नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
देशातील पाच राज्यांतील बहुचर्चित विधानसभा निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकांमध्ये केरळ आणि तामिळनाडू वगळता भाजपला प्रचंड मोठे यश मिळाले. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली आहे. तामिळनाडूत विजय थलपतिच्या टीव्हीके पक्षाने द्रमुक आणि अण्णाद्रमुकला मागे टाकून १०० पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. तर दुसरीकडे, भाजपने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता उलथवून पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन केली आहे. गेली १५ वर्षे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता होती. मात्र, ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव झाल्याने आता भारतामधील आणखी एक राज्य भाजपच्या ताब्यात आले आहे. यामुळे देशातील भाजपशासित राज्यांची संख्या वाढली आहे. पश्चिम बंगालच्या विजयानंतर आता देशातील २२ राज्यांमध्ये भाजप किंवा भाजप आघाडीचे सरकार असेल.
या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे
महाराष्ट्र
हरियाणा
दिल्ली
राजस्थान
गुजरात
मध्य प्रदेश
गोवा
उत्तराखंड
उत्तर प्रदेश
बिहार
सिक्कीम
मेघालय
अरुणाचल प्रदेश
नागालँड
मणिपूर
आसाम
त्रिपुरा
पश्चिम बंगाल
ओदिशा
छत्तीसगढ
आंध्र प्रदेश
पुद्दुचेरी




