नाशिक | प्रतिनिधी
मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल १७४ गावे आणि ४८० वाड्या अशा एकूण ६५४ ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, सुमारे ३ लाख १८ हजार ७०८ नागरिकांची तहान टँकरच्या भरवशावर भागवली जात आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, हेतीनुसार, सध्या एकही शासकीय टैंकर कार्यरत नसून १७९ खासगी टँकर दररोज ३९५ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ नांदगाव तालुक्याला बसली आहे. येथे ३८ गावे आणि १९२ वाड्या अशा एकूण २३० ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ५३,२१६ नागरिक त्यावर अवलंबून आहेत. त्याखालोखाल येवला (११४), सिन्नर (७९), मालेगाव (६५) आणि इगतपुरी (५०) या तालुक्यांमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, येवला तालुक्यातील ८२,२५२ नागरिक, मालेगावमधील ३९ हजारांहून अधिक, सिन्नरमधील ३७,४७१ आणि इगतपुरीतील २४ हजारांहून अधिक नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.
Nashik Tapovan: तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी
पाणीटंचाईची सद्यस्थिती
गावे : १७४
वाड्या : ४८०
एकूण गावे-वाड्या ६५४
खासगी टँकर : १७९
दररोजच्या फेऱ्या : ३९५
लाभार्थी लोकसंख्या ३,१८,७०८
सर्वाधिक टंचाईग्रस्त तालुके
तालुका गावे-वाड्या
नांदगाव २३०
येवला ११४
सिन्नर ७९
मालेगाव ६५
इगतपुरी ५०




