Friday, June 19, 2026
Home Blog Page 13379

सोनई-करजगाव पाणीपुरवठा योजना सुरू करण्याचा न्यायालयाचा आदेश

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नेवासा तालुक्यातील खार्‍या पाण्याच्या पट्ट्यातील 18 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी

सोनई (वार्ताहर)- गेल्या सुमारे महिनाभरापासून बंद ठेवण्यात आलेली सोनई-करजगाव पाणी योजना पूर्ववत सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी दिल्याने खार्‍या पाण्याच्या पट्ट्यातील नेवासा तालुक्यातील 18 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. राज देवढे पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल करण्यात आली होती. योजनेची कामे अर्धवट ठेवून ती जिल्हा परिषद व ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने या योजनेतून पाणीपुरवठा बंद केला होता.

यासंदर्भात गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकार व जीवन प्राधिकरणला या योजनेचा गेल्या महिनाभरापासून बंद ठेवलेला पाणीपुरवठा त्वरीत सुरू करण्याचे आदेश दिल्याची माहिती अ‍ॅड. देवढे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे 16 नोव्हेंबरपासून अचानक बंद करण्यात आलेली ही पाणी योजना पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची हकीकत अशी की, शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार योजनेची कामे पूर्ण झाल्यावर योजना वर्षभर जीवन प्राधिकरणने चालविण्याची व त्यानंतर ती जिल्हा परिषदेने हस्तांतर करुन घेण्याची तरतूद होती.

योजनेचे काम पूर्ण करण्याची मुदत उलटून गेल्यानंतरही अनेक कामे अपूर्ण असल्याच्या तक्रारी संबंधित गावांच्या सरपंचांनी केल्या होत्या. नियोजित वाड्यावस्त्यांवर पाणी पोहचत नव्हते तर ज्या गावांनी लोकवर्गणी भरली नाही त्यांनाही अनाधिकृतरित्या पाणी दिले जात असल्याने खर्‍या लाभधारकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याच्या तक्रारी निर्माण झाल्या. योजनेची कामे अपूर्ण असतानाही ठेकेदाराला सर्व रक्कम अदा तर करण्यात आलीच परंतु संबंधित ग्रामपंचायतींना पाणी पट्टीची बिले पाठविण्यात आली होती.

त्याचबरोबर अशाच अवस्थेत ही योजना ग्रामपंचायतींनी हस्तांतरित करुन घ्यावी म्हणून संबंधित शासकीय यंत्रणेकडून दबाव आणला जात असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख यांनी हा प्रश्न जिल्हा नियोजन समितीत मांडला होता. त्यावर जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य अतिरिक्त कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यिय चौकशी समिती नेमली होती. या समितीनेही काम अपूर्ण असल्याचा निर्वाळा देऊन अशा स्थितीत हस्तांतर करता येणार नाही असा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना दिला होता.

मात्र असे असतानाही जीवन प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी आडमुठेपणाची भुमिका घेऊन योजना हस्तांतरित करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करत दि.1 जुलै पासून या योजनेचा पाणीपुरवठा बंद केला होता. जीवन प्राधिकरणच्या या आडमुठ्या धोरणाविरोधात आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली योजनेच्या लाभधारकांनी सोनई व अहमदनगर येथे आंदोलने केली. आंदोलनाच्या रेट्यामुळे प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी योजना सुरु करत पाणीपुरवठा सुरु असल्याचे उच्च न्यायालयातही सांगितले.

मात्र आश्वासन दिल्याप्रमाणे गेल्या चार महिन्यांत अर्धवट सोडलेली कामे तर पूर्ण केलीच नाहीत पण हस्तांतरणासाठी पुन्हा दि. 16 नोव्हेंबरपासून योजनेचा पाणीपुरवठा खंडीत केला. न्यायालयात गुरुवारी झालेल्या सुनावणीत जीवन प्राधिकरणकडून निधीची अडचण मांडल्यावर जीवन प्राधिकरण ही राज्य सरकारचीच यंत्रणा असल्याने व ती शासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करुन न्यायालयाने पाणीपुरवठा त्वरीत सुरु करण्याचे आदेश दिले.

जीवन प्राधिकरणकडून कामे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखल झाले असून जिल्हा परिषदेने मात्र वेगळी भुमिका मांडली असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्याची शहानिशा करुन स्वतः लक्ष घालावे व योजना त्वरीत सुरु करुन दि. 8 जानेवारीला तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल आमदार शंकरराव गडाख यांनी समाधान व्यक्त करुन बंद पडलेला पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरु होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

याचिकाकर्त्यांच्या वतीने शैलेश ब्रम्हे यांनी युक्तीवाद केला. तसेच राज्य शासन व जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने सरकारी वकील एस. जी. कार्लेकर यांनी बाजू मांडली. तर जीवन प्राधिकरणच्या वतीने डी. पी. बक्षी व जिल्हा परिषदेच्या वतीने पी. पी. कोठारी यांनी युक्तीवाद केला.

जिल्हाधिकार्‍यांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागणार
न्यायालयाने पाणीपुरवठा त्वरीत सुरू करण्याचे आदेश दिले. जीवन प्राधिकरणकडून कामे पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखल केले. जिल्हा परिषदेने मात्र वेगळी भूमिका मांडल्याने जिल्हाधिकार्‍यांनी त्याची शहानिशा करून स्वतः लक्ष घालावे व योजना त्वरीत सुरू करून दि. 8 जानेवारीला तसे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

बलात्काराच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी लाच

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

बोधेगावचा पोलीस गजाआड । पारनेरची घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसंबंधी देशभर संतापाची लाट आहे. त्यातून हैदराबाद येथे पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचे समर्थनही केले जात आहे. नगरच्या पारनेर तालुक्यात मात्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेल्या आरोपीला मदत करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी पकडला गेला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

रामचंद्र पांडुरंग वैद्य (मूळ रा. बोधेगाव, ता. शेवगाव) या पोलीस कर्मचार्‍यास पन्नास हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली.

पारनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्याचा गुन्हा पारनेर पोलीस ठाण्यात दाखल आहे. त्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, त्याला जामीन मिळवून देण्यासाठी आणि तपासात त्याला मदत करण्यासाठी आरोपीच्या नातेवाईकाकडे पोलिस कर्मचारी वैद्य यांनी पन्नास हजार रुपयांची लाच मागितली.

आरोपीच्या मामाने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. नगरच्या पोलिसांनी सापळा रचला. पारनेरमधील एका हॉटेलमध्ये पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पोलिसाला पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलीस अधीक्षक नीलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे पोलीस उपाअधीक्षक हरीष खेडकर, पोलीस निरीक्षक दीपक करांडे, पोलीस हवालदार तनवीर शेख, सतीष जोशी, रमेश चौधरी, प्रशांत जाधव, रवींद्र निमसे, वैभव पांढरे, हारूण शेख, अशोक रक्ताटे यांच्या पथकाने केली.

पकडण्यात आलेला पोलिस वैद्य पोलिस निरीक्षकाचा रायटर आणि तपासात मदत करणारा कर्मचारी आहे. त्याआधारे ही लाच स्वीकारून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला जामीन मिळवून देण्याचे आणि पुढेही तपासात मदत करून सुटकेचा मार्ग मोकळा करण्याचे आश्वासन त्याने आरोपीच्या मामाला दिले होते.

राहाता पालिका पाणीपुरवठा, वीज व अग्नीशमन विभागाचे टेंडर पाचपट जादा असल्याकारणाने रद्द

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

राहाता (तालुका प्रतिनिधी)- इतर नगरपालिकेच्या तुलनेत पाच पटीने जादा असलेले राहाता पालिकेचे पाणी पुरवठा, वीज विभाग व अग्नीशमन विभागाचे एकाच व्यक्तीचे भरलेले तीन टेंडर राहाता पालिकेच्या प्रभारी आयएएस मुख्याधिकारी श्रीमती आसीमा मित्तल यांनी रद्द केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

राहाता पालिकेने पाणी पुरवठा, वीज विभाग व अग्नीशमन विभागाच्या दैनंदिन कामासाठी 8 सप्टेंबर 2019 रोजी ई -निविदा मागविली होती. ही निविदा टेंडर स्वामी सर्व्हीसेस प्रा. लि., या नावाने सर्वात कमी दराची निवीदा म्हणून सभेने स्वीकारली. मात्र स्पर्धेतील इतर दोन निविदा ज्या भरण्यात आल्या होत्या.

त्या एकाच व्यक्तीच्या म्हणजे तिनही निवीदा एकाच व्यक्तीने भरल्या होत्या. मात्र त्यावेळी याची तपासणी केली गेली नाही. तसेच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना पुढील कार्यवाही करता आली नाही. तसेच या सर्व निविदांची पडताळणी करता आली नाही. या निविदेची पडताळणी केली असता इतर नगरपालिकांच्या तुलनेत वीज, पाणीपुरवठा, व अग्नीशमन विभागाच्या निवीदा या जादा दराच्या असल्याच्या दिसून येत असल्याने सदर निवीदा रद्द करण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी यांनी सदर कंपनीला नोटिशीद्वारे कळविले.

राहाता पालिका क वर्ग असून सदर टेंडरचा वर्षाला खर्च काढल्यास ते बजेट 80 लाखापर्यंत गेले. त्यामुळे सदर खर्च हा पालिकेला परवडू शकत नसल्याचे तसेच तिनही कंपन्यांचे मालक एकच असून त्यामुळे हे टेंडर रद्द केले जात असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले.

पालिकेच्या डिझेलसाठी स्मार्ट कार्ड
राहाता पालिकेचा डिझेल व पेट्रोलवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत असून इतर नगरपालिकांना महिन्याला 30 ते 40 हजार खर्च येतो. राहाता पालिकेचा खर्च एक ते सव्वा लाखांपर्यंत जात असल्याने यासाठी पालिकेने डिझेल व पेट्रोलवर होणार्‍या मोठ्या खर्चाला रोखण्यासाठी स्मार्ट कार्ड काढले असून यावर सर्व नोंदी येणार असून डिझेल व पेट्रोलचा गैरवापर थांबेल, अशी माहिती मुख्याधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिली.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात छात्रभारतीचे आंदोलन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (प्रतिनिधी) – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात छात्रभारती संघटनेच्या वतीने काल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भारतातील गेल्या काही वर्षातील घटना पाहता संविधानिक नागरिक म्हणून आम्ही चिंतित आहोत. देशावर निरंकुश सत्ता आलेल्या सरकारकडून धर्मावर आधारीत, वंशावर आधारीत भेद करणार्‍या घटनांची संख्या संवेदनशील नागररिक म्हणून चिंतेत टाकणारी आहे.

अस्थायी असणारे 370 कलम काश्मिरमधील जनतेला विश्‍वासात घेऊन क्रमाक्रमाने रद्दबातल ठरविण्यासाठी प्रक्रिया यापूर्वीच्या सरकारकडूनही सुरू होेती. केवळ काश्मिरी भूमीवर प्रेम असणार्‍या व काश्मीरस्थित मुस्लीम जनतेचा पराकोटीचा द्वेष करणार्‍या सध्याच्या सरकारने काश्मीरचे अस्तित्वच पुसून टाकण्यासाठी काश्मीरला केंद्रशासित प्रदेश करून आम्हीच खरे राष्ट्रवादी आहोत, लष्करी बळाच्या उन्मादी राष्ट्रवादातून गेले काही महिने काश्मिरी जनतेचा आवाज सर्व मार्गांनी बंद केला आहे.

हे अन्यायकारक आहे. तसेच घटनेच्या विरोधात आहे. याची जाणीव छात्रभारती संघटना करून देत आहे. सीएबी आणि एनआरसी या येऊ घातलेल्या कायद्यानुसार धर्माच्या आधारीत भेद करुन विशिष्ट धर्मसमुदायाच्या भारतीय नागरिकत्वाच्या व्याख्येनुसार वगळण्याचा हा अत्यंत कुटील व मनुवादी प्रवृत्तीचा घातकी प्रयत्न असल्याचे छात्रभारती संघटनेचे मत आहे. त्यामुळे भारतीय संविधानाला आदर्शदूत मानून जीवन व्यतित करणारे सर्व भारतीय लोक सीएबी व एनआरसी या कायद्याचा धिक्कार करत आहेत. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला समस्त आणि एक आहे या भूमिकेतून आम्ही प्रथम भारतीय आहोत व अंतिम सुध्दा भारतीय आहोत.

याच न्यायाने सीएबी व एनआरसी हा कायदा रद्द करण्यात यावा, जामिया व एएमयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील हल्ल्यांची देशभरातील होणार्‍या सर्व विद्यार्थ्यांवरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी, देशभरातील स्त्री सुरक्षिततेचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असतांना स्त्रियांना सुरक्षा प्रदान करण्याच्या योग्यतेतून सर्वसमावेशक धोरण आखावे, सीएबी व एनआरसी कायदा रद्द करण्याचा आपण हस्तक्षेप करुन मानवी समूहाचे गोठ्यात रुपांतरीत करणारा कायदा रद्द करावा, अशी मागणी छात्रभारतीच्यावतीने करण्यात आली आहे.

