Wednesday, June 10, 2026
HomeनाशिकNashik TCS Case: अश्विनी चैनाचीची भूमिका संशयास्पद, या टप्प्यावर जामीन देणं योग्य...

Nashik TCS Case: अश्विनी चैनाचीची भूमिका संशयास्पद, या टप्प्यावर जामीन देणं योग्य नाही; न्यायालयाने सहाही जणांचा जामीन अर्ज फेटाळला

नाशिक | प्रतिनिधी
नाशिकमधील टीसीएस कंपनीतील लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयितांनी जामिनासाठी केलेले अर्ज नाशिक न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. यामध्ये कंपनीची असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चैनानी हिच्यासह अन्य पाच संशयितांचा समावेश आहे. न्यायालयाने गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासातील भक्कम पुरावे ग्राह्य धरत या सर्वांना जामीन देण्यास नकार दिला असून, त्यांचा मुक्काम नाशिकरोड कारागृहात वाढला आहे.

सर्वच जामिन अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने कडक भूमिका घेतली. संशयितांनी केलेले कृत्य हे जाणीवपूर्वक आणि कट रचून केल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पीडितांनी न्यायालयासमोर दिलेले जबाब, पोलिसांनी संकलित केलेले तांत्रिक पुरावे आणि गुन्ह्याचे स्वरूप पाहता, या टप्प्यावर जामीन देणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या संपूर्ण प्रकरणात कंपनीची एजीएम अश्विनी चैनानी हिची भूमिका संशयास्पद असल्याचे पोलिसांच्या ‘एसआयटी’ तपासात समोर आले आहे.

- Advertisement -

NEET Exam Paper Leak : नीट पेपरफुटीचा मास्टरमाईंड पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

मुख्य संशयित दानिश शेख याला पोलिसांनी अटक करण्याच्या काही तास आधी अश्विनीने त्याला कॉल केल्याचे समोर आले आहे. विनयभंग झाल्यानंतर पीडितेने तक्रार केली असता, अश्विनीने तिला तुमको क्या हायलाईट होना है? आणि जाने दो, छोड दो असे म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी कंपनीतील ७८ संशयास्पद ई-मेल आणि कॉल रेकॉर्ड्सचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत, असे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सांगितले.

तौसिफ अत्तारसह पाच जणांचे अर्ज फेटाळले
शुक्रवारी (दि. १५) झालेल्या अंतिम सुनावणीत अश्विनी चैनानीसह तौसिफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, आसिफ अन्सारी आणि शफी शेख यांच्या जामीन अर्जावर निर्णय झाला. या सहाही जणांचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. कंपनीतील विविध प्रकरणांबाबत एकूण ९ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ३ गुन्ह्यांत संशयितांनी अद्याप जामिनासाठी प्रयत्न केलेले नाहीत.

ताज्या बातम्या

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

0
भारतीय लोकशाही आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) सलग तिसर्‍यांदा सत्ता स्थापन करून सुमारे...