर्धी चाके पाण्यात बुडलेली दिसत आहेत. खरंतर, हवामान खात्याने दिल्लीच्या हवामानातील बदलाबाबत आधीच अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने सांगितले होते की, गुरुवारी संध्याकाळपासून दिल्लीत जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. गुरुवारी (१ मे) रात्री दिल्लीत पावसाची नोंद झाली.

शुक्रवारी (२ मे) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास दिल्ली-एनसीआरच्या वेगवेगळ्या भागात जोरदार वारे वाहू लागले. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील प्रगती मैदानात ताशी ७८ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. या काळात मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे दिल्लीतील विविध भागात पाणी साचलेले पहायला मिळाले. आज शुक्रवारी सकाळी दिल्लीतील द्वारका येथील खारखरी कालवा गावात जोरदार वाऱ्यामुळे ट्यूबवेल रूमवर एक कडुलिंबाचे झाड पडले. या अपघातात एका महिलेचा आणि तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला, तर महिलेचा पती जखमी झाला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा