Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: पैसे दिल्यानंतर व्हॉट्स ॲपवर प्रश्न पाठवायचा मग...; रोहित पवारांनी MPSC...

Rohit Pawar: पैसे दिल्यानंतर व्हॉट्स ॲपवर प्रश्न पाठवायचा मग…; रोहित पवारांनी MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला, सगळंच सांगितलं

मुंबई | Mumbai
नीट, TET पेपरफुटीनंतर महाराष्ट्र आणखी एक पेपरफुटी (Paper Leak) झाल्याचा दावा काँग्रेससह शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (27 जुलै) केला आहे. राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर फुटल्याचा (MPSC) दावा विरोधकांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका (MPSC Drug Inspector Paper Leak) पेपर फुटी प्रकरणी रोहित पवार (Rohit Pawar) यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. रोहित पवार यांनी त्यांच्याकडे पुरावे असल्याचा सुद्धा दावा केला आहे. रोहित पवारांनी आज पत्रकार परिषद घेत एक प्रेझेंटेशन करुन त्यांनी हा पेपर कसा फुटला ते सर्व समाजवून सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पेपरफुटीची संपूर्ण कार्यपद्धती समोर मांडली. त्यांनी केलेल्या दाव्यात म्हटले की, २२ मार्च रोजी औषध निरीक्षकपदाची परीक्षा होती. पण, नंदुरबारच्या कौटिल्य अकादमीतील काही विद्यार्थ्यांना २० मार्चलाच म्हणजेच दोन दिवस आधी परीक्षेतील ९० टक्के प्रश्न उपलब्ध झाल्याचा दावा केला.

- Advertisement -

कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E20 जनता पार्टीचा उदय; काय आहे E20 जनता पार्टी? कोणत्या मागण्या आहे?

पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हॉट्स ॲपवर प्रश्न पाठवायचा
“पैसे दिल्यानंतर संबंधित व्यक्ती व्हॉट्सॲपवर प्रश्न पाठवायचा. तसेच, 2 ते 3 मिनिटांतच ‘डिलीट फॉर ऑल’ करायचा. मात्र, एका विद्यार्थ्याने ते डाऊनलोड केलेले प्रश्न आपल्या मित्राला पाठवले, ज्यामुळे या गैरव्यवहाराचे डिजिटल पुरावे आता आपल्या हाती लागले आहेत,” असा मोठा आणि खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे. यावेळी रोहित पवारांनी औषध निरीक्षक भरतीचा मूळ पेपर आणि विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन दिवस आधी पाठवण्यात आलेला पेपर स्क्रीनवर दाखवला. या सगळ्याबाबत आम्ही एमपीएससी कार्यालयात आम्ही जाणार आहोत. तसेच तुकाराम मुंढे यांनादेखील भेटणार आहोत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

आपल्या विचारांचे लोक यंत्रणेत हवेत या हेतूने पेपर लीक
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात टीईटी, नीट, एसआरपीएफ, एचएससी केमेस्ट्री, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोतवाल भरती, तलाठी भरती, महाजनको अशा विविध परीक्षांचे पेपर लीक झाले. या परीक्षांसाठी गरिबांची मुलं खूप परिश्रम घेतात. पण महाराष्ट्रात पैसे देऊन आणि आपल्या विचाराची लोक यंत्रणेत असावी या हेतूने पेपर लीक केले जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.

एफडीएच्या अंतर्गत येणाऱ्या औषध निरीक्षक भरतीचा पेपर फुटला होता, त्याबद्दल मी सांगतो. एफडीए खात्यात तुकाराम मुंढे यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी असेल तर चांगले काम होते. पण ते वरच्या लेव्हलला आहेत. त्यांच्या खाली असणारे अधिकारीही चांगले असले पाहिजेत. पण पैसे देऊन एखादी व्यक्ती औषध निरीक्षक अधिकारी झाली असेल तर तो नोकरीत आल्यावर आधी पैसे वसूल करण्याचे बघेल. ते काम योग्य पद्दतीने होणार नाही. या पदावर एखादी व्यक्ती पैसे देऊन गेली असेल तर काय अनर्थ होऊ शकतो, याचे उदाहरण आपण बघितले आहे. कफ सिरपमुळे गरिबांची २२ मुलं मेली. दुर्दैवाने महाराष्ट्रात हाच पेपर फुटला होता आहे. या पदावर गेलेली काही लोकं पैसे देऊन अधिकारी झाली आहेत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

ताज्या बातम्या