Thursday, April 16, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; काय आहे हवामान...

Maharashtra Weather : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत आज मुसळधार पावसाची शक्यता; काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस (Rain) आजपासून राज्यातील विविध भागांत पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने (IMD) आज (दि.११ सप्टेंबर) रोजी काही जिल्ह्यांना हायअलर्टचा इशारा दिला आहे. पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक – बंगळुरू विमानसेवेला प्रारंभ

हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधून -मधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. यासोबतच कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : शिष्यवृत्तीत एकसमानता आणण्यासाठी समिती गठीत; सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी

तर विदर्भातील भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे. याशिवाय उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील (Marathwada) जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (३०-४० किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा : किरीट सोमय्यांनी नाकारला पक्षादेश; म्हणाले, “अशी अवमानास्पद वागणूक देऊ नका”

मुंबईत दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता

मुंबईमध्ये (Mumbai) सप्टेंबर सुरू झाल्यापासून श्रावणसरींचा अनुभव मुंबईकरांना येत आहे. सप्टेंबरमध्ये राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज होता, मात्र मुंबईत अजून तरी पावसाचा जोर फारसा वाढलेला नाही. आज, बुधवारी पाच दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी तसेच उद्या, गुरुवारी गौरी-गणपती विसर्जनावेळीही महामुंबई विभागात पावसाचा जोर मोठा असण्याची शक्यता नाही.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai राज्य सरकारने गुरुवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. जलजीवन मिशनचे संचालक जी. श्रीकांत यांची बदली छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त...