Tuesday, May 6, 2025
Home Blog Page 12320

एलआयसीच्या ‘असिस्टंट’ परीक्षेचा निकाल जाहीर; नाशिक विभागातून ११४८ उमेदवार उत्तीर्ण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) ‘असिस्टंट’ पदाच्या भरतीसाठी देशभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक विभागातून १ हजार १४८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २२ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

चोवीस वर्षांपासून रखडलेली विमा क्षेत्रातील तृतीयश्रेणी कर्मचार्‍यांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशभरातून आठ हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन परीक्षा झाली. त्यामध्ये हजारो उमेदवारांनी सहभाग नोंदविला. असिस्टंट क्लार्क पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेनंतर आता मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. कर्मचारी बढती किंवा निवृत्तीमुळे २४ वर्षांमध्ये वर्ग तीनची सुमारे २७ हजार पदे रिक्त आहेत.

सद्यस्थितीत देशभरात विमा कर्मचार्‍यांची संख्या १ लाख १० हजार आहे. यातील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचार्‍यांची संख्या ५७ हजार, तर वर्ग एकचे कर्मचारी ३१ हजार आणि दोनचे कर्मचारी २२ हजार आहेत. वर्ग तीनमध्ये प्रामुख्याने लिपिकांचा समावेश होतो. विमा क्षेत्राच्या कामकाजाचा विस्तार पाहता लिपिकांची मोठ्या संख्येने गरज आहे. मात्र, रखडलेल्या पदभरतीमुळे कार्यरत कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण वाढला आहे. अखेर दोन दशकानंतर ही भरती सुरू झाल्यामुळे विमा कार्यालयातील मनुष्यबळ वाढणार आहे.

जि.प.अनुकंपा भरती;आज कागदपत्रांची तपासणी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक |प्रतिनिधी

सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया तब्बल तीन महिन्यांपासून प्रतीक्षेत आहे.या प्रक्रीयेला अखेर मुहुर्त सापडला असून नियुक्तीसाठी कागदपत्रांच्या तपासणीसाठी संबंधित उमेदवारांना मंगळवारी (दि.३)कागदपत्र तपासणीसाठी बोलाविण्यात आले आहे.अनुकंपाच्या ६४ रिक्त जागा यातून भरण्यात येणार आहे.या उमेदवारांना तात्काळ अथवा एक दोन दिवसामध्ये नियुक्तीपत्र देण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेत सन २०१५ मध्ये अनुकंपा तत्वावर भरती करण्यात आली होती.त्यानंतर चार वर्षांपासून रिक्त होणार्‍या जागा अनुकंपा तत्वावर भराव्यात यासाठी उमेदवारांचा पाठपुरावा सुरू होता.जिल्हयात २९६ उमेदवार असून त्यांची शैक्षणिक पात्रता लक्षात घेता, जिल्हा परिषदेने त्यांची भरती करण्याचा निर्णय करण्यासाठी यापूर्वी त्यांच्याकडून शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज मागवले. त्यानुसार त्यांची सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली होती.

यापूर्वी देखील या उमेदवारांना वेळी कागदपत्रे छाननीसाठी बोलविण्यात आले होते. तर कधी मुख्य कार्यकारी अधिकारी नाही तर कधी बैठक घेण्यासाठी वेळच मिळत नसल्यामुळे या बैठका झाल्या नाहीत. विधानसभा निवडणुकी दरम्यान उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने अनुकंपा उमेदवारांना कागदपत्रे घेऊन बोलवले. मात्र, याच दरम्यान सामान्य प्रशासन विभागाने शासनाकडे अनुकंंपा नियुक्तीच्या अनुषगांने परिचर नियुक्ती संदर्भात मागविण्यात आलेले मार्गदर्शन पत्र विभागाला प्राप्त झाले.

या पत्रात सद्यस्थितीत सर्व जिल्हा परिषदेकडील सन २०१९ मधील पदभरती मध्ये वर्ग-४ ची पदे भरण्यात येत नाहीत. त्यामुळे पदभरतीत समावेश नसलेली पदे अनुकंपा नियुक्तीसाठी ग्राहय धरता येणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच जेष्ठता सूची तयार करून नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले. याचाच अर्थ परिचरांना अनुकंप नियुक्ती प्रक्रीयेत नियुक्ती देता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले होते.