या मागण्यांसाठी छात्रभारती संघटनेने अँंग्लो उर्दू कॉलेज ते प्रांत कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी नायब तहसीलदार मेंगाळ यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. याप्रसंगी छात्रभारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अनिकेत घुले, गणेश जोंधळे, तुषार पानसरे, हर्षल कोकणें, तृप्ती जोर्वेकर, ऋतिक वर्पे, प्रसाद जाधव, प्रशांत काकड, शितल रोकडे, ओंकार नवली, सचिन रेवकडे, सागर वर्पे, राहूल जर्‍हाड, आकाश पानसरे, सुप्रिया पवार, सागर गुंजाळ आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेसमोर उद्या शिक्षकांचे धरणे आंदोलन

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या वतीने येत्या 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्‍नावर महाराष्ट्र सरकार तसेच जिल्हा परिषदेच्या होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात अहमदनगर जिल्हा परिषदेसमोर शिक्षक परिषदेचे राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहोकले व राज्य उपाध्यक्ष संजय शेळके तसेच जिल्हा उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आर. पी. राहणे, शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, गुरुमाउली मंडळ जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीनाक्षीताई भालेराव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.

यामध्ये प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना व जिल्ह्यातील शिक्षकांच्या उशिरा होणार्‍या पगाराचे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी मोठ्या संख्येने शिक्षकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शिक्षक परिषदेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घुले, गुरुमाउली मंडळाचे तालुकाध्यक्ष संतोष भोर, विकास मंडळ विश्‍वस्त भाऊसाहेब ढोकरे, ज्येष्ठ नेते एस. डी. गायकवाड, उत्तर जिल्हाप्रमुख भीमराज उगलमुगले, गणेश वाघ, बेबी पानसंबळ, अनिता नेहे, द. स. सुपेकर, किशोर बिडवे आदींनी केले आहे.

  • शिक्षक परिषदेच्या आंदोलनातील मागण्या
  • नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त शिक्षक व कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे.
  • अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षकांचे पगार वेळेवर करणे.
  • नवीन परिभाषित अंशदान पेन्शन धारकांच्या कपातीचे पूर्ण व अचूक हिशेब व 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी
  • जिल्हा परिषदांनी अदा करावी.
  • नवीन परिभाषित अंशदान योजनाधारक मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना तातडीने 10 लाखांची मदत करावी.
  • प्रलंबित निवड व वरिष्ठ वेतनश्रेणींचे प्रस्ताव तातडीने निकाली काढणे.
  • प्राथमिक शिक्षकांना मेडिक्लेम योजना लागू करणे.
  • जिल्हा परिषदांची बिंदुनामावली पूर्ण करणे.
  • 15 व्या वित्तआयोगातून शाळांना मदत करणे. वीज देयके अदा करणे.
  • शिक्षकांना वेतन अनुदानाऐवजी प्रति विद्यार्थी अनुदान देण्यासंदर्भातील नियुक्त अभ्यास गट तातडीने रद्द करणे.

दैत्यनांदूर हत्या प्रकरण; आरोपींना 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील दैत्यनांदूर गावचे सरपंच संजय दहीफळे यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना पाथर्डीच्या न्यायालयाने 23 डिसेंबर 2019 पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीश अस्मिता वानखडे यांनी हा आदेश दिला.

या बाबत अधिक माहिती अशी की गेल्या मंगळवार दि. 17 डिसेंबर रोजी दैत्यनांदूर येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दैत्यनांदूर गावाचे सरपंच संजय बाबासाहेब दहीफळे यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन आरोपीना बुधवारी दि. 18 रोजी ताब्यात घेतले. यातील ज्ञानेश्वर विष्णू दहीफळे वय-28 व राहुल शहदेव दहीफळे वय-22 या दोघांना काल (19) गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. शिवाजी दराडे व पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करताना म्हणाले की या गुन्ह्यातील अजून आरोपींना अटक करणे, आरोपींनी वापरलेली बंदूक आणि हत्यारे जप्त करून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा सविस्तर तपास करून फरार आरोपींचा शोध घेण्याकामी पोलीस कोठडीची मागणी केली.

