नाशिक | प्रतिनिधी Nashik
- Advertisement -
नाशिकच्या गंगापूर धरणात बुडून चार जणांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सर्व मृत गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या सावरगाव मधील रहिवासी आहेत.या भीषण दुर्घटनेमुळे नाशिकमध्ये आणि सावरगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. हे सर्वजण गंगापूर धरणाच्या जलाशयात उतरले होते. मात्र पाण्याचा खोलीचा अचूक अंदाज न आल्यामुळे चौघेही पाण्यात बुडाले.
स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.पुढील तपास पोलीस करत आहेत.
मृतांची नावे
मयुरी पवन जाधव वय 22
गणेश सुरेश गोतरने वय 16
निखिल मच्छिन्द्र गौतरणे 15
साहिल मनोहर गोतराने वय16,