यावर जिल्हा परिषदेने पुन्हा शासनाकडे मार्गदर्शन मागविले असता,त्यावर शासनाने रिक्त जागांच्या २० टक्के गट क व ड मधून सर्व पदे भरावी असा आदेशच काढला.
त्यानुसार,पात्र उमेदवारांना मंगळवारी (दि.३) कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलविण्यात आले आहे. यात शैक्षणिक अर्हता, मार्कशीट, मुळ कागदपत्र पडताळणी होईल. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले जातील. अनुकंपा तत्त्वावरील कर्मचार्‍यांची यादी २९६ असली तरी त्यातील ११९ उमेदवारांना पहिल्या टप्प्यात पात्र ठरवण्यात येणार असून त्यातील ६४ उमेदवारांना सेवेत सामावून घेण्यात येणार होते. याच उमेदवारांना पाचारण करण्यात आले आहेत

इंद्रधनुष्य, प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताहाचे उद्घाटन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

मिशन इंद्रधनुष्य २.० आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना सप्ताहाचे प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्‍वरी एस. यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.

प्रथम गरोदर असलेल्या मातेला रुपये पाच हजारापर्यंत लाभ देऊन सक्षम करणे हे उद्दिष्ट प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत ठेवण्यात आले आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे गरोदरपणामध्ये होणारे माता मृत्यू व बालमृत्यू टाळणे हे होय. त्यामुळे या कार्यक्रमाची समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी २ डिसेंबरपासून पुढील सात दिवस वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये या कार्यक्रमाची जनजागृती करण्यात येणार आहे. त्यामध्ये सर्वच समाजाने व आरोग्य सेवकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी भुवनेश्‍वरी एस. यांनी केले.

मिशन इंद्रधनुष्य २.० बाबत सांगताना त्या म्हणाल्या, लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांना पुढील चार महिने राबवल्या जाणार्‍या मिशन इंद्रधनुष्यमध्ये आपल्या बाळाचे व मातेचे संपूर्ण लसीकरण करून घ्यावे. माता बालक मृत्युदर कमी करणे, हेही आपल्याला सहज शक्य होईल. आरोग्य विभागातील सर्व सेवकांनी दुर्गम भागामध्ये अगदी पेठ, सुरगाणा येथे जाऊन याबाबत जनजागृती करावी व लोकांना या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त करावे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे यांनी प्रास्ताविकामध्ये दोन्ही कार्यक्रमांचे उद्दिष्ट मांडली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी मार्गदर्शनामध्ये मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी मांडलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून प्रत्येक पहिले गरोदरपण असलेल्या मातेला प्रधानमंत्री मातृवंदनाचा लाभ कसा मिळेल यासाठी सर्व समाजामध्ये शहरांमध्ये, गावांमध्ये जनजागृती करावी. आपल्या घरातील, परिसरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकांना शोधून लसीकरण सत्राच्या ठिकाणी घेऊन यावे. हे एक सामाजिक काम आहे. तसेच सुदृढ व सशक्त माता, बालक राहावे म्हणून आपण सतत हे काम करत राहू, असे आवाहनही त्यांनी केले.

एआरटी केंद्रांना औषधांसाठी थेट निधी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) एचआयव्ही एड्स बाधितांना मोफत औषधे देण्यात येतात. मात्र, नॅकोकडून औषध खरेदी प्रक्रियेमध्ये तांत्रिक अडथळा आल्याने खरेदीला विलंब झाला. त्याचा फटका महाराष्ट्राला बसल्याने गरजेनुसार, राज्यातील एआरटी केंद्रांना थेट औषध खरेदीसाठी निधी देण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास औषधांचा तुटवडा होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.

राज्यातील अनेक भागांतील ‘फर्स्ट लाइन’च्या ‘एचआयव्ही’ विषाणू प्रतिबंधक औषधांचा (एआरटी) सहा महिन्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. काही केंद्रांवर ही औषधे उपलब्ध असली, तरी ती पुरेशी नाहीत. अनेक एआरटी केंद्रासह स्वयंसेवी संस्थांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. ही औषधे मोफत असली, तरी उपलब्ध नसल्याने ती रुग्णांना बाहेरून घेण्याची वेळ आली आहे.

ही औषधे साधारणतः एक ते दोन हजार रुपयांना मिळत असल्याने औषधांचा खर्च रुग्णांना सहन करावा लागत आहे. विविध संस्थांच्या पदाधिकार्‍यांनी नॅकोला पत्र व्यवहार करून कैफियत मांडली. ‘नॅको’ने औषध कंपन्याना टेंडर प्रक्रियेनुसार खरेदीचे आदेश दिले. मात्र, तांत्रिक अडथळ्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही.
त्यावर पर्याय म्हणून राज्यातील प्रत्येक एआरटी केंद्राच्या गरजेनुसार, त्या-त्या केंद्रांना औषध खरेदीसाठी किती निधी लागतो, त्यानुसार निधी देण्यात आला आहे. तसेच संबंधितांना औषध खरेदीच्या सुचना दिल्या आहेत.

काही ठिकाणी थोड्या प्रमाणात तुटवडा होऊ शकतो. मात्र, तो कायमचा नसेल,’ असे समजते. औषध खरेदीचा मिळणार परतावा ‘फर्स्ट लाइन’प्रमाणे ’ थर्ड लाइन’च्या औषधांचा तुटवडा झाल्याने संबंधित एआरटी केंद्रांमधून औषध खरेदी करण्यात येत आहे. त्याशिवाय ज्या रुग्णांनी बाहेरून औषधे खरेदी केली आहे, त्यांनी त्याची पावती एआरटी केंद्रामध्ये आणून दिल्यास त्यांना त्या रकमेचा परतावा देण्याच्या सुचना केंद्रांना दिल्या आहेत.

४२ लाख शिक्षकांना ‘निष्ठा’ प्रशिक्षण; केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाचा मानस

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना प्रशिक्षित शिक्षकांकडून शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने २२ ऑगस्टला ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन स्कूल टीचर्स हेड होलिस्टिक ऍडव्हान्समेंट’ (निष्ठा अर्थात एनआयएसएचटीएचए) या प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली. यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

याचे राज्यस्तरीय तसेच तालुकानिहाय आयोजन करण्याबाबत आदेश राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक आहेत. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत देशातील ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्रालयाचा (एचआरडी) मानस आहे. यात अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, आरोग्य व योगा, ग्रंथालय, युवा क्लब, शालेय नेतृत्त्व गुणवैशिष्ट्ये, किचन गार्डन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हे प्रशिक्षण प्रथम राज्यस्तरावर आणि नंतर तालुकास्तरावर देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातील पाच तज्ज्ञ शिक्षकांची निवड करून त्यांना राज्यस्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दोन भाषातज्ज्ञ, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र या विषयाचा प्रत्येकी एक असे पाच शिक्षक असतील. त्यांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण होणार असून यात संवाद कौशल्येही शिकविली जाणार आहेत.

यानंतर हे तज्ज्ञ तालुकास्तरावर प्रशिक्षण देणार आहेत. यासाठी विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले असून प्रत्येक तालुका, जिल्हास्तरावर एक तज्ज्ञ समिती असेल जी या सर्व प्रशिक्षणावर तसेच प्रशिक्षणानंतर येणार्‍या अडचणी सोडवण्यात शिक्षकांना सहाकार्य करेल तर त्यांच्यावर राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती असेल. प्रशिक्षण देणे सुलभ व्हावे या उद्देशाने असे विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे.

३ लाख शिक्षकाणी केली नोंंदणी
केंद्राच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने पुढाकार घेऊन ही या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. दरम्यान, निष्ठा पोर्टलला आत्तापर्यंत ५४ लाख ८९ हजार ७० लोकांनी भेट दिली आहे. त्यातील २ लाख ९६ हजार ९७० लोकांनी नोंदणी केली आहे. तसेच निष्ठा हे ऍप १ लाख ४७ हजार २० लोकांनी डाऊनलोड केले आहे.

अडीच लाख शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण
निष्ठा कार्यक्रमासाठी १२० नॅशनल रिसोर्स ग्रुप बनविण्यात आले असून ३३ हजार स्टेट रिसोर्स ग्रुप स्थापण्यात आले आहेत. ‘निष्ठा’ च्या संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीनुसार ३६ राज्यात हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.त्यात आजमितिस एसपीआरएल घटकाच्या १५७६, केआरपीएस घटकात ७७१७ तसेच हेडस/प्रिंसिपल घटकातील २१४२७ जणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यासह २ लाख २६ हजार २४३ शिक्षकांना प्रशिक्षण देंण्यात आले आहे.

