अहिल्यानगर (प्रतिनिधी)
अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची एक महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण होत आहे. १७ जून रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे-शिर्डी नवीन रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे. या रेल्वेमुळे पुणे, अहिल्यानगर आणि शिर्डी यांच्यातील दैनंदिन प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
- Advertisement -
या रेल्वेला दौंड कॉर्ड लाईन, श्रीगोंदा रोड, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर आणि शिर्डी येथे थांबे असतील. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी तसेच साईभक्तांना मोठा फायदा होणार असून, पुणे येथे जाताना वाहतूक कोंडीच्या त्रासापासून नागरिकांना सुटका मिळणार आहे.