तर आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना अ‍ॅड. रा. ना. खेडकर व अ‍ॅड. व्ही. आर. बाणवे म्हणाले की संपूर्ण कुटुंबीयांची नावे या गुन्ह्यात गुंतविण्यात आली आहेत. सदरची व्यक्ती शिक्षण घेत आहे. घटनस्थाळावरून सर्व वस्तू मिळाल्या आहेत. त्यामुळे न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यांनतर न्यायाधीश वानखडे यांनी 23 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान दैत्यनांदूर गावात तणावपूर्ण शांतता असून मोठा पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला आहे. बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सरपंच संजय दहीफळे यांच्यावर दैत्यनांदूर येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांसह मोठ्या संख्येने तालुक्यातील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, तसेच सरपंच संजय दहीफळे यांचे मित्र उपस्थित होते.

तात्काळ चौकशीच्या आश्‍वासनानंतर दराडे यांचे उपोषण मागे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

दोन पथके 10 दिवसांत करणार अकोले बीडीओच्या कामाची चौकशी

अहमदनगर (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातल्या ग्रामपंचायतींमधील अनागोंदी कारभार तसेच गटविकास अधिकारी बी. एस रेंगडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई दराडे यांनी समर्थकांसह गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान, याप्रकरणाची दोन स्वतंत्र पथकांकडून 10 दिवसांमध्ये चौकशी केली जाईल, असे आश्वासन उपाध्यक्ष राजश्री घुले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी समाज कल्याण समितीचे सभापती उमेश परहर आणि नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

तत्पूर्वी सदस्या दराडे यांच्यावतीने त्यांचे पती बाजीराव दराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी प्राथमिक चौकशी केली. यावेळी त्यांनी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रेंगडे यांच्या भ्रष्ट कामाचे पुरावेच सादर केले. तसेच लवकरात लवकर चौकशी करून संबंधित दोषी ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांच्यासह दोषी असणार्‍या सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

गुरुवारी सकाळी जिल्हा परिषदच्या आवाजामध्ये दराडे यांच्यासह ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते. गटविकास अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी अशी मागणी यावेळी लावून धरण्यात आली होती. सकाळपासून आंदोलनस्थळी अनेकांनी भेटी दिल्या होत्या. शिवसेनेच्या सदस्यांनी या संदर्भातली माहिती घेतली होती.

प्रशासनाने बुधवारी गटविकास अधिकारी रेंगडे यांना रजेवर पाठवले आहे. गुरुवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन दुपारपर्यंत सुरू होते. उपाध्यक्ष राजश्री घुले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती सदस्या दराडे यांना केली. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा दराडे यांनी घेतला.

त्यानंतर प्रशासनाच्यावतीने लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. आंदोलनामध्ये सरपंच बाळासाहेब मालुंजकर, राम एखंडे, बाळासाहेब केदार, अशोक एखंडे, बाबासाहेब एखंडे, नजीर शेख, लालू पुरी, प्रभाकर एखंडे, गणेश एखंडे आदी सामील झाले होते.

अखेर दहा दिवसांत चौकशीचा निर्णय
या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषदेत तक्रार आणि अधिकारी, त्यानंतर अधिकारी आणि उपाध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्यात छोटेखानी बैठका झाल्या. यावेळी प्रशासन दराडे यांनी केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करण्यास तयार असल्याचे स्पष्ठ केले. मात्र, दरोडे यांना ही चौकशी तात्काळ हवी होती. आधी त्यांनी आठ दिवसांत चौकशीची मागणी लावून धरली. तर प्रशासन 15 दिवसांच्या कालावधीवर अडून बसले होते. अखेर त्यात मार्ग निघून 10 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा निर्णय झाला.

शनीशिंगणापुरात मटक्यासह अवैध व्यवसाय तेजीत

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

शनीशिंगणापूर (वार्ताहर) – राज्यात बंदी असलेल्या गुटखा व माव्याची शनीशिंगणापुरात ठिकठिकाणी टपर्‍यांवर खुलेआम विक्री सुरू आहे. तसेच मध्यंतरी काही काळ थंडावलेला मटका-जुगार व्यवसाय पुन्हा फोफावला आहे.
दररोज हजारो रुपयांचा बेकायदेशीररित्या मावा-गुटख्यासह मटका जुगारातून कमालीची देवाण घेवाण केली जात आहे. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारू विक्रीमुळे प्रतिष्ठित व्यापारी, शाळकरी मुली, मुले, महिला, फिरण्यासाठी ये-जा करणार्‍या नागरिकांनी संताप व्यक्त केला असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

शनिशिंगणापुरात ऑनलाईन मटका व चिठ्ठी मटक्याचा सुळसुळाट झाल्याने या मोहामध्ये तरुणाई अडकली आहे. आठवड्यापूर्वी जोरात मटका चालू असतानाच पोलिसांना चुकवून मोबाईलवरच मेसेज घेतले जात आहेत.
कधी कधी व्हॉट्सअ‍ॅपचाही वापर होत असल्याची माहिती एका मटका खेळणार्‍याकडून मिळाली आहे. निकालही मोबाईलवर आल्याने पैशाची मोठी देवाण घेवाण होत आहे. याकडे अनेक तरुण आकर्षित होत आहेत. दिवसेंदिवस मटका खेळण्यासाठी गावात, परिसरात मोठी गर्दी होत असते. या मटका खेळवणार्‍यांवर सायबर गुन्हे अंतर्गत कारवाईची मागणी होत आहे.

पगाराच्या आश्‍वासनानंतर ‘डॉ. तनपुरे’च्या कामगारांचे उपोषण समाप्त

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

खासदार डॉ. सुजय विखे यांची मध्यस्थी; कामगारांनी मांडल्या व्यथा

राहुरी फॅक्टरी (वार्ताहर) – कामगारांना एक नियमित पगार व एक ले-ऑफचा पगार आजच देऊन येत्या 20 जानेवारीपूर्वी आणखी एक नियमित पगार व दोन ले-ऑफचे पगार देण्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी जाहीर केल्याने डॉ. बाबूराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचे सुरू असलेले उपोषण काल गुरुवारी (दि. 19) तिसर्‍या दिवशी खा.डॉ.सुजय विखे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. कामगारांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.

थकीत पगार, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅज्युईटी मिळावी, या मागणीसाठी डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी तसेच निवृत्त कामगारांनी कारखाना कार्यस्थळावरील श्रीछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले होते. याबाबत अनेकांनी चर्चा करून देखील या कर्मचार्‍यांनी आपले उपोषण मागे घेतले नव्हते. मात्र, काल कारखान्याचे मार्गदर्शक खा. डॉ.सुजय विखे व अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी उपोषणाला बसलेल्या कर्मचार्‍यांशी चर्चा केली.

यावेळी राहुरीचे नायब तहसीलदार गणेश तळेकर, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मच्छिंद्र तांबे उपस्थित होते. प्रारंभी सुरेश थोरात, अर्जुन दुशिंग, चंद्रकांत कराळे, इंद्रभान पेरणे, भारत पेरणे, युनियन अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी कामगारांच्या व्यथा खासदार विखे यांच्यासमोर मांडून हे उपोषण विखे यांच्या विरोधात नसून आमच्या प्रपंचाची गरज म्हणून केले आहे, असे सांगून कामगारांनी आपल्या हाकेला नेहमीच साद दिली असल्याने आपण कामगारांना योग्य तो न्याय द्यावा, अशी मागणी केली.

खा. डॉ. विखे म्हणाले, खरंतर कामगारांवर उपोषणाची वेळ यावी, ही दुर्दैवी बाब आहे. हा कारखाना चालविण्यामध्ये कामगारांचा मोठा वाटा आहे. आमच्या काळामध्ये कामगारांची जे देणे शिल्लक आहे, ते देण्यास मी व्यक्तीगत जबाबदार आहे. त्यामध्ये थोडेफार मागेपुढे होऊ शकते. मात्र, कामगारांचा एक रुपयाही बुडणार नाही, अशी खात्री देतो. या तालुक्याने दिलेले प्रेम आम्ही विसरू शकत नाही. राहुरी असो किंवा गणेश कारखाना, हे दोन्ही कारखाने मला कुटुंबासारखे आहेत. मात्र, उसाची उपलब्धता नसल्याने मला हे कारखाने बंद ठेवावे लागले.

कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा बँकेने व तात्कालीन आमदारांनी मोठी मदत केली होती. अडचणी आपल्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे आपण एकत्र बसून त्यातून मार्ग काढला पाहिजे. मी कारखाना हाती घेतल्यापासून अनेक जुने देणे आम्ही दिलेले आहेत. एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार कोणी जर सिद्ध केला तर मी खासदारकीचा राजीनामा देईन. यावर्षी निसर्गाने साथ न दिल्याने सर्वच कारखान्याच्या कामगारांचे पगार थकलेले आहेत. त्याला सरकारची धोरणेही कारणीभूत आहेत.

त्याविषयी आपण संसदेत आवाज उठविणार आहोत. कामगारांच्या वेदना मी समजून घेऊ शकतो. वास्तविकता सर्वांनीच लक्षात घेतली पाहिजे. उगाच काहीतरी सांगून कामगारांच्या व आमच्या भावनेशी कोणी खेळू नका. संचालक मंडळाला बदनाम करण्याचा प्रयत्न आम्ही खपून घेणार नाही. हे राजकारण करण्याचे व्यासपीठ नाही, कामगार उपोषणाला बसले म्हणून अनेकजण समर्थन देतील, भाषणे ठोकतील व निघून जातील. मात्र, कामगारांना पैसे मीच देणार आहे.

कामगार आमचेच आहेत, यापुढे अशा कोणत्याही आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही, असे त्यांनी कामगारांना आश्वासन दिले. त्यानंतर कामगारांनी हा प्रस्ताव मान्य केल्याने लिंबूपाणी देऊन या कामगारांचे उपोषण खा. डॉ. सुजय विखे व अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या हस्ते सोडण्यात आले.

कारखान्यावर असलेल्या कर्जाचे पुनर्गठण केल्यानंतर कारखाना सुरू झाला व दोन हंगाम यशस्वी झाले. या दरम्यान आम्ही जिल्हा बँकेचा एक रुपयाही घेतला नाही. मात्र, नगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेचा चुकीचा अर्थ लावून काही मंडळी आमची बदनामी करू पाहत आहेत. उपोषण काळातही अनेकांनी आमच्यावर आरोप केले. या सर्वांना एक आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन पुराव्यानिशी उत्तर देणार असल्याचे डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

जिल्हा विभाजन व बाभळेश्‍वर-नेवासा रस्त्याचे चौपदरीकरण करावे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

श्रीरामपूरचे आमदार लहू कानडे यांची अधिवेशनात मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अनुसूचित जाती-जमातीच्या कल्याणासाठी आलेला दोन लाख 82 हजार कोटींचा निधी फडणवीस सरकारच्या काळात परत गेला, हे निदर्शनात आणून देतानाच आमदार लहू कानडे यांनी राज्यात आकारमानाने सर्वात मोठा असलेल्या नगर जिल्ह्याच्या विभाजनाची गरज असल्याचे सांगत, श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलावी, यासाठी बाभळेश्‍वर ते नेवासा रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी नागपूर अधिवेशनात केली.
हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर ते बोलत होते.

आ. कानडे म्हणाले, 2016 ते 2019 या काळात लोकसंख्येच्या प्रमाणात समाजातील दीनदलित, शोषित असणार्‍या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या कल्याणाकरिता आलेला 2 लक्ष 82 हजार कोटी रुपयांचा निधी फडणवीस सरकारच्या काळात परत पाठविण्यात आला. यामुळे समाजातील या शोषितांच्या समुहावर अन्याय झाला. आता मात्र राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या बाबींवर विशेषत्वाने लक्ष पुरविले जाईल याचा आनंद वाटतो.

त्याचप्रमाणे राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या असणार्‍या अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रीरामपूरमध्ये जिल्हा प्रशासनाला आवश्यक सर्व बाबी, शासकीय कार्यालये अस्तित्वात असून शेती महामंडळाची जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. श्रीरामपूरच्या पूर्ण विकासासाठी व जिल्हाच्या उत्तर भागाच्या लोक कल्याणासाठी श्रीरामपूर जिल्ह्याची निर्मितीची मागणी आमदार कानडे यांनी केली.

आमदार कानडे पुढे म्हणाले, एकेकाळी देशात साखरेची बाजारपेठ असणार्‍या श्रीरामपूरसारख्या गावाला नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर रस्ता एकेरी असल्याने दळण-वळण सुविधेअभावी विकासाला खीळ बसली आहे. नेवासा फाटा ते बाभळेश्‍वर हा रस्ता चौपदरी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा फायदा श्रीरामपूर व नेवासा या दोन तालुुक्यांना होणार आहे. श्रीरामपूरमध्ये असणार्‍या एमआयडीसी मधील अनेक उद्योगांना चालना मिळेल. नवीन रोजगार येतील व बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणावर नोकर्‍या उपलब्ध होतील. असे आ. लहू कानडे विधिमंडळात बोलताना म्हणाले.