‘वॉटर बेल’ झाली पाणी पिण्याची वेळ !

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीगोंद्यातील कौठा शाळेत उपक्रमास सुरुवात

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- केरळमधील सरकारी शाळांनी मुलांना आजारापासून वाचवण्यासाठी एक नवीन अभियान सुरू केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी ‘वॉटर ब्रेक’ देण्यात येतो. त्याच धर्तीवर नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील कौठा येथील जिल्हा परिषद शाळेत अनोखा ‘वॉटर बेल’ उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या शाळेत नियमित ‘वॉटर बेल’ दिली जाते. विद्यार्थ्यांचाही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम राबविणारी ही शाळा पहिली ठरली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेच्या युगात विद्यार्थी अति टीव्ही पाहण्याच्या किंवा अभ्यासाच्या नादात पाणी कमी पितात. परिणामी पाण्याची कमतरता आणि डीहायड्रेशनमुळे अनेक मुलं आजारी पडतात. त्यामुळे ‘वॉटर बेल’ या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. जेणेकरून विद्यार्थी पुरेसे पाणी पितील आणि निरोगी राहतील असा यामागचा उद्देश आहे.

केंद्रप्रमुख दिलीप घोडके, शाळेचे मुख्याध्यापक सोपान जाधव, शिक्षक संजय शिंदे, धोंडिबा जगताप, श्रीमती गायकवाड, श्रीमती जया शिंदे, श्रीमती शैला गावडे व श्रीमती चंद्रकला सूर्यवंशी व शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष परकाळे यांच्या संकल्पनेतून आणि माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश परकाळे तसेच सुभाष परकाळे, आर्वी अनगरे चे ग्रामसेवक शेख व आर्वी पुनर्वसनचे मुख्याध्यापक शरद गावडे व कौठा केंद्रातील सर्व शिक्षक व सर्व शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली. शाळा भरल्यानंतर दर दोन तासांनी ही ‘वॉटरबेल’ दिली जाते. विद्यार्थ्यांनी दिवसातून 2 ते 3 लिटर पाणी प्यावे यासाठी शाळेतील विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.

सोनई तिहेरी हत्याकांड; चौघांची फाशी कायम

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

प्रेमसंबंधाच्या रागातून झाली होती हत्या

गणेशवाडी (वार्ताहर)- 2013 वर्षाच्या पहिल्याच दिवशी नेवासा तालुक्यातील सोनईनजीकच्या गणेशवाडी येथील तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडवून दिल्याच्या प्रकरणातील 5 दोषींना नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयानेही कायम केली आहे. शिक्षा सुनावलेल्या पाचपैकी एकाचा गेल्या वर्षी मृत्यू झाल्याने चौघांना फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईल. गाजलेल्या या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली होती.

1 जानेवारी 2013 रोजी नेवासा तालुक्यातील सोनईजवळील गणेशवाडी येथे तिहेरी हत्याकांड घडले होते. प्रेमप्रकरणाच्या विरोधातून हे हत्याकांड झाले होते. सचिन घारू व त्याचे मित्र संदीप राज धनवार व राहुल कंडारे या तिघांचे हत्याकांड घडले होते. या प्रकरणाचा 18 जानेवारी 2018 रोजी नाशिकच्या सत्र न्यायालयाने निकाल जाहीर केला होता. यात एकूण 6 जणांना दोषी ठरवण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने सहापैकी पाच आरोपींची फाशीची कायम ठेवली आहे. आरोपींपैकी पोपट ऊर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले याचा नाशिकच्या कारागृहात 23 जून 2018 रोजी हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. रमेश विश्वनाथ दरंदले (39), प्रकाश विश्वनाथ दरंदले (34), पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदले (55), गणेश उर्फ प्रवीण पोपट दरंदले (19) सर्व रा. गणेशवाडी (विठ्ठलवाडी) तालुका नेवासा आणि संदीप माधव कुर्‍हे (33) रा. खरवंडी, ता. नेवासा अशी या पाच आरोपींची नावे आहेत. निकालपत्रात न्यायालयाने आरोपींवर कठोर शब्दात ताशेरे ओढले होते. अशोक रोहिदास फलके रा. लांडेवाडी यास दोषमुक्त केले होते.

अशी केली होती तिघांची हत्या
संदीप राजू धनवार, राहुल कंडारे, सचिन घारू हे तिघे तरुण नेवासाफाटा येथे कामाला होते. त्यांना स्वच्छतागृहाची टाकी साफ करायची आहे असे सांगून विठ्ठलवाडी येथे बोलावून घेण्यात आले. संदीप धनवार यास सेफ्टीटँकच्या पाण्यामध्ये बुडवून ठार केले. त्यानंतर पळून जाणार्‍या राहुल कंडारे याचा कोयत्याने, तर सचिन घारूचा वैरण कापण्याच्या अडकित्त्यामध्ये अडकवून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले. धनवार व कंडारे यांचा खून करून त्यांचे मृतदेह पोपट दरंदले यांच्या कोरड्या विहिरीत पुरण्यात आले तर घारू याचे मुंडके व अडकित्त्याने तोडलेले हातपाय एका कूपनलिकेत टाकून देण्यात आले होते. 

आरोपींनी निर्दयपणे व थंड डोक्याने परंतु अतिशय नियोजनबद्धपणे हे हत्याकांड केले. प्रारंभी संदीप राजू धनवार याला पकडण्यात आले. संदीप हा शरीरयष्टीने धडधाकड असल्याने त्याला संपविणे सोपे नसल्याचे पाहून सर्व आरोपींनी एकत्र येत संदीपला ज्या सेफ्टी टँकमध्ये तो काम करीत होता त्याच टँकच्या पाण्यामध्ये त्याचे डोके खाली व पाय वर करून पाण्यात बुडवून ठार मारले. हा प्रकार पाहून राहूल उर्फ तिलक राजू कंडारे हा जीवाच्या भीतीने शेतातून जिकडे वाट मिळेल तिकडे पळत असताना त्याचा पाठलाग करण्यात आला व ऊस तोडीच्या कोयत्याने डोक्याच्या मागील बाजूस वार करून जखमी केले. वर्मी घाव बसलेल्या राहूल कंडारे याने अवघ्या काही क्षणातच प्राण सोडला. संदीप व राहुल यांच्यापेक्षा आरोपींच्या मनात सचिन धारू याच्या विषयी अधिक राग होता त्यामुळे सचिनने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्याचाही पाठलाग करून पकडण्यात आले. ज्या ठिकाणी सचिनला पकडले त्या ठिकाणाजवळील शेत गट नंबर 298/2 मधील शेतातील खड्ड्यात नेवून वैरण कापण्याच्या आडकित्यामध्ये सचिनला जिवंत टाकून प्रथम त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापासून व दोन्ही हात खांद्यापासून कापून वेगळे केले. नंतर जिवंतपणे त्याची मान आडकित्त्यामध्ये घालून ती धडापासून वेगळी करून क्रूरपणे त्यास ठार मारले.

100 गोणी कांदा: मिळाले सव्वा सात लाख

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नगरमध्ये लाल कांद्याला 6200 रुपये भाव

अहमदनगर (प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील घोडेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत काल झालेल्या लिलावात 100 गोणी गावरान कांद्याला तब्बल 7 लाख 26 हजार 570 रूपयांचा भाव मिळाला. कांद्यामुळे लखोपती झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे सौ. सोनाली विलास लंघे. ही महिला नेवासा तालुक्यातील शिरसगावची रहिवाशी आहे.

नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी (दि.2) झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा गावरान कांद्याला क्विंटलमागे विक्रमी 10000 रुपये तर लाल कांद्याला 6200 रूपयांचा दर मिळाला. लासलगावातही लाल कांद्याला 8152 रुपयांचा भाव मिळाला.

कांद्याची आवक कमी होत आहे, तर देशभरात कांद्याची मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून कांद्याचे भाव वाढले आहेत. मागील काही दिवसात कांद्याचा भाव साधारणपणे 82 रुपयांपर्यंत गेला होता. शनिवार (दि.30) पासून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले आहेत. पहिल्याच लिलावात गावरान कांद्याला 82 रुपये तर लाल कांद्याला 62 रुपये दर मिळाला होता. सोमवारी (दि.2) रोटेशन पद्धतीने दुसरा लिलाव होता.

त्यासाठी सुमारे 15 हजार गोण्या कांदा शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला होता. कांद्याला मागणी असल्याने कांदा व्यापार्‍यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली. चांगल्या दर्जाच्या गावरान कांद्याला उच्चांकी भाव क्विंटलला 10 हजार रुपये तर लाल कांद्यालाही क्विंटलला 10 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. या वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे, निरीक्षक जयसिंग भोर व संजय काळे यांनी सांगितले.

राज्यात अडीच लाख शिक्षकांना निष्ठा प्रशिक्षण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर जिल्ह्यातील 12 हजार शिक्षकांचा समावेश

संगमनेर – देशातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावली जावी त्याकरिता शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देशातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यास सुरुवात केली आहे. या कार्यक्रमांतर्गत देशातील 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. महाराष्ट्रात याची अंमलबजावणी 4 डिसेंबरपासून करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

केंद्र सरकारने 22 ऑगस्टला ‘नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन स्कूल टीचर्स हेड होलिस्टिक अ‍ॅडव्हान्समेंट’ (निष्ठा) या प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली. यानुसार राज्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. याचे राज्यस्तरीय तसेच तालुकानिहाय नियोजन करण्यात आले आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीला अध्यापन करणार्‍या सर्वच शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यातील 5 तज्ज्ञाची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आले आहे. यासाठीची निवड प्रक्रिया जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. तालुक्याला पाच साधन व्यक्तींसोबत एक राज्य साधन व्यक्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाच दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमात शिक्षकांना विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

निवडलेल्या शिक्षकांना राज्यस्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये दोन भाषातज्ज्ञ, विज्ञान, गणित आणि सामाजिकशास्त्र या विषयांचा प्रत्येकी एक असे पाच शिक्षक असतील. त्यांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण पुणे येथे होणार असून यात संवाद कौशल्येही शिकविली जाणार आहेत. यानंतर हे तज्ज्ञ तालुकास्तरावर प्रशिक्षण देतील, असे या आदेशात म्हटले आहे.

प्रशिक्षणात सूक्ष्म नियोजन
राज्य व तालुका स्तरावरील प्रशिक्षणादरम्यान अत्यंत स्वरूपाचे नियोजन करण्याचे आदेश संचालकांनी दिले आहेत. प्रत्येक तालुका, जिल्हास्तरावर एक तज्ज्ञ समिती असेल. जी या सर्व प्रशिक्षणावर तसेच प्रशिक्षणानंतर येणार्‍या अडचणी सोडविण्यात शिक्षकांना सहाकार्य करेल, तर त्यांच्यावर राज्यस्तरीय तज्ज्ञ समिती असेल. प्रशिक्षण देणे सुलभ व्हावे या उद्देशाने असे विविध पातळ्यांवर नियोजन करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या कार्यक्रमादरम्यान तालुकास्तरावर प्रत्येक शिक्षकांना पाच दिवसाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शकाना देखील देखील प्रशिक्षण पाच दिवसांचे असणार आहे.

गुणवत्तेकरिता होईल फायदा
शिक्षणातील नवीन प्रवाहामुळे शिक्षकांचे अध्यापन अधिक परिणामकारक होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयोगी ठरणार आहे. वर्गातील आंतरक्रिया बरोबरच अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण परिणाम साधेल. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना गुणवत्ता उंचावण्यासाठी होईल. त्यातून शिक्षकांचे अध्यापन प्रभावी व परिणामकारक होईल. अनेक संकल्पना समजावून घेण्यास शिक्षकांना याची मदत होणार आहे. 100 टक्के शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, एक शिक्षकी शाळेतील शिक्षकांसाठी एका शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दुसर्‍या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
-रमाकांत काठमोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर

राज्यात सुमारे अडीच लाख शिक्षकांना प्रशिक्षण
देशातील सर्व शिक्षकांना एकाच वेळेस प्रशिक्षण देण्याची महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. 4 डिसेंबरपासून कार्यक्रमांतर्गत राज्यात 2 लाख 40 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे प्रस्तावित आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी 6 तज्ज्ञ मार्गदर्शक निर्माण केले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना अध्ययन निष्पत्ती, क्षमता आधारित अध्ययन व मूल्यांकन, शाळा सुरक्षितता व सुरक्षा, वैयक्तिक व सामाजिक गुणवैशिष्ट्ये, आरोग्य व योगा, ग्रंथालय, युवा क्लब, शालेय नेतृत्त्व गुणवैशिष्टये, किचन गार्डन आदी विषयांवर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
– दिनकर पाटील, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे

अहमदनगर जिल्ह्यात 12 हजार शिक्षकांना प्रशिक्षण
देशभरात प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणार्‍या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 12,147 शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अकोले तालुका 1247, जामखेड 547, कर्जत 825, कोपरगाव 683, अहमदनगर महानगरपालिका 128 अहमदनगर तालुका 835, नेवासा तालुका 1004, पार्लर 922 ,पाथर्डी 890, राहता 609, राहुरी 850 ,संगमनेर 1261, शेवगाव 743 ,श्रीगोंदा 1085, श्रीरामपूर 522, अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा प्राथमिक 10 हजार 763, तर उच्च प्राथमिक 1384 शिक्षकांचा समावेश असणार आहे.
– डॉ. अचला जडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर.

  • देशात 42 लाख शिक्षकांना प्रशिक्षण
  • राज्यात अडीच लाख प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण
  • 4 डिसेंबर पासून राज्यतज्ज्ञासाठी प्रशिक्षण
  • उर्वरित शिक्षकांना तालुकास्तरावर प्रशिक्षण
  • प्रत्येक शिक्षकाला पाच दिवसाचे असणार प्रशिक्षण
  • या कालावधीत इतर प्रशिक्षण घेण्यास प्रतिबंध
  • प्रशिक्षणाचे प्रभावी व परिणामकारक प्रशिक्षणासाठी
  • अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून प्रयत्न
  • एकावेळी फक्त 120 ते 150 शिक्षकांचे प्रशिक्षण

अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीचे सुमारे आठ कोटींचे अनुदान जमा – आ. कानडे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात श्रीरामपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या सुमारे 31 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार शेतकर्‍यांना पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रुपये आणि फळबागासाठी हेक्टरी आठरा हजार रुपयांप्रमाणे असे एकूण सुमारे सात कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान जमा झाल्याची माहिती श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे आणि जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांनी दिली.
परतीच्या पावसाबरोबरच अतिवृष्टीमुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

त्यामध्ये प्रामुख्याने शेतकर्‍यांच्या हाताशी आलेल्या सोयाबीन, बाजरी, कपाशी या पिकांबरोबरच फळबागांचे नुकसान झाले होते. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला. झालेल्या नुकसानीचे शासनस्तरावर पंचनामे करण्यात आले होते. तालुक्यात सुमारे 33 हजार शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे झाले होते. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात जवळपास 11 हजार शेतकर्‍यांचे सुमारे 7 कोटी 94 लाख रुपयांचे अनुदान खात्यावर वर्ग झाले आहे.

झालेले नुकसान आणि भेटलेली भरपाई यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आहे, शासनाने जाहीर केलेली मदत तुटपुंज्या स्वरुपाची आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांसाठी हेक्टरी 25 ते त30 हजार रुपये इतके अनुदान देण्याची मागणी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्र्यांकडे करणार आल्याचे आमदार लहू कानडे आणि ससाणे यांनी म्हटले आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील देखील बोधेगावं, चांदेगाव, ब्राम्हणगाव भांड, जातप, त्रिंबकपूर, आंबी आणि मुसळवाडी या गावांतील देखील नुकसान भरपाईचे अनुदान जमा झाले आहे, नुकसान भरपाईचा पुढचा टप्पा देखील लवकरच मिळणार असून त्याबात जिल्हाधिकारी कार्यालय येथे पाठपुरावा चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर आमदार कानडे यांची समयसूचकता
शासन धोरणानुसार एका दिवसात विशिष्ट मिलिमीटर पाऊस पडला, तरच अतिवृष्टी जाहीर करण्यात येत होती. परंतु प्रशासकीय सेवेचा अनुभव असलेले आमदार कानडे यांनी थेट मुख्य सचिव अजय मेहता यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील अवकाळी पावसाची वस्तुस्थिती सांगितली आणि शासनाने नव्याने शासन निर्णय काढत अतिवृष्टी बाबतचे निकष बदलले आहेत. त्याच बरोबर नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्यासाठी देखील योग्य पाठपुरावा केला होता. त्यामुळे येणार्‍या काळात आ. लहू कानडे यांच्या अनुभवाचा मोठा फायदा मतदारसंघाला होणार असल्याचे करण ससाणे यांनी म्हंटले आहे.