Friday, April 17, 2026
HomeनाशिकNashik News : जिल्ह्यात महिनाभरात 'इतके' टक्के रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण

Nashik News : जिल्ह्यात महिनाभरात ‘इतके’ टक्के रेशनकार्ड ई-केवायसी पूर्ण

मशिनच्या तांत्रिक अडचणी लवकरच सोडवणार

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शासनाने रेशनकार्ड धारकांना (Ration Card Holder) केवायसी करणे बंधनकारण केले आहे. जिल्ह्यात ७ लाख ९८ हजार ७०५ रेशनकार्ड धारक आहेत. त्यांचे केवायसी (KYC) महिनाभरात २७.१८ टक्के ई केवायसी पूर्ण झाली आहे. अजूनही ७० टक्क्याहून अधिक रेशनकार्ड धारकांची इ केवायसी बाकी आहे.

- Advertisement -

जिल्हयात ७ लाख ९८ हजार ७०५ रेशनकार्ड धारकांच्या माध्यमातून कुटूंबातील ३७ लाख ८ हजार २८२ सदस्याची इ केवायसी करण्याचे जिल्हा पुरवठा विभागापुढे मोठे लक्ष्य ठेवण्यात आले होते. दि.१ जून ते दि. ४ जुलै या महिनाभराच्या कालवधीत १० लाख ७ हजार ७८७ रेशनकार्ड धारक लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण केली आहे. रेशनधारकांना ई केवायसी बंधनकारक केल्याने रेशन दुकानात नागरिक गर्दी करत आहेत. मात्र ई केवायसी मशीन अनेक दुकानात बंद असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहे.

हे देखील वाचा : Nashik News : पंचवटी एक्सप्रेसची अचानक कपलिंग तुटली अन्…

ई केवायसी (E-KYC) बंधनकारक केल्याने नागरिक वेळ काढून रेशन दुकानात जात आहेत. अनेक दुकानात (Shop) रेशन घेताना थम होत आहेत. तर काही ठिकाणी ई केवायसी वेळी मशीन काम करीत नाही अश्या तक्रारी येत आहेत. केवायसी मशीनच्या कार्यप्रणालीच्या तक्रारी असल्याने केवायसीची प्रक्रिया जिल्हाभरात संथगतीने सुरू आहे. त्यामुळे जिल्हा पुरवठा विभागाकडून (District Supply Department) ई केवायसी संदर्भात येणार्‍या तांत्रिक अडचणी विषयी मंत्रालयात संबंधित विभागाला पत्र पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच ई केवायसी मशीन संदर्भातील तक्रारी संपण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पेठ तालुक्यात (Peth Taluka) सर्वाधिक ४४.६९ टक्के ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर सर्वात कमी मालेगाव शहरामध्ये ७.४२ टक्के ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. रेशन वितरण होत आहे, मात्र केवायसीला तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे अनेक रेशन वितरण दुकानातील ई केवायसी प्रक्रिया ठप्प आहे.

हे देखील वाचा : रवींद्र वायकरांना ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

रेशन धारकांनी ई केवायसी लवकरात लवकर करून घ्यावी. महिनाभरात जिल्हयात २७.१८ टक्के ई केवायसी पूर्ण झाली. ई केवायसी मशीन च्या तांत्रिक अडचणी लवकरच सोडवण्यात येतील.

कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी) 

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

महिला आरक्षणासाठीचं घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था New Delhi लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाच्या अंमलबजावणीवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाल्यानंतर या सर्व या गदारोळातच घटनादुरुस्तीसह...