Thursday, May 15, 2025
Homeनगरआपल्याला महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत - विवेक कोल्हे

आपल्याला महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत – विवेक कोल्हे

संजीवनी युवा प्रतिष्ठानची मानाची दहीहंडी सोहळा

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

आपल्याला दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत, असे प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानची मानाची दहीहंडी सोहळ्याप्रसंगी काढले. दहीहंडी उत्सवानिमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज मानाची दहीहंडी पार पडली. मोठ्या संख्येने शहर आणि तालुक्यातून गोविंदा पथक व नागरिकांनी हजेरी लावली. हजारो नागरिकांनी तुडूंब गर्दी करून गोविंदांना प्रोत्साहन देत होते हे क्षण अविस्मरणीय आनंद देणारे ठरले. सतत सामाजिक संदेश देणार्‍या संजीवनी युवा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवात देखील वेगळेपण सिद्ध केले आहे. महिलेशी असभ्य वर्तन केले म्हणून रांझे गावच्या बाबजी गुजरचे हात पाय कलम करण्याची शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी दिली होती तो प्रसंग हुबेहूब साकारला गेला. दहीहंडी स्त्री संरक्षणाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अशी थीम घेण्यात आली होती.

‘महिला नाचवायच्या नाही तर वाचवायच्या आहेत’ या आशयाचे फलक युवकांनी झळकावले. त्यावर भाष्य करताना विवेक कोल्हे यांनी महिलांचा आदर करणारे युवक घडवणे हे आपले ध्येय आहे.ज्यावेळी कौरव पांडव यांच्या युद्धात योग्य मार्गदर्शक पांडवांच्या बाजूने श्रीकृष्णाच्या रूपाने होता. त्यामुळे असे उत्सव साजरे करताना आपण योग्य आदर्श मिळणारे केंद्र शोधल्याने आपले जीवन नक्कीच बदलते. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे नेहमीच आदर्श उपक्रम राबवते. यावेळी कुठली सिने कलाकार न बोलवता मंजूर येथे गोदावरीत वाहून जाणार्‍या युवकांना वाचविण्यासाठी आपली साडी पाण्यात फेकणार्‍या ताईबाई पवार यांना निमंत्रित करून सत्कार करण्यात आला. त्याच आजच्या सेलीब्रेटी आहेत, असे म्हणताच गोविंदा पथकांनी एकच जल्लोष केला. दहीहंडी यशस्वी करण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवासेवक आणि उत्सव समितीचे कोल्हे यांनी कौतुक केले.

अनेक गोविंदा पथकांनी प्रयत्न करूनही दहीहंडी फुटली नाही त्यामुळे काही उंची कमी करून सर्व पथकांनी मिळून दहीहंडी फोडली. या दहीहंडीचे बक्षीस सर्वांना विभागून देण्यात आले. स्वतः विवेक कोल्हे यांनी तिसर्‍या थरावर जाऊन दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला. यामुळे सर्वांनी कौतुकाने टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, गोविंदा पथक, नागरिक, महिला भगिनी आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवासेवक उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Rajnath Singh : “धर्म विचारून त्यांनी निरपराधांचा बळी घेतला, आपण कर्म...

0
नवी दिल्ली | New Delhi  जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील...