Thursday, May 14, 2026
Homeनगरभय इथले संपेना! दुसरा बिबट्या जेरबंद, आणखी दोन बिबट्यांची पिंजऱ्या भोवती चक्कर

भय इथले संपेना! दुसरा बिबट्या जेरबंद, आणखी दोन बिबट्यांची पिंजऱ्या भोवती चक्कर

हनुमंतगाव (वार्ताहर)

राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दावीद फकिरा पलघडमल यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले. गेल्या महिन्यापासून पलघडमल, साबळे वस्तीवर तीन बिबट्यांनी मुक्काम ठोकला आहे त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर पिंजरा लावण्यात आला होता आणि दोन दिवसाच्या अंतराने दुसरा एक वर्ष वयाचे मादी बिबट्या जेरबंद झाले.

- Advertisement -

एक एप्रिल रोजी पुन्हा दावीद पलघडमल यांच्या गट नंबर २९०/२ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या. शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी रात्री ५ वाजता कोंबड्यांच्या सावजाला आकर्षून बिबट्याचे एक वर्ष वयाचे मादी पिल्लू अलगत जेरबंद झाले. सकाळी बिबट्या जेरबंद झाल्याचे बिबट्याचे पिल्लु जेरबंद झाल्याचे कळताच त्यांनी सी.सी.टीवी फुटेज चेक केले असता दोन बिबटे पिंजऱ्याच्या कडेने फिरताना दिसून आले. प्रविण पलघडमल यांनी वनविभाग राहुरी व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.

माहिती मिळताच सकाळी वनपाल एस. आर. कोरके, वनरक्षक घुगे, बी.आर.दिवे, एस. आर. झंझट, वन कर्मचारी पठाण, ड्रायव्हर तारु,प्राणीमित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले. व सदर माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी श्री धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल साळुंखे यांना माहिती देण्यात आली.

जेरबंद बिबट्याला दुसऱ्या पिंजऱ्यात शिफ्ट करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली. आणि पिंजरा परत त्याच ठिकाणी लावण्यात आला. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती व यावेळी प्रविण पलघडमल, सचिन पलघडमल , प्रभाकर पलघडमल , राजु साबळे, आरुष पडघडमल, मयूर पडघडमल, सतीश बर्डे, सोमनाथ बर्डे, विशाल गोधाडे यांनी मदत केली.वनविभागाने परत पिंजरा लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांची समाधान व्यक्त केले व वनविभागाचे आभार मानले.

ताज्या बातम्या

पडसाद : स्वेच्छानिवृत्तीचा दुष्काळात तेरावा!

0
'नाव सोनूबाई हाथी कथलाचा वाळा' ही म्हण नाशिकच्या महापालिकेला सध्यातरी तंतोतंत लागू पडते. कारण राज्यातील काही मोठ्या महापालिकांमध्ये नाशिकची गणना होते. सुमारे साडेतीन हजार